पांढराबोडी झोपडपट्टीधारकांचा मनपावर हल्लाबोल
By Admin | Updated: May 18, 2016 03:13 IST2016-05-18T03:13:20+5:302016-05-18T03:13:20+5:30
कोणत्याही स्वरूपाची नोटीस न बजावता अंबाझरी प्रभागातील पांढराबोडी येथील झोपडपट्टीधारकांना शिविगाळ करून ...

पांढराबोडी झोपडपट्टीधारकांचा मनपावर हल्लाबोल
अपर आयुक्तांना निवेदन : नुकसानभरपाई व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
नागपूर : कोणत्याही स्वरूपाची नोटीस न बजावता अंबाझरी प्रभागातील पांढराबोडी येथील झोपडपट्टीधारकांना शिविगाळ करून गरीब लोक ांच्या झोपड्या तोडणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच झोपडपट्टीधारकांना नुकसानभरपाई द्यावी, यासाठी झोपडपट्टीधारकांनी मंगळवारी महापालिका मुख्यालयात जोरदार नारेबाजी क रीत हल्लाबोल केला.
अपर आयुक्त नयना गुंडे यांना मागण्यांचे निवेदन दिले. सोमवारी महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने प्रचंड पोलीस बंदोबस्तासह झोपड्या तोडल्या. घरातील टीव्ही, फ्रीज, फर्निचर व गृहोपयोगी साहित्य घराबाहेर फेकून नुकसान केले. घरातील पुरुष कामावर गेलेले असल्याने घरात लहान मुले व महिला असताना कारवाइं करण्यात आली. झोपडपट्टीधारकांना न्याय द्यावा, अशी मागणी शिष्टमंडळाने गुंडे यांच्याकडे केली.
तसेच झोपडपट्टीधारक गेल्या ८ ते १० वर्षांपासून या ठिकाणी वास्तव्यास आहेत. येथील घरांना कर आकारण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.
शिष्टमंडळात प्रदीप खुरसुंगे, मधुकर मोहक, प्रीती खुरसुंगे, शीतल उईके, छाया हाडके, निधी द्विवेदी, रमाबाई मेंढे, मनोरमा बडखाने, बलदेव बडखाने, सोमेश शुक्ला, रंजना मेंढे, हरीश उईके, नरेंद्र भोयर, सरिता कोहळे, नेतलाल कोहळे, चंद्रभागा खुरसुगे, सीमा खोब्रागडे, सरिता लोखें, आशा राऊ त, शोभा कुंभरे, अश्विनी ढोंबरे , रचना नेवारे, लीलाबाई पाहाडे, चम्पा धूनोर, निलन राऊ त, ललिता धवराळ, गायत्री यादव, अनिता वाघाडे, दीक्षिता हाडके, रेखा बडोल, नरेंद्र गोहिया यांच्यासह राजननगर येथील नागरिक सहभागी होते. (प्रतिनिधी)
आंदोलनाचा इशारा
खदानीच्या जागेवर मोठा खड्डा होता. झोपड्या उभारण्यासाठी लोकांनी प्रत्येकी दोन ते तीन लाख रुपये खर्च केले. गेल्या ८ ते १० वर्षापासून झोपडपट्टीधारक येथे वास्तव्यास आहेत.यात प्रामुख्याने मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबांचा समावेश आहे. त्यांच्याकडे रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र असून वीज जोडण्या घेतलेल्या आहेत, असे असतानाही नगसेवकांच्या सांगण्यावरून उन्हाळ्याच्या दिवसात झोपड्या तोडण्यात आल्या. यामुळे गरीब लोकांवर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. नुकसानग्रस्त झोपडपट्टीधारकांना भरपाई द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.