शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

मैत्रेयने नागपुरातही घातला ५० कोटींनी गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 23:47 IST

पोंजी स्कीमचे आमिष देत वार्षिक १२ टक्के व्याजाची हमी देणाऱ्या  आणि ७ हजार गुंतवणूकदारांना ५० कोटींनी गंडा घालणाऱ्या  मैत्रेय समूहाच्या विरुद्ध अखेर नागपुरातही महाराष्ट्र गुंतवणूकदार हितसंरक्षक कायदा १९९९ (एमपीआयडी) आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देवर्षा सतपाळकरसह सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखलसात हजार गुंतवणूकदारांची फसवणूकएक हजाराहून अधिक एजंट

ऑनलाईन लोकमतनागपूर : पोंजी स्कीमचे आमिष देत वार्षिक १२ टक्के व्याजाची हमी देणाऱ्या  आणि ७ हजार गुंतवणूकदारांना ५० कोटींनी गंडा घालणाऱ्या  मैत्रेय समूहाच्या विरुद्ध अखेर नागपुरातही महाराष्ट्र गुंतवणूकदार हितसंरक्षक कायदा १९९९ (एमपीआयडी) आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मैत्रेयच्या प्रमुख वर्षा सतपाळकर यांच्यासह सहा जणांना आर्थिक गुन्हे शाखेने आरोपी बनविले आहे. फसवणुकीचे हे प्रकरण उजेडात आल्यानंतर तब्बल वर्षभरानंतर ही कारवाई झाली आहे.वर्षा सतपाळकर, लक्ष्मीकांत श्रीकृष्ण नार्वेकर, विजय शंकर तावरे, नितीन चौधरी, जनार्दन अरविंद परुळेकर आणि विजय मिस्त्री, अशी आरोेपींची नावे आहेत. हे सर्व मुंबईच्या वसई येथील राहणारे आहेत.मैत्रेय सर्व्हिसेस समूहाची स्थापना १९८८ मध्ये वसई येथे वर्षा सतपाळकर हिचे पती मधुसूदन सतपाळकर यांनी केली होती. २०११ मध्ये मधुसूदन यांच्या मृत्यूनंतर वर्षा ही कंपनीची सर्वेसर्वा झाली. तिने मैत्रयचा शाखा विस्तार राज्यातील प्रमुख शहरात करीत गुंतवणूकदरांना आपल्या जाळ्यात अडकविण्याचे काम सुरू केले. २०१० मध्येच नागपुरात मैत्रेयच्या गोरखधंद्याला सुरुवात झाली होती. नागपुरात पंचशील चौकात मैत्रयचे कार्यालय उघडण्यात आले होते. यानंतर मुंजे चौकात फॉर्च्युन मॉलमध्ये या कंपनीने कार्यालय थाटले होते. मैत्रेयचे नागपुरात एक हजाराहून अधिक एजंट होते. ते विविध योजनांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना वार्षिक १२ टक्के व्याजाचे आमिष देत जाळ्यात अडकवीत होते.गुंतवणूकदारांना जमा ठेव योजनेत पैसे भरणे, स्वर्ण सिद्धी योजनेत गुंतवणूक केलेली रक्कम दुप्पट देण्याची हमी, सोन्याची नाणी आणि प्लॉट देण्याच्या विविध योजना सांगून ते गुंतवणूकदारांची फसवणूक करायचे. मैत्रेयच्या या योजना गरीब आणि सर्वसामान्य नागरिकांत अल्पावधीतच प्रसिद्ध झाल्या. गुंतवणूक केल्यानंतर कंपनीकडून गुंतवणूकदारांना धनादेश आणि वचनपत्र दिले जात होते. यासोबतच निर्धारित कालावधीत पैसे, सोन्याची नाणी आणि प्लॉट देण्याची हमी दिली जात होती. २०१३ मध्ये मैत्रय कंपनीचे बिंग फुटले. कंपनीने गुंतवणूकदारांना पैसे देणे बंद केले. नागपूरसह राज्यातील इतर शहरातही मैत्रेयच्या शाखात गोंधळ उडाला होता. नाशिक येथे गुंतवणूदारांच्या तक्रारीनंतर वर्षा सतपाळकर आणि जनार्दन अरविंद परुळेकर याला अटक केली होती. या कारवाईनंतर नागपुरातही गुंतवणूकदारांना फसवणूक झाल्याची खात्री पटली होती. गुंतवणूकदारांनी यानंतर मैत्रेयच्या कार्यालयात पैसे मागण्यासाठी गोंधळ घातला होता. यानंतर धंतोली पोलिसात तक्रारही नोंदविली होती. धंतोली पोलिसांनी या प्रकरणात कारवाई केली नसल्याने गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदविली होती.आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास केल्यानंतर जवाहरनगर, मानेवाडा येथील संतोषकुमार मिश्रा यांच्यासह ७ हजार गुंतवणूकदार यात अडकल्याचे दिसून आले आहे. गुंतवणूकदारांनी विविध योजनांच्या माध्यमातून ५० कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचे पोलिसांना प्राथमिक तपासात आढळले. तक्रारकर्ते मिश्रा यांनी वर्ष २०११ ते २०१३ च्या दरम्यान ६४ हजार ८०० रुपयांची गुंतवणूक केली होती. यावर मिश्रा यांना ३१ मार्च २०१७ रोजी १ लाख १४ हजार ६६० रुपये आणि १०९८ चौरस फूट प्लॉट देण्याची आमिष देण्यात आले होते. मात्र तारीख संपल्यानंतर पैसे आणि प्लॉट मिळाला नसल्याने मिश्रा यांनी मैत्रयच्या स्थानिक अधिकाºयांची अनेकदा भेट घेतली. मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी त्यांनी धंतोली पोेलिसाकडे फसवणुकीची तक्रार दाखल केली होती.