शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

मामा-भाच्याचे मृत्यू प्रकरण : शेतमालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 20:35 IST

शेतमालकाने शेतातील कुंपणात रात्रीच्या वेळी वीज प्रवाहित केल्यानेच करंट लागून दोघांचा मृत्यू झाल्याची बाब पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. त्यामुळे सोमवारी हिंगणा पोलिसांनी आरोपी रवींद्र शंकर निहारे (रा. खडकी, हिंगणा) या शेतकऱ्याविरु द्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देकुंपणात सोडला वीज प्रवाह : खेकडे पकडताना गेला होता जीव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतमालकाने शेतातील कुंपणात रात्रीच्या वेळी वीज प्रवाहित केल्यानेच करंट लागून दोघांचा मृत्यू झाल्याची बाब पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. त्यामुळे सोमवारी हिंगणा पोलिसांनी आरोपी रवींद्र शंकर निहारे (रा. खडकी, हिंगणा) या शेतकऱ्याविरु द्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.खेकडे पकडण्यासाठी जात असताना शेतातील कुंपणातून विजेचा करंट लागल्याने उमेश दयाराम मरसकोल्हे (वय ३०) सागर विनोद आतराम (वय १५, दोन्ही राहणार खडगी, कान्होलीबारा) या दोघांचा करुण अंत झाला होता. २८ नोव्हेंबरला ही घटना उघडकीस आल्यानंतर हिंगणा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या तपासात असे आढळून आले की, जंगली जनावरांकडून शेतपिकाची नासाडी केली जात असल्याने आरोपी रवींद्र निहारे याने आपल्या शेतातील कुंपणात वीज प्रवाह सोडला होता. उमेश आणि विनोद हे दोघे शेतातून खेकडे पकडण्यासाठी जात होते. त्यांना त्याची कल्पना नव्हती. त्यामुळे कुंपणाला हात लावताच त्यांना जोरदार विजेचा करंट लागला आणि त्या दोघांचाही मृत्यू झाला. २८ नोव्हेंबरला सकाळी ही बाब उघडकीस आल्यानंतर आरोपी निहारेने त्यांचे मृतदेह बाजूच्या शेतात नेऊन टाकले. पोलीस चौकशीत हा प्रकार उघड झाल्यानंतर पोलिसांनी निहारेविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :electricityवीजDeathमृत्यू