‘आंबा’ गोड , चणा ‘कडू’
By Admin | Updated: May 15, 2014 02:15 IST2014-05-15T02:15:57+5:302014-05-15T02:15:57+5:30
कोकणातील आंब्याच्या किमती बाजारात पडल्यानंतर त्याची दखल घेऊन याबाबत चौकशी समिती

‘आंबा’ गोड , चणा ‘कडू’
नागपूर :
कोकणातील आंब्याच्या किमती बाजारात पडल्यानंतर त्याची दखल घेऊन याबाबत चौकशी समिती नेमणार्या राज्य शासनाने विदर्भात सोयाबीन आणि चण्याच्या किमती पडल्यानंतर मात्र अशी तत्परता दाखविली नाही, याबाबत शेतकर्यांमध्ये नाराजी आहे. प्रथम अतिवृष्टी व त्यानंतर गारपीट यामुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर उरलेसुरले सोयाबीन बाजारात नेले तर व्यापार्यांनी दर पाडले. सध्या हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीनची खरेदी सुरू आहे.
हीच बाब चण्याच्या बाबतीत आहे. हमीभाव ३१०० रुपये असताना खरेदी मात्र २००० ते २२०० रुपयांनी केली जात आहे. विशेष म्हणजे शेतकर्यांनी ओरड करूनही सरकार पातळीवरून काहीही दखल घेण्यात आली नाही. दुसरीकडे मात्र आंब्याच्या किमती बाजारात पडू लागल्यावर सरकार खडबडून जागे झाले आणि मुख्यमंत्र्यांनी तत्काळ चौकशी समितीही नेमली व २२ तारखेपर्यंत अहवालही मागितला आहे. सरकारकडे इच्छाशक्ती असेल तर काय होऊ शकते, याचे हे उदाहरण ठरावे. (प्रतिनिधी)