शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

भाजपमध्ये मार्चअखेर मोठे फेरबदल, बहुतांश शहर व जिल्हाध्यक्ष बदलणार

By कमलेश वानखेडे | Updated: March 8, 2023 14:51 IST

नागपूर, अमरावती, कसबाचा धसका : मार्च अखेर राज्यकार्यकारिणीची पुनर्रचना

नागपूर : नागपूर, अमरावतीसह राज्यात चार ठिकाणी विधान परिषदेच्या निवडणुकीत बसलेला फटका, त्यापाठोपाठ कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत झालेला पराभव याचा धसका घेत भाजपने राज्य कार्यकारणीची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील बहुतांश जिल्हाध्यक्ष, शहर अध्यक्ष बदलण्यात येणार आहेत. एवढेच नव्हे तर प्रदेश पदाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्यांच्या कामाचा आढावा घेऊन त्यातीलही अनेकांना पदमुक्त केले जाण्याची शक्यता आहे. प्राप्त माहितीनुसार मार्चच्या अखेरीस गुढी पाडव्यानंतर हे फेरबदल केले जातील.

आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सहा महिन्यांपूर्वी भाजपचे प्रदेश अध्यक्ष म्हणून सूत्रे स्वीकारली होती. मात्र, त्यांनी जुन्याच कार्यकारणीला सोबत घेत काम सुरू ठेवले. बावनकुळे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर झालेल्या विधान परिषद व विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. या पराभवाच्या पार्श्वभूमीवर पक्षाकडून जिल्हा व शहर अध्यक्षांच्या कामाचा आढावा घेण्यात आला आहे. यात काही पदाधिकाऱ्यांचे काम समाधानकारक नसल्याचे किंवा स्थानिक पातळीवर बदल आवश्यक असल्याचे पुढे आले आहे. याची दखल घेत मार्च अखेरीच फेरबदल केले जाणार आहेत.

लोकसभा, विधानसभेची नव्या दमाची टीम

- भाजपने लोकसभेसाठी ‘मिशन ४५’ तर व विधानसभेसाठी ‘मिशन २००’ निश्चित केले आहे. आगामी काळात महिपालिकेच्या रखडलेल्या निवडणुकादेखील होतील. या सर्व निवडणुकांसाठी नव्या दमाच्या पदाधिकाऱ्यांची टीम तयार करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. महाविकास आघाडीतील तीनही पक्ष निवडणुकीपूर्वी एकत्र आले तर त्यांना टक्कर देण्यासाठी आतापासूनच पक्षातील चांगले काम करणाऱ्यांना हेरून जबाबदारी सोपविण्याचा भाजपचा प्लान आहे.

सहा महिन्यांपूर्वी प्रदेशाध्यक्ष पदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर राज्यभर दौरे केले. पुन्हा काही भागांचे दौरे केले जातील. लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपची सक्षम टीम उभारायची आहे. गरजेच्या ठिकाणी नवे जिल्हाध्यक्ष नेमले जातील. काही प्रदेश पदाधिकारी बदलले जातील. योग्य नेत्याला योग्य काम दिले जाईल.

- आ. चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजप

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे