शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

सात आरोपींची जन्मठेप कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 01:48 IST

बहुचर्चित पिंटू शिर्के हत्याकांडावर अखेर मंगळवारी निर्णय आला. सर्वोच्च न्यायालयाने प्रकरणातील ११ पैकी ७ आरोपींची जन्मठेप व अन्य शिक्षा कायम ठेवली.

ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालय : मते, भद्रे, डहाके, गावंडे, कैथे, निंबर्ते व गायकीला दणका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बहुचर्चित पिंटू शिर्के हत्याकांडावर अखेर मंगळवारी निर्णय आला. सर्वोच्च न्यायालयाने प्रकरणातील ११ पैकी ७ आरोपींची जन्मठेप व अन्य शिक्षा कायम ठेवली. त्या आरोपींमध्ये विजय किसनराव मते, राजू विठ्ठलराव भद्रे, उमेश संपतराव डहाके, रितेश हिरामण गावंडे, किरण उमराव कैथे, कमलेश सीताराम निंबर्ते व दिनेश देवीदास गायकी यांचा समावेश आहे. मारोती ऊर्फ नव्वा संतोषराव वलके, मंगेश शिवाजीराव चव्हाण, पांडुरंग मोतीराम इंजेवार व महेश दामोदर बांते यांची जन्मठेप व अन्य शिक्षा रद्द करून त्यांना निर्दोष सोडण्याचा आदेश देण्यात आला. न्यायमूर्तीद्वय आदर्श गोयल व उदय लळीत यांनी हा निर्णय दिला.सत्र न्यायालयाचा निर्णय असा होता१८ आॅक्टोबर २०१३ रोजी सत्र न्यायालयाने प्रकरणातील १५ पैकी ८ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यात मते, भद्रे, डहाके, गावंडे, कैथे, निंबर्ते व गायकी यांच्यासह अयुब खान अमीर खानचा समावेश होता. वलके, मंगेश चव्हाण, इंजेवार व बांते यांच्यासह मयूर ऊर्फ बंटी शिवाजी चव्हाण, राजेश दयाराम कडू व संदीप नीळकंठ सणस यांना निर्दोष सोडण्यात आले होते.उच्च न्यायालयाने असा निर्णय दिलासत्र न्यायालयात शिक्षा झालेल्या आरोपींनी त्यांच्या शिक्षेविरुद्ध उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. तसेच, पिंटू शिर्केची आई विजया व राज्य शासनानेही सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले होते. दोषी आरोपींच्या शिक्षेत वाढ करण्याची व निर्दोष सुटलेल्या आरोपींना शिक्षा देण्याची त्यांची विनंती होती. उच्च न्यायालयाने सर्व अपिलांवर एकत्र सुनावणी करून २२ जून २०१५ रोजी निर्णय जाहीर केला. त्याद्वारे मते, भद्रे, डहाके, गावंडे, कैथे, निंबर्ते व गायकी यांची शिक्षा कायम ठेवण्यात आली तर, अयुब खानला निर्दोष सोडण्यात आले. तसेच, सत्र न्यायालयात निर्दोष सुटलेल्या वलके, मंगेश चव्हाण, इंजेवार व बांते यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.या जमिनीवरून होता वादराजे भोसले परिवारातील महाराणी अन्नपूर्णादेवी भोसले यांनी दिलीप शिर्के, उदय शिर्के व रणजित शिर्के यांना सक्करदरा येथील २१ एकर जागा भेट दिली होती. ११ मार्च २००१ रोजी पिंटू शिर्के जळगाव येथे लग्न समारंभासाठी गेला होता. दरम्यान, विजय मते व त्याच्या साथीदारांनी यापैकी काही जागेवर कब्जा केला. शिर्के कुटुंबीयांनी मतेला जमिनीवरील कब्जा सोडण्यास सांगितले, पण तो मानला नाही.अशी घडली घटना१८ जुलै २००१ रोजी आरोपी विजय मतेवर देशी कट्ट्यातून गोळीबार केल्याच्या आरोपाखाली पिंटू शिर्के व त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणावर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या सहाव्या माळ्यावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एम. सईद यांच्यासमक्ष सुनावणी सुरू होती. १९ जून २००२ रोजी सकाळी १०.३० ते १०.४५ वाजताच्या सुमारास पिंटू शिर्के, सहआरोपी सागर जैन, हितेश उके, पप्पू ऊर्फ नरेंद्र मालवीय आणि इतरांना पोलीस संरक्षणात सईद यांच्या न्यायालयात आणण्यात आले होते. पोलीस कॉन्स्टेबल दीपक त्रिवेदी हा पिंटू शिर्के आणि मालवीय यांना घेऊन होता. प्रकरण दुपारी १२.३० ते १ वाजतादरम्यान लागणार असल्याचे न्यायालय लिपिकाने सांगितल्यानंतर पोलिसांनी शिर्के आणि मालवीयला न्यायालयाच्या बाहेर आणले. दरम्यान, विजय मते व त्याच्या १४-१५ साथीदारांनी शिर्केवर गुप्ती, चाकू, कुकरी व भाल्याच्या पात्याने हल्ला करून त्याच्या देहाची अक्षरश: चाळण केली. त्यानंतर आरोपी पळून गेले. शिर्केचा मेयो रुग्णालयात नेताना वाटेतच मृत्यू झाला. सुरुवातीला पोलिसांनी प्रकरणाचा तपास केला. त्यानंतर हे प्रकरण गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आले. दरम्यान, गुन्हे शाखा आणि सदर पोलिसांनी एकूण १६ आरोपींना अटक केली होती. पुढे हे प्रकरण सीआयडीकडे सोपविण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयात आरोपींसाठी नागपुरातील वरिष्ठ वकील सुबोध धर्माधिकारी, वरिष्ठ वकील अविनाश गुप्ता, अ‍ॅड. आर. के. तिवारी, अ‍ॅड. उदय डबले व अ‍ॅड. प्रफुल्ल मोहगावकर यांनी कामकाज पाहिले. शासनातर्फे मुख्य वकील निशांत काटनेश्वरकर यांनी बाजू मांडली.