शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

मैत्रेयने नागपुरातही घातला ५० कोटींनी गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 23:47 IST

पोंजी स्कीमचे आमिष देत वार्षिक १२ टक्के व्याजाची हमी देणाऱ्या  आणि ७ हजार गुंतवणूकदारांना ५० कोटींनी गंडा घालणाऱ्या  मैत्रेय समूहाच्या विरुद्ध अखेर नागपुरातही महाराष्ट्र गुंतवणूकदार हितसंरक्षक कायदा १९९९ (एमपीआयडी) आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देवर्षा सतपाळकरसह सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखलसात हजार गुंतवणूकदारांची फसवणूकएक हजाराहून अधिक एजंट

ऑनलाईन लोकमतनागपूर : पोंजी स्कीमचे आमिष देत वार्षिक १२ टक्के व्याजाची हमी देणाऱ्या  आणि ७ हजार गुंतवणूकदारांना ५० कोटींनी गंडा घालणाऱ्या  मैत्रेय समूहाच्या विरुद्ध अखेर नागपुरातही महाराष्ट्र गुंतवणूकदार हितसंरक्षक कायदा १९९९ (एमपीआयडी) आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मैत्रेयच्या प्रमुख वर्षा सतपाळकर यांच्यासह सहा जणांना आर्थिक गुन्हे शाखेने आरोपी बनविले आहे. फसवणुकीचे हे प्रकरण उजेडात आल्यानंतर तब्बल वर्षभरानंतर ही कारवाई झाली आहे.वर्षा सतपाळकर, लक्ष्मीकांत श्रीकृष्ण नार्वेकर, विजय शंकर तावरे, नितीन चौधरी, जनार्दन अरविंद परुळेकर आणि विजय मिस्त्री, अशी आरोेपींची नावे आहेत. हे सर्व मुंबईच्या वसई येथील राहणारे आहेत.मैत्रेय सर्व्हिसेस समूहाची स्थापना १९८८ मध्ये वसई येथे वर्षा सतपाळकर हिचे पती मधुसूदन सतपाळकर यांनी केली होती. २०११ मध्ये मधुसूदन यांच्या मृत्यूनंतर वर्षा ही कंपनीची सर्वेसर्वा झाली. तिने मैत्रयचा शाखा विस्तार राज्यातील प्रमुख शहरात करीत गुंतवणूकदरांना आपल्या जाळ्यात अडकविण्याचे काम सुरू केले. २०१० मध्येच नागपुरात मैत्रेयच्या गोरखधंद्याला सुरुवात झाली होती. नागपुरात पंचशील चौकात मैत्रयचे कार्यालय उघडण्यात आले होते. यानंतर मुंजे चौकात फॉर्च्युन मॉलमध्ये या कंपनीने कार्यालय थाटले होते. मैत्रेयचे नागपुरात एक हजाराहून अधिक एजंट होते. ते विविध योजनांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना वार्षिक १२ टक्के व्याजाचे आमिष देत जाळ्यात अडकवीत होते.गुंतवणूकदारांना जमा ठेव योजनेत पैसे भरणे, स्वर्ण सिद्धी योजनेत गुंतवणूक केलेली रक्कम दुप्पट देण्याची हमी, सोन्याची नाणी आणि प्लॉट देण्याच्या विविध योजना सांगून ते गुंतवणूकदारांची फसवणूक करायचे. मैत्रेयच्या या योजना गरीब आणि सर्वसामान्य नागरिकांत अल्पावधीतच प्रसिद्ध झाल्या. गुंतवणूक केल्यानंतर कंपनीकडून गुंतवणूकदारांना धनादेश आणि वचनपत्र दिले जात होते. यासोबतच निर्धारित कालावधीत पैसे, सोन्याची नाणी आणि प्लॉट देण्याची हमी दिली जात होती. २०१३ मध्ये मैत्रय कंपनीचे बिंग फुटले. कंपनीने गुंतवणूकदारांना पैसे देणे बंद केले. नागपूरसह राज्यातील इतर शहरातही मैत्रेयच्या शाखात गोंधळ उडाला होता. नाशिक येथे गुंतवणूदारांच्या तक्रारीनंतर वर्षा सतपाळकर आणि जनार्दन अरविंद परुळेकर याला अटक केली होती. या कारवाईनंतर नागपुरातही गुंतवणूकदारांना फसवणूक झाल्याची खात्री पटली होती. गुंतवणूकदारांनी यानंतर मैत्रेयच्या कार्यालयात पैसे मागण्यासाठी गोंधळ घातला होता. यानंतर धंतोली पोलिसात तक्रारही नोंदविली होती. धंतोली पोलिसांनी या प्रकरणात कारवाई केली नसल्याने गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदविली होती.आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास केल्यानंतर जवाहरनगर, मानेवाडा येथील संतोषकुमार मिश्रा यांच्यासह ७ हजार गुंतवणूकदार यात अडकल्याचे दिसून आले आहे. गुंतवणूकदारांनी विविध योजनांच्या माध्यमातून ५० कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचे पोलिसांना प्राथमिक तपासात आढळले. तक्रारकर्ते मिश्रा यांनी वर्ष २०११ ते २०१३ च्या दरम्यान ६४ हजार ८०० रुपयांची गुंतवणूक केली होती. यावर मिश्रा यांना ३१ मार्च २०१७ रोजी १ लाख १४ हजार ६६० रुपये आणि १०९८ चौरस फूट प्लॉट देण्याची आमिष देण्यात आले होते. मात्र तारीख संपल्यानंतर पैसे आणि प्लॉट मिळाला नसल्याने मिश्रा यांनी मैत्रयच्या स्थानिक अधिकाºयांची अनेकदा भेट घेतली. मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी त्यांनी धंतोली पोेलिसाकडे फसवणुकीची तक्रार दाखल केली होती.