शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

विस्कटली मोलकरणींच्या संसाराची घडी; विदारक परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 18:44 IST

कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली की गरीब कुटुंबांना सर्वाधिक झळ सोसावी लागते. कोरोना महामारीच्या दुष्टचक्राने हीच अवस्था सगळ््यांंकडे घरकाम करणाऱ्या मोलकरणींची झाली आहे.

ठळक मुद्देआर्थिक विवंचनेत सापडले कुटुंब

निशांत वानखेडेनागपूर : कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली की गरीब कुटुंबांना सर्वाधिक झळ सोसावी लागते. कोरोना महामारीच्या दुष्टचक्राने हीच अवस्था सगळ््यांंकडे घरकाम करणाऱ्या मोलकरणींची झाली आहे. १५ दिवसांपासून काम बंद झाले आहे, मार्च महिन्याचा पगारही रखडला आहे. घरचे पुरुषही मोलमजूरी करणारेच. त्यामुळे मोलकरणींच्या कुटुंबाला अतिशय हलाखीच्या परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. घर कसे चालवावे, या विवंचनेत त्या सापडल्या आहेत.जाटतरोडीमध्ये राहणाºया सीमा पाटील आणि मालाबाई वनवे यांची व्यथा ही तमाम मोलकरणींच्या विदारकतेचे चित्र उभी करणारी आहे. जाटतरोडी नं. १ मध्ये राहणाºया सीमा अर्जुन पाटील. घरी पती व तीन मुलांचा संसार. त्यांचे पती कॉटन मार्केट परिसरात ठेला लावून फळ विक्रीचे काम करतात. त्यांचे कामही दीड-दोन महिन्यांपासून बंद आहे. माकेटमध्ये फळ विक्रीसाठी जाताही येत नाही. सीमा या दोन-तीन घरी जाऊन काम करतात. त्यातून चार-साडेचार हजार पगार मिळतो. सुट्या झाल्या तर पैसा कापला जातो व पगार यापेक्षा कमी होतो. २२ मार्चपासून त्यांचेही काम बंद झाले आहे. शिवाय मार्च महिन्याचा पगारही यात रखडला. घरमालकांनीही तो देण्याची तसदी घेतली नाही. घरात असलेला पैसा अडका आणि धान्यही संपत आले आहे. किराणा दुकानदारांनी अधिक उधारी देण्यास नकार दिला आहे. लॉकडाउनचा काळ पुढेही वाढणार असल्याचे दिसते. त्यामुळे आता उपाशी राहून जगायचे कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. जाटतरोडी नं. २, इंदिरानगरमध्ये राहणाºया मालाबाई देवीदास वनवे यांची परिस्थिती काही वेगळी नाही. पती रिक्षा चालक. काही वर्षापूर्वी लकवा मारलेला. आजही त्यांच्या एक हात काम करीत नाही. या अवस्थेत सकाळी रिक्षा घेऊन जातात पण सवारी मिळत नसल्याने निराश परतावे लागते. घरी अर्धांगवायुने पडलेली म्हातारी सासू व दोन मुले आहेत. मोठ्या मुलाचे कामही लॉकडाऊनमध्ये बंद पडले. मालाबाई यांचे काम २२ मार्चपासून बंद झाले. त्या महिन्याचा पगारही मिळाला नाही. या काळात होते नव्हते ते सर्व संपले आहे. पैसा नाही आणि धान्यही नाही. काही दिवस उधार करून घर चालविले पण आता तेही मिळणे थांबले. आता जगायचे कसे, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. मालाबाई यांचे कुटुंब हताश आणि निराश मनस्थितीत जगत आहे. सीमा पाटील आणि मालाबाई यांचे कुटुंब त्या हजारो मोलकरिणींचे प्रतिनिधित्व करणारे आहे ज्या अतिशय विदारक अवस्थेत दिवस कंठत आहेत. कोरोनाच्या उद्रेकाने त्यांचे जगणेच उद्ध्वस्त केले आहे. या अवस्थेत त्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे.- या सुट्यात पगार देण्याचे आवाहन फोल आपल्या घरी काम करणाºया महिलांना कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाउनच्या काळात सुट्यांचा पगार कापू नये, असे भावनिक आवाहन पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि अनेक संघटनांनीही केले आहे. मात्र या आवाहनाला फारसे कुणी गंभीरतेने घेतले नाही. सीमा पाटील व मालाबाई वनवे यांनी सांगितल्यानुसार मार्च महिन्याचा पगार देण्याची तसदीही घर मालकांनी घेतली नाही. एखादी सुटी पडली तरी त्याचाही पैसा कापला जातो. त्यामुळे लॉकडाउनच्या काळातील पैसा देतील असा मानुसपणा दिसत नाही.- सरकारी धान्य दुकानाचीही मदत नाहीसीमा आणि मालाबाई यांच्याकडे शेंदरी रंगाचे एपीएल रेशनकार्ड आहे. त्यामुळे सरकारी धान्य दुकानदारांनी त्यांना धान्य देण्यास नकार दिला. केवळ बीपीएल कार्डधारकांनाच धान्य मिळेल, असे ते सांगतात. आमच्या अशा हालाखीच्या परिस्थितीत तरी आम्हाला स्वस्तात धान्य देण्यात यावे, अशी मागणी करीत आम्ही काय उपाशी मरावे काय, असा उद्विग्न सवाल त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस