शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

ग्रीडच्या व्यवस्थापनात लागले महावितरण : पंतप्रधानांच्या आवाहनानंतर वीज कंपनी सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 00:56 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या रविवारी रात्री ९ वाजता नऊ मिनिटांसाठी आपापल्या घरातील लाईट बंद करून मेणबत्ती, दिवे, टॉर्च किंवा मोबाईलची फ्लॅश लाईट प्रज्वलित करण्याचे आवाहन केले आहे. एकाचवेळी सर्वांनी वीज बंद केली तर याचा प्रतिकूल परिणाम पडण्याचा दावाही काहींनी वर्तविली आहे.

ठळक मुद्दे महागडे वीज युनिट राहणार बंद 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या रविवारी रात्री ९ वाजता नऊ मिनिटांसाठी आपापल्या घरातील लाईट बंद करून मेणबत्ती, दिवे, टॉर्च किंवा मोबाईलची फ्लॅश लाईट प्रज्वलित करण्याचे आवाहन केले आहे. कोरोना विषाणूविरुद्ध एकजूटता दाखवण्यासाठी करण्यात आलेल्या या आवाहनानंतर राज्य वीज वितरण कंपनी महावितरण सक्रिय झाली आहे. कंपनीतील सूत्रानुसार याचा परिणाम पडण्याची शक्यता नाही. मात्र तरीही खबरदारी म्हणून ग्रीड व्यवस्थापनावर विशेष लक्ष देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, नॅशनल ग्रीडशी संबंधित पश्चिमी राज्यांची शुक्रवारी यासंदर्भात बैठकही पार पडली. त्या बैठकीत रविवारसाठी विशेष रूपरेषा ठरवण्यात आली आहे. यासोबतच एकाचवेळी सर्वांनी वीज बंद केली तर याचा प्रतिकूल परिणाम पडण्याचा दावाही काहींनी वर्तविली आहे.विशेष म्हणजे पंतप्रधानांनी केवळ लाईट बंद करण्याचे आवाहन केले आहे. टीव्ही, फ्रीज आदी वीज उपकरणे या दरम्यान सुरू राहतील. महावितरणचे म्हणणे आहे की, राज्यात वीज वितरण यंत्रणा अतिशय मजबूत आहे. त्यामुळे सर्व लाईट बंद झाले तरी याचा परिणाम ग्रीडवर पडणार नाही. दुसरीकडे या क्षेत्रातील तज्ज्ञानुसार, या परिस्थितीत जवळपास ५०० मेगावॅट विजेची मागणी कमी होईल. विजेची मागणी कमी-जास्त झाल्यास त्याचा परिणाम ग्रीडच्या फ्रिक्वेन्सीवर पडतो. ही बाब लक्षात घेऊन कंपनीने स्टेट लोड डिस्पॅच सेंटरला सतर्क केले आहे. ग्रीडची फ्रिक्वेन्सी ४९ पेक्षा कमी आणि ५१ पेक्षा अधिक होऊ दिली जाणार नाही. कंपनीतील सूत्रानुसार परिस्थिती पाहता त्या वीज युनिटला बंद ठेवण्याची तयारी केली जात आहे, ज्यांचे वीज उत्पादन दर अधिक आहे. आवश्यकता पडलीच तर वीज कंपनी पॉवर एक्सचेंजमधून वीज खरेदी करेल. जिथे प्रति युनिट अडीच रुपये वीज दर आहेत. तसेही लॉकडाऊनमुळे औद्योगिक विजेची मागणी मोठ्या प्रमाणावर घटलेली आहे. गेल्या वर्षी याच काळात राज्यात २३,१५० मेगावॉट विजेची मागणी होती ती आता केवळ १२,४६२ मेगावॅट राहिली आहे.ग्रीड फेल पडल्यास मोदी जबाबदार : ऊर्जामंत्री राऊतराज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटले आहे की, लाखो-कोट्यवधी लोकांनी जर एकाचवेळी वीज बंद केली तर ग्रीड फेल होऊ शकतो. यामुळे आवश्यक सेवा ठप्प होतील. लोकं लिफ्टमध्ये अडकून मरू शकतात. त्यामुळे नागरिकांनी रविवारी रात्री ९ वाजता वीज सुरू ठेवून दिवे जाळावेत, असे आवाहनही केले आहे. राऊत यांचे म्हणणे आहे की, राज्याचा ऊर्जामंत्री या नात्याने ते नागरिकांना संभावित धोक्यापासून सावध करीत आहेत. ऊर्जामंत्री राऊत यांचे म्हणणे आहे की, पंतप्रधान मोदी यांचे लाईट बंद करण्याचे आवाहन पोरखेळ आहे. लोकांचे लक्ष मूळ मुद्यांकडून हटवण्याचा हा प्रयत्न आहे. पंतप्रधान मोदी यांनी रुग्णालयांमध्ये मास्क, व्हेंटिलेटर पोहोचवायला हवेत. पंतप्रधान देशातील नागरिकांशी चिटींग करीत असल्याचेही ऊर्जामंत्री राऊत यांनी म्हटले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणPower Shutdownभारनियमन