शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

मामा-भाच्याचे मृत्यू प्रकरण : शेतमालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 20:35 IST

शेतमालकाने शेतातील कुंपणात रात्रीच्या वेळी वीज प्रवाहित केल्यानेच करंट लागून दोघांचा मृत्यू झाल्याची बाब पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. त्यामुळे सोमवारी हिंगणा पोलिसांनी आरोपी रवींद्र शंकर निहारे (रा. खडकी, हिंगणा) या शेतकऱ्याविरु द्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देकुंपणात सोडला वीज प्रवाह : खेकडे पकडताना गेला होता जीव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतमालकाने शेतातील कुंपणात रात्रीच्या वेळी वीज प्रवाहित केल्यानेच करंट लागून दोघांचा मृत्यू झाल्याची बाब पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. त्यामुळे सोमवारी हिंगणा पोलिसांनी आरोपी रवींद्र शंकर निहारे (रा. खडकी, हिंगणा) या शेतकऱ्याविरु द्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.खेकडे पकडण्यासाठी जात असताना शेतातील कुंपणातून विजेचा करंट लागल्याने उमेश दयाराम मरसकोल्हे (वय ३०) सागर विनोद आतराम (वय १५, दोन्ही राहणार खडगी, कान्होलीबारा) या दोघांचा करुण अंत झाला होता. २८ नोव्हेंबरला ही घटना उघडकीस आल्यानंतर हिंगणा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या तपासात असे आढळून आले की, जंगली जनावरांकडून शेतपिकाची नासाडी केली जात असल्याने आरोपी रवींद्र निहारे याने आपल्या शेतातील कुंपणात वीज प्रवाह सोडला होता. उमेश आणि विनोद हे दोघे शेतातून खेकडे पकडण्यासाठी जात होते. त्यांना त्याची कल्पना नव्हती. त्यामुळे कुंपणाला हात लावताच त्यांना जोरदार विजेचा करंट लागला आणि त्या दोघांचाही मृत्यू झाला. २८ नोव्हेंबरला सकाळी ही बाब उघडकीस आल्यानंतर आरोपी निहारेने त्यांचे मृतदेह बाजूच्या शेतात नेऊन टाकले. पोलीस चौकशीत हा प्रकार उघड झाल्यानंतर पोलिसांनी निहारेविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :electricityवीजDeathमृत्यू