शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

'मैत्रेय'ची मालमत्ता विकून ठेवी परत करा :  विधानसभेत विकास ठाकरे यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 10:52 PM

मैत्रेय उद्योग परिवार (समूह ) मुंबई या कंपनीने नागपुरात कार्यालय उघडून नागरिकांना मोठमोठे आमिष देऊन ग्राहकांच्या ठेवी स्वीकारल्या. त्यानंतर फेब्रुवारी २०१६ मध्ये कंपनी अचानक बंद करून ग्राहकांची फसवणूक केली.

ठळक मुद्देगुंतवणूकदारांना दिलासा द्या

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मैत्रेय उद्योग परिवार (समूह ) मुंबई या कंपनीने नागपुरात कार्यालय उघडून नागरिकांना मोठमोठे आमिष देऊन ग्राहकांच्या ठेवी स्वीकारल्या. त्यानंतर फेब्रुवारी २०१६ मध्ये कंपनी अचानक बंद करून ग्राहकांची फसवणूक केली. त्यामुळे आता संबंधित कंपनीच्या मालमत्तेची विक्री करून ग्राहकांचे पैसे परत द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे आ. विकास ठाकरे यांनी विधानसभेत केली.आ. विकास ठाकरे यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करीत या महत्त्वाच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले. ते म्हणाले, नागपूर आणि विदर्भातील ग्राहकांनी सुमारे २५० कोटींहून अधिक रकमेची गुंतवणूक या कंपनीत केली आहे. एकट्या नागपूर शहरातून सुमारे ५० कोटींची गुंजवणूक झाली आहे. कंपनीने कोट्यवधींच्या ठेवी स्वीकारल्या व फेब्रुवारी २०१६ मध्ये अचानक कंपनी बंद करून पळ काढला. नागरिकांनी हेलपाटे मारूनही त्यांची रक्कम त्यांना परत मिळाली नाही. शेकडो नागरिकांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर राज्य सरकारने वर्षभरापूर्वी संबंधित कंपनीची काही मालमत्ता जप्त केली. संबंधित मालमत्तेची विक्री करून ग्राहकांना त्यांच्या ठेवी परत कराव्या, यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी ठाकरे यांनी केली.

सिमेंट रोडच्या कामांची चौकशी करा

नागपूर शहरातील सिमेंट रस्त्यांची कामे अर्धवट झाली असून कामही संथगतीने सुरू आहे. संबंधित रस्त्यांची कामे किती कालावधीत पूर्ण करायची होती, कंत्राटदाराने कामे मुदतीत पूर्ण केली का, कामात गुणवत्ता राखली जात आहे का, या सर्व बाबींची चौकशी करावी, अशी मागणी आमदार विकास ठाकरे यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुरवणी मागण्यांवर बोलताना आ. ठाकरे यांनी नागपूर शहरातील सिमेंट रस्त्यांच्या कामाकडे सरकारचे लक्ष वेधले. ठाकरे म्हणाले, पश्चिम नागपूर मतदारसंघात तेलंखेडी, झिंगाबाई टाकळी, फुटाळा, टाकळी फिडर रोड, घाट रोड, सेमिनरी हिल रोड येथे सिमेंट रोडचे काम संथ गतीने सुरू आहे. कामे अर्धवट झाल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून नागरिकांचे अपघात होत आहेत. रस्त्यावरील धूळ उडत असून  नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांमध्ये धुळीचे थर साचत आहेत. काही कामांची मुदत संपूनही ती पूर्ण झालेली नाहीत. अधिकारी कंत्राटदारावर कारवाई करीत नाही. या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. सोबतच  संबंधित रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण व्हावी यासाठी सरकारने आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. 

टॅग्स :Vikas Thakreविकास ठाकरेInvestmentगुंतवणूकvidhan sabhaविधानसभा