शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

मे महिन्यात महाराष्ट्रात दुप्पट वीज कपात; एप्रिलअखेर कोयना धरण कोरडे पडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2022 08:00 IST

Nagpur News एप्रिलअखेर धरण कोरडे पडेल आणि त्यानंतर तीन हजार मेगावॉट असलेली वीज टंचाई पाच हजार मेगावॉटवर जाईल आणि महावितरणला दुप्पट लोडशेडिंग करावे लागेल. अनेक भागात वीजपुरवठा खंडित होईल.

आशिष रॉय

नागपूर : ऊर्जा विभागाच्या गलथान कारभारामुळे मे महिन्यात राज्यातील लोडशेडिंग दुपटीने वाढणार आहे. महाजेनकोच्या विरोधानंतरही सध्या लोडशेडिंग कमी करण्यासाठी विभागाने अठराशे मेगावॉटचे कोयना जलविद्युत केंद्र पूर्ण क्षमतेने चालवण्यास सांगितले आहे. मात्र, एप्रिलअखेर धरण कोरडे पडेल आणि त्यानंतर तीन हजार मेगावॉट असलेली वीज टंचाई पाच हजार मेगावॉटवर जाईल आणि महावितरणला दुप्पट लोडशेडिंग करावे लागेल. लोडशेडिंग केवळ तासांनीच वाढणार नाही तर अनेक भागात वीजपुरवठा खंडित होईल.

महाजेनकोच्या अधिकाऱ्याने सांगितले की, कोयनामध्ये जलविद्युत निर्मितीसाठी फक्त ७ टीएमसी पाणी शिल्लक होते; परंतु जलसंपदा विभागाने आणखी १० टीएमसी पाणी वापरण्यास परवानगी दिली. मात्र, हा प्लांट रात्रंदिवस सुरू असल्याने एप्रिलअखेरपर्यंत हे अतिरिक्त पाणी संपेल आणि त्यानंतर विजेची परिस्थिती अनियंत्रित होईल. जूनच्या सुरुवातीपर्यंत पाणी टिकावे यासाठी प्लांट दिवसातून केवळ ८ ते १० तास चालवला पाहिजे.

सध्या जी-१, जी-२ आणि जी-३ श्रेणी फीडरवर लोडशेडिंग केले जात आहे, ज्यांचे वितरण आणि संकलन नुकसान ५८ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. मात्र कोयनानिर्मिती थांबल्यानंतर आम्हाला डी, ई आणि एफ श्रेणी फीडरमध्येदेखील वीज कपात सुरू करावी लागेल. आम्हाला आशा आहे की, ए, बी आणि सी श्रेणी फीडरवर (डीसीएल ३४ टक्क्यांपेक्षा कमी) लोडशेडिंग करावे लागेल अशी परिस्थिती उद्भवणार नाही अन्यथा प्रामाणिक ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागेल, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

राज्य सरकार कोळसा टंचाईसाठी केंद्र सरकारला जबाबदार धरत आहे. मात्र, महाजेनकोकडे हिवाळ्यातही कोळसा नसल्याची वस्तुस्थिती आहे. डब्ल्यूसीएलला दोन हजार ६०० कोटी रुपये देण्यास कंपनीला आलेले अपयश हे एक कारण आहे. महावितरणने बिले भरली नसल्यामुळे महाजेनको पैसे देऊ शकली नाही. शिवाय, राज्य सरकारच्या विभागांनी नऊ हजार कोटींहून अधिकची बिले भरलेली नाहीत. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून महावितरणला दिवाळखोरीकडे कसे नेले आहे याचा ‘लोकमत’ने पर्दाफाश केला आहे. आता या उन्हाळ्यात राज्यातील जनतेला त्याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे.

महावितरणकडून विक्रमी वसुली; पण तरीदेखील पैसे नाहीत

महावितरणने मार्च महिन्यात सर्व प्रकारच्या ग्राहकांकडून विक्रमी ७,१०० कोटी रुपये वसूल केले होते. मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी मागील बिले भरली. मात्र, तरीही महागडी वीज घेण्यासाठी पैसे नसल्याचा दावा कंपनीने केला आहे. कंपनीने पुरवठादार आणि कंत्राटदारांना पैसे दिलेले नाहीत. हा पैसा गेला कुठे, असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. कंपनीने विक्रमी वसुली केली नाही, असा विचित्र दावा कंपनीच्या प्रवक्त्याने केला आहे.

टॅग्स :electricityवीज