शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

‘मिसा’बंदी सत्याग्रहींना सवलती मिळाल्याच पाहिजेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:59 IST

आणीबाणीच्या काळात ‘मिसा’ (मेन्टेनन्स आॅफ इंटर्नल सिक्युरिटी अ‍ॅक्ट) व ‘डीआयआर’अंतर्गत (डिफेन्स इंडिया रुल अ‍ॅक्ट) मोठ्या प्रमाणात सत्याग्रहींना बंधक बनविण्यात आले होते.

ठळक मुद्देनितीन गडकरी : त्यांच्यामुळेच वाचली लोकशाही, संघाचीदेखील आडकाठी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आणीबाणीच्या काळात ‘मिसा’ (मेन्टेनन्स आॅफ इंटर्नल सिक्युरिटी अ‍ॅक्ट) व ‘डीआयआर’अंतर्गत (डिफेन्स इंडिया रुल अ‍ॅक्ट) मोठ्या प्रमाणात सत्याग्रहींना बंधक बनविण्यात आले होते. त्यांच्यामुळेच लोकशाहीचे रक्षण झाले होते. इतर राज्यांतील सत्याग्रहींना विविध सवलती लागू झाल्या आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील ‘मिसा’बंदी सत्याग्रहींनादेखील सन्मानासह सवलती मिळाल्या पाहिजे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. राजकीय ‘मिसा’बंदी व ‘डीआयआर’ सत्याग्रहींच्या लोकतंत्र सेनानी संघातर्फे रविवारी एक दिवसीय सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेनंतर सत्याग्रहींनी गडकरी यांची महाल येथील निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी गडकरी बोलत होते.देशातील आठ राज्यात ‘मिसा’बंद्यांना विविध सवलती लागू आहेत.मध्य प्रदेशात तर सत्याग्रहींना मोठ्या प्रमाणात सवलती दिल्या आहेत. याच धर्तीवर राज्यातदेखील ‘मिसा’बंदी तसेच ‘डीआयआर’ पीडितांना सवलती लागू झाल्या पाहिजेत. सत्याग्रहींच्या मागण्यांना माझे समर्थन आहे.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी माझी चर्चादेखील झाली असून तेदेखील याबाबतीत सकारात्मक आहेत, असे गडकरी यांनी यावेळी सांगितले. ‘मिसा’बंदी सत्याग्रहींमध्ये अनेक जण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. अशा स्थितीत त्यांना सवलती लागू झाल्या तर संघाला ते मान्य राहील का, असा मुद्दा समोर आला होता. मात्र संघाची याला आडकाठी नसून लोकशाही वाचविणाºयांना सन्मान मिळालाच पाहिजे, असे प्रतिपादन गडकरी यांनी केले.दरम्यान, तत्पूर्वी भावसार समाज भवन येथे सभा पार पडली. यावेळी लोकतंत्र सेनानी संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सच्चिदानंद उपासने, राष्ट्रीय सचिव कोमल छेडा, प्रांताध्यक्ष जयप्रकाश पांडे, केंद्रप्रतिनिधी अविनाश संगवई, नागपूर अध्यक्ष अण्णाजी राजेधर, सचिव किशोर मुळे प्रामुख्याने उपस्थित होते. शिवाय छत्तीसगड, गोंदिया, नांदेड, अहमदनगर, वर्धा, जळगाव,हिंगोली, परभणी, नाशिक, खामगाव, बुलडाणा, मुंबई, अमरावती इत्यादी ठिकाणांहून प्रतिनिधी आले होते.देशातील आठ राज्यात ‘मिसा’बंद्यांना विविध सवलती लागू आहेत. यात उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, हरियाणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. मध्य प्रदेशात तर शिवराजसिंह सरकारने मिसाबंद्यांसह डीआयआर कायद्यांतर्गत बंदी सत्याग्रहींना प्रतिमाह २५ हजार रुपये मानधन, प्रवास व आरोग्य सेवेत मोठ्या प्रमाणात सवलती दिल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने आता संयमाची जास्त परीक्षा न घेता आम्हाला सन्मान द्यावा, असा यावेळी वक्त्यांचा सूर होता.‘त्या’ सत्याग्रहींना मदत करणारअनेक सत्याग्रहींचे आता निधन झाले असून काहींची प्रकृती खराब आहे. अशा सत्याग्रहींना प्रकृतीच्या अडचणी असतील किंवा कर्करोग, ह्रद्यविकार असेल तर त्यांना परिवारातील एक सदस्य म्हणून मी मदत करेन, असे आश्वासन गडकरी यांनी यावेळी दिले.