शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
4
shefali jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
7
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
10
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
11
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
12
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
13
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
14
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
15
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
16
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
17
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
18
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
19
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
20
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले

सात आरोपींची जन्मठेप कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 01:48 IST

बहुचर्चित पिंटू शिर्के हत्याकांडावर अखेर मंगळवारी निर्णय आला. सर्वोच्च न्यायालयाने प्रकरणातील ११ पैकी ७ आरोपींची जन्मठेप व अन्य शिक्षा कायम ठेवली.

ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालय : मते, भद्रे, डहाके, गावंडे, कैथे, निंबर्ते व गायकीला दणका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बहुचर्चित पिंटू शिर्के हत्याकांडावर अखेर मंगळवारी निर्णय आला. सर्वोच्च न्यायालयाने प्रकरणातील ११ पैकी ७ आरोपींची जन्मठेप व अन्य शिक्षा कायम ठेवली. त्या आरोपींमध्ये विजय किसनराव मते, राजू विठ्ठलराव भद्रे, उमेश संपतराव डहाके, रितेश हिरामण गावंडे, किरण उमराव कैथे, कमलेश सीताराम निंबर्ते व दिनेश देवीदास गायकी यांचा समावेश आहे. मारोती ऊर्फ नव्वा संतोषराव वलके, मंगेश शिवाजीराव चव्हाण, पांडुरंग मोतीराम इंजेवार व महेश दामोदर बांते यांची जन्मठेप व अन्य शिक्षा रद्द करून त्यांना निर्दोष सोडण्याचा आदेश देण्यात आला. न्यायमूर्तीद्वय आदर्श गोयल व उदय लळीत यांनी हा निर्णय दिला.सत्र न्यायालयाचा निर्णय असा होता१८ आॅक्टोबर २०१३ रोजी सत्र न्यायालयाने प्रकरणातील १५ पैकी ८ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यात मते, भद्रे, डहाके, गावंडे, कैथे, निंबर्ते व गायकी यांच्यासह अयुब खान अमीर खानचा समावेश होता. वलके, मंगेश चव्हाण, इंजेवार व बांते यांच्यासह मयूर ऊर्फ बंटी शिवाजी चव्हाण, राजेश दयाराम कडू व संदीप नीळकंठ सणस यांना निर्दोष सोडण्यात आले होते.उच्च न्यायालयाने असा निर्णय दिलासत्र न्यायालयात शिक्षा झालेल्या आरोपींनी त्यांच्या शिक्षेविरुद्ध उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. तसेच, पिंटू शिर्केची आई विजया व राज्य शासनानेही सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले होते. दोषी आरोपींच्या शिक्षेत वाढ करण्याची व निर्दोष सुटलेल्या आरोपींना शिक्षा देण्याची त्यांची विनंती होती. उच्च न्यायालयाने सर्व अपिलांवर एकत्र सुनावणी करून २२ जून २०१५ रोजी निर्णय जाहीर केला. त्याद्वारे मते, भद्रे, डहाके, गावंडे, कैथे, निंबर्ते व गायकी यांची शिक्षा कायम ठेवण्यात आली तर, अयुब खानला निर्दोष सोडण्यात आले. तसेच, सत्र न्यायालयात निर्दोष सुटलेल्या वलके, मंगेश चव्हाण, इंजेवार व बांते यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.या जमिनीवरून होता वादराजे भोसले परिवारातील महाराणी अन्नपूर्णादेवी भोसले यांनी दिलीप शिर्के, उदय शिर्के व रणजित शिर्के यांना सक्करदरा येथील २१ एकर जागा भेट दिली होती. ११ मार्च २००१ रोजी पिंटू शिर्के जळगाव येथे लग्न समारंभासाठी गेला होता. दरम्यान, विजय मते व त्याच्या साथीदारांनी यापैकी काही जागेवर कब्जा केला. शिर्के कुटुंबीयांनी मतेला जमिनीवरील कब्जा सोडण्यास सांगितले, पण तो मानला नाही.अशी घडली घटना१८ जुलै २००१ रोजी आरोपी विजय मतेवर देशी कट्ट्यातून गोळीबार केल्याच्या आरोपाखाली पिंटू शिर्के व त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणावर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या सहाव्या माळ्यावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एम. सईद यांच्यासमक्ष सुनावणी सुरू होती. १९ जून २००२ रोजी सकाळी १०.३० ते १०.४५ वाजताच्या सुमारास पिंटू शिर्के, सहआरोपी सागर जैन, हितेश उके, पप्पू ऊर्फ नरेंद्र मालवीय आणि इतरांना पोलीस संरक्षणात सईद यांच्या न्यायालयात आणण्यात आले होते. पोलीस कॉन्स्टेबल दीपक त्रिवेदी हा पिंटू शिर्के आणि मालवीय यांना घेऊन होता. प्रकरण दुपारी १२.३० ते १ वाजतादरम्यान लागणार असल्याचे न्यायालय लिपिकाने सांगितल्यानंतर पोलिसांनी शिर्के आणि मालवीयला न्यायालयाच्या बाहेर आणले. दरम्यान, विजय मते व त्याच्या १४-१५ साथीदारांनी शिर्केवर गुप्ती, चाकू, कुकरी व भाल्याच्या पात्याने हल्ला करून त्याच्या देहाची अक्षरश: चाळण केली. त्यानंतर आरोपी पळून गेले. शिर्केचा मेयो रुग्णालयात नेताना वाटेतच मृत्यू झाला. सुरुवातीला पोलिसांनी प्रकरणाचा तपास केला. त्यानंतर हे प्रकरण गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आले. दरम्यान, गुन्हे शाखा आणि सदर पोलिसांनी एकूण १६ आरोपींना अटक केली होती. पुढे हे प्रकरण सीआयडीकडे सोपविण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयात आरोपींसाठी नागपुरातील वरिष्ठ वकील सुबोध धर्माधिकारी, वरिष्ठ वकील अविनाश गुप्ता, अ‍ॅड. आर. के. तिवारी, अ‍ॅड. उदय डबले व अ‍ॅड. प्रफुल्ल मोहगावकर यांनी कामकाज पाहिले. शासनातर्फे मुख्य वकील निशांत काटनेश्वरकर यांनी बाजू मांडली.