शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

‘मिसा’बंदी सत्याग्रहींना सवलती मिळाल्याच पाहिजेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:59 IST

आणीबाणीच्या काळात ‘मिसा’ (मेन्टेनन्स आॅफ इंटर्नल सिक्युरिटी अ‍ॅक्ट) व ‘डीआयआर’अंतर्गत (डिफेन्स इंडिया रुल अ‍ॅक्ट) मोठ्या प्रमाणात सत्याग्रहींना बंधक बनविण्यात आले होते.

ठळक मुद्देनितीन गडकरी : त्यांच्यामुळेच वाचली लोकशाही, संघाचीदेखील आडकाठी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आणीबाणीच्या काळात ‘मिसा’ (मेन्टेनन्स आॅफ इंटर्नल सिक्युरिटी अ‍ॅक्ट) व ‘डीआयआर’अंतर्गत (डिफेन्स इंडिया रुल अ‍ॅक्ट) मोठ्या प्रमाणात सत्याग्रहींना बंधक बनविण्यात आले होते. त्यांच्यामुळेच लोकशाहीचे रक्षण झाले होते. इतर राज्यांतील सत्याग्रहींना विविध सवलती लागू झाल्या आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील ‘मिसा’बंदी सत्याग्रहींनादेखील सन्मानासह सवलती मिळाल्या पाहिजे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. राजकीय ‘मिसा’बंदी व ‘डीआयआर’ सत्याग्रहींच्या लोकतंत्र सेनानी संघातर्फे रविवारी एक दिवसीय सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेनंतर सत्याग्रहींनी गडकरी यांची महाल येथील निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी गडकरी बोलत होते.देशातील आठ राज्यात ‘मिसा’बंद्यांना विविध सवलती लागू आहेत.मध्य प्रदेशात तर सत्याग्रहींना मोठ्या प्रमाणात सवलती दिल्या आहेत. याच धर्तीवर राज्यातदेखील ‘मिसा’बंदी तसेच ‘डीआयआर’ पीडितांना सवलती लागू झाल्या पाहिजेत. सत्याग्रहींच्या मागण्यांना माझे समर्थन आहे.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी माझी चर्चादेखील झाली असून तेदेखील याबाबतीत सकारात्मक आहेत, असे गडकरी यांनी यावेळी सांगितले. ‘मिसा’बंदी सत्याग्रहींमध्ये अनेक जण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. अशा स्थितीत त्यांना सवलती लागू झाल्या तर संघाला ते मान्य राहील का, असा मुद्दा समोर आला होता. मात्र संघाची याला आडकाठी नसून लोकशाही वाचविणाºयांना सन्मान मिळालाच पाहिजे, असे प्रतिपादन गडकरी यांनी केले.दरम्यान, तत्पूर्वी भावसार समाज भवन येथे सभा पार पडली. यावेळी लोकतंत्र सेनानी संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सच्चिदानंद उपासने, राष्ट्रीय सचिव कोमल छेडा, प्रांताध्यक्ष जयप्रकाश पांडे, केंद्रप्रतिनिधी अविनाश संगवई, नागपूर अध्यक्ष अण्णाजी राजेधर, सचिव किशोर मुळे प्रामुख्याने उपस्थित होते. शिवाय छत्तीसगड, गोंदिया, नांदेड, अहमदनगर, वर्धा, जळगाव,हिंगोली, परभणी, नाशिक, खामगाव, बुलडाणा, मुंबई, अमरावती इत्यादी ठिकाणांहून प्रतिनिधी आले होते.देशातील आठ राज्यात ‘मिसा’बंद्यांना विविध सवलती लागू आहेत. यात उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, हरियाणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. मध्य प्रदेशात तर शिवराजसिंह सरकारने मिसाबंद्यांसह डीआयआर कायद्यांतर्गत बंदी सत्याग्रहींना प्रतिमाह २५ हजार रुपये मानधन, प्रवास व आरोग्य सेवेत मोठ्या प्रमाणात सवलती दिल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने आता संयमाची जास्त परीक्षा न घेता आम्हाला सन्मान द्यावा, असा यावेळी वक्त्यांचा सूर होता.‘त्या’ सत्याग्रहींना मदत करणारअनेक सत्याग्रहींचे आता निधन झाले असून काहींची प्रकृती खराब आहे. अशा सत्याग्रहींना प्रकृतीच्या अडचणी असतील किंवा कर्करोग, ह्रद्यविकार असेल तर त्यांना परिवारातील एक सदस्य म्हणून मी मदत करेन, असे आश्वासन गडकरी यांनी यावेळी दिले.