शहरं
Join us  
Trending Stories
1
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
2
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
3
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
4
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
5
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
6
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
7
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
8
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
9
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
10
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
11
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
12
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
13
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
14
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग
15
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
16
दिवाळीच्या फटाक्यांवर सरसकट बंदीने प्रदूषणाचा प्रश्न सुटेल काय?
17
सुंदर पिचाई, नाडेला यांची ‘अळी मिळी गुपचिळी’ का?; आयटी क्षेत्रात मोठी अस्वस्थता
18
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
19
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
20
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन

मे महिन्यात महाराष्ट्रात दुप्पट वीज कपात; एप्रिलअखेर कोयना धरण कोरडे पडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2022 08:00 IST

Nagpur News एप्रिलअखेर धरण कोरडे पडेल आणि त्यानंतर तीन हजार मेगावॉट असलेली वीज टंचाई पाच हजार मेगावॉटवर जाईल आणि महावितरणला दुप्पट लोडशेडिंग करावे लागेल. अनेक भागात वीजपुरवठा खंडित होईल.

आशिष रॉय

नागपूर : ऊर्जा विभागाच्या गलथान कारभारामुळे मे महिन्यात राज्यातील लोडशेडिंग दुपटीने वाढणार आहे. महाजेनकोच्या विरोधानंतरही सध्या लोडशेडिंग कमी करण्यासाठी विभागाने अठराशे मेगावॉटचे कोयना जलविद्युत केंद्र पूर्ण क्षमतेने चालवण्यास सांगितले आहे. मात्र, एप्रिलअखेर धरण कोरडे पडेल आणि त्यानंतर तीन हजार मेगावॉट असलेली वीज टंचाई पाच हजार मेगावॉटवर जाईल आणि महावितरणला दुप्पट लोडशेडिंग करावे लागेल. लोडशेडिंग केवळ तासांनीच वाढणार नाही तर अनेक भागात वीजपुरवठा खंडित होईल.

महाजेनकोच्या अधिकाऱ्याने सांगितले की, कोयनामध्ये जलविद्युत निर्मितीसाठी फक्त ७ टीएमसी पाणी शिल्लक होते; परंतु जलसंपदा विभागाने आणखी १० टीएमसी पाणी वापरण्यास परवानगी दिली. मात्र, हा प्लांट रात्रंदिवस सुरू असल्याने एप्रिलअखेरपर्यंत हे अतिरिक्त पाणी संपेल आणि त्यानंतर विजेची परिस्थिती अनियंत्रित होईल. जूनच्या सुरुवातीपर्यंत पाणी टिकावे यासाठी प्लांट दिवसातून केवळ ८ ते १० तास चालवला पाहिजे.

सध्या जी-१, जी-२ आणि जी-३ श्रेणी फीडरवर लोडशेडिंग केले जात आहे, ज्यांचे वितरण आणि संकलन नुकसान ५८ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. मात्र कोयनानिर्मिती थांबल्यानंतर आम्हाला डी, ई आणि एफ श्रेणी फीडरमध्येदेखील वीज कपात सुरू करावी लागेल. आम्हाला आशा आहे की, ए, बी आणि सी श्रेणी फीडरवर (डीसीएल ३४ टक्क्यांपेक्षा कमी) लोडशेडिंग करावे लागेल अशी परिस्थिती उद्भवणार नाही अन्यथा प्रामाणिक ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागेल, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

राज्य सरकार कोळसा टंचाईसाठी केंद्र सरकारला जबाबदार धरत आहे. मात्र, महाजेनकोकडे हिवाळ्यातही कोळसा नसल्याची वस्तुस्थिती आहे. डब्ल्यूसीएलला दोन हजार ६०० कोटी रुपये देण्यास कंपनीला आलेले अपयश हे एक कारण आहे. महावितरणने बिले भरली नसल्यामुळे महाजेनको पैसे देऊ शकली नाही. शिवाय, राज्य सरकारच्या विभागांनी नऊ हजार कोटींहून अधिकची बिले भरलेली नाहीत. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून महावितरणला दिवाळखोरीकडे कसे नेले आहे याचा ‘लोकमत’ने पर्दाफाश केला आहे. आता या उन्हाळ्यात राज्यातील जनतेला त्याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे.

महावितरणकडून विक्रमी वसुली; पण तरीदेखील पैसे नाहीत

महावितरणने मार्च महिन्यात सर्व प्रकारच्या ग्राहकांकडून विक्रमी ७,१०० कोटी रुपये वसूल केले होते. मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी मागील बिले भरली. मात्र, तरीही महागडी वीज घेण्यासाठी पैसे नसल्याचा दावा कंपनीने केला आहे. कंपनीने पुरवठादार आणि कंत्राटदारांना पैसे दिलेले नाहीत. हा पैसा गेला कुठे, असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. कंपनीने विक्रमी वसुली केली नाही, असा विचित्र दावा कंपनीच्या प्रवक्त्याने केला आहे.

टॅग्स :electricityवीज