शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

किरकोळ कारणातून साथीदाराचा खून करून विहिरीत फेकला मृतदेह; दोन आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2022 18:33 IST

इमामवाडा पोलीस ठाण्याजवळील घटना; एकच खळबळ

नागपूर : किरकोळ वादातून दोन मजुरांनी आपल्याच साथीदाराचा खून करून मृतदेह विहिरीत फेकून दिला. इमामवाडा पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर घडलेल्या या घटनेने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विहिरीत मृतदेह आढळून आल्यानंतर इमामवाडा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. रामसिंग ठाकूर (५५) असे मृतकाचे नाव आहे. तर राजू बुराडे आणि मुकेश अंबुरे अशी आरोपींची नावे आहेत.

रामसिंग आणि आरोपी मजूर म्हणून काम करतात व ते इमामवाडा संकुलातील झोपडपट्टीत राहतात. तिघांनाही दारूचे व्यसन आहे. शुक्रवारी रात्री रामसिंग आणि राजू यांच्यात काही कारणावरून वाद झाला. त्यामुळे संतापलेला राजू हा मुकेशसोबत रात्री उशिरा रामसिंगच्या झोपडीत आला. येथे पुन्हा वाद झाला. रामसिंगने त्याला झोपडी सोडण्यास सांगितले. प्रत्युत्तरात राजू व मुकेश यांनी रामसिंग यांच्या डोक्यात काठीने वार करून गंभीर जखमी केले. दोघेही तेथून पळून गेले. शनिवारी पहाटे दोघेही रामसिंगची प्रकृती जाणून घेण्यासाठी पोहोचले. तेव्हा रामसिंग मरण पावल्याचे त्यांना समजले. दोघांनी ओढत नेत त्याचा मृतदेह जवळच्या विहिरीत फेकून दिला. घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर इमामवाडा पोलीस ठाणे आहे. इमामवाडा पोलिसांनाही या घटनेची माहिती मिळू शकली नाही.

रविवारी सकाळी परिसरातील एका सलून कामगाराला विहिरीत मृतदेह तरंगताना दिसला. त्याने इमामवाडा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी अग्निशमन विभागाला माहिती दिली. त्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून मेडिकलला पाठविण्यात आला. परिसरातीलच रहिवासी असल्याने रामसिंगची ओळख पटली. त्याच्या डोक्यावर खोल जखमा दिसत होत्या, त्यामुळे हत्येचा संशय व्यक्त केला जात होता.

पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. शवविच्छेदनात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. त्यांनी रामसिंगचे जवळचे नातेवाईक आणि शेजाऱ्यांकडे चौकशी केली. राजू आणि मुकेश यांच्यात वाद झाल्याचे त्यांना समजले. त्यानंतर दोघांना ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखविल्यावर त्यांनी हत्येची कबुली दिली.

पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न

पोलीस आयुक्तांच्या सूचनेवरून गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी एरिया सर्व्हेलन्स टीम तयार करण्यात आली आहे. इमामवाडा हा गुन्हेगारीच्या दृष्टीने संवेदनशील परिसर आहे. खुनाची ही घटना पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर घडली. यानंतर ३६ तास उलटूनही पोलिसांना घटनेची माहिती मिळू शकली नाही. यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर