शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मणिपूरच्या विद्यार्थ्यांना नागपूर विद्यापीठाचा आधार

By जितेंद्र ढवळे | Updated: May 8, 2024 17:54 IST

९ विद्यार्थ्यांनी घेतले शिक्षण : विद्यापीठ प्रशासनाचे मानले आभार

नागपूर : खंडित झालेले शिक्षण पुन्हा सुरू ठेवण्याकरिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आशेचा किरण ठरले असल्याच्या भावना मणिपूरच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. शैक्षणिक अडचणी लक्षात घेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने वेळीच प्रवेश दिल्याने कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांचा मणिपूर येथील विद्यार्थ्यांनी सत्कार करीत आभार मानले.

मणिपूर येथे हिंसाचार सुरू असल्याने अशांतता निर्माण झाली. अशा परिस्थितीत असंख्य विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे कठीण झाले. अशा परिस्थितीचा सामना करीत मणिपूर येथील काही विद्यार्थ्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची प्रवेश मिळावा म्हणून संपर्क साधला. कुलगुरू डॉ. चौधरी यांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक अडचण लक्षात घेता तातडीने मदत करीत या विद्यार्थ्यांचे प्रवेश विद्यापीठाच्या विविध विभागांमध्ये करवून घेतले. वेळीच मदत केल्याने अशांत असलेल्या मणिपूर येथील विद्यार्थ्यांना नागपूर विद्यापीठात त्यांचे शिक्षण सुरू ठेवता आले.

मणिपूर येथील चुराचंदपूर तसेच कांग्पोक्पी येथील विद्यार्थ्यांचा नागपूर विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्यांमध्ये समावेश आहे. पाच विद्यार्थी व ४ विद्यार्थिनींना विद्यापीठाने विविध ठिकाणी प्रवेश दिला आहे. विद्यापीठाचा पदव्युत्तर गणित विभाग, पदव्युत्तर इंग्रजी विभाग, पदव्युत्तर मानसशास्त्र विभाग, पदव्युत्तर विधी विभाग आदी विविध विभागांमध्ये मणिपूर येथील एकूण ९ विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण केले आहे. विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आलेली मदत त्याचप्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधेमुळे विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील कुलगुरू कक्षात मणिपूरच्या विद्यार्थ्यांनी कुलगुरू चौधरी यांचा सत्कार करीत आभार मानले. या वेळी मणिपूर येथील विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

 

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठManipur Violenceमणिपूर हिंसाचारStudentविद्यार्थीEducationशिक्षण