शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

Maharashtra Government : मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 00:18 IST

महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारमध्ये नागपूर शहर व जिल्ह्यातून कुणाची मंत्रिपदी वर्णी लागणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देदेशमुख, राऊत, जयस्वाल, केदारांची नावे चर्चेत : नव्या चेहऱ्यालाही संधीची शक्यता

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे सरकार स्थापन होत आहे. गुरुवारी नव्या सरकारचा शपथविधी होत आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारमध्ये नागपूर शहर व जिल्ह्यातून कुणाची मंत्रिपदी वर्णी लागणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. भविष्यात होऊ घातलेल्या महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका विचारात घेता शहर व ग्रामीण असा समतोल साधण्याचा प्रयत्न केला जाईल, असे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.नागपूर शहरात काँग्रेसचे माजी मंत्रीनितीन राऊत, आ. विकास ठाकरे, ग्रामीणमध्ये आ. सुनील केदार व आ. राजू पारवे तर राष्ट्रवादीकडून माजी मंत्रीअनिल देशमुख विजयी झाले आहेत. जिल्ह्यात अनिल देशमुख हे राष्ट्रवादीचे एकमेव आमदार असल्यामुळे त्यांची मंत्रिपदी वर्णी पक्की मानली जात आहे.नुकतेच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी नागपूर जिल्ह्याचा पीक पाहणी दौरा केला. यादौऱ्यात देशमुख यांनी पवार यांचे सारथ्य केले होते. देशमुख यांच्या घरीही भेट दिली होती. संत्रा उत्पादकांशी संवाद साधला होता. त्यावेळी देशमुख ज्या पद्धतीने पवारांसोबत फिरत होते, त्यावरून त्यांचा नंबर पक्का मानला जात आहे. १९९५ ते २०१४ या काळात देशमुख मंत्री होते. गेल्या आघाडी सरकारमध्ये त्यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्रिपद भूषविले होते.काँग्रेसच्या कोट्यात मंत्रिपदासाठी काहिशी रस्सीखेच होऊ शकते. आ. नितीन राऊत हे ज्येष्ठ सदस्य आहेत. प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व अ.भा. काँग्रेस समितीच्या अनुसूचित जाती आघाडीचे ते राष्ट्रीय अध्यक्षही आहेत. विदर्भातील मागासवर्गीय नेता म्हणून त्यांच्या नावाला झुकते माप दिले जाऊ शकते. राऊत हे आघाडी सरकारमध्ये रोजगार हमी व जलसंवर्धन मंत्री होेते. ज्येष्ठतेमुळे आ. सुनील केदार यांनाही संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.काँग्रेसचे शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे व उमरेडचे आमदार राजू पारवे हे पहिल्यांदाच विधानसभेत पोहचले आहेत. मात्र, काँग्रेस नेत्यांशी असलेले निष्ठेचे संबंध पाहता ठाकरे यांच्या रूपात नव्या चेहऱ्याला लॉटरी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.आ. आशिष जयस्वाल हे मुळातच शिवसैनिक आहेत. युतीमध्ये रामटेकची जागा भाजपला सुटल्यामुळे ते अपक्ष म्हणून लढले व विजयी झाले. विजयी होताच त्यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेला समर्थन जाहीर केले. युती सरकारमध्ये त्यांना खनिकर्म महामंडळ देण्यात आले होते. नागपूरसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यात शिवसेनेचा झेंडा घट्ट रोवण्यासाठी जयस्वाल यांना संधी मिळणे निश्चित मानले जात आहे. तीन प्रमुख पक्ष व मित्रपक्षांचे हे सरकार असल्यामुळे वाटाघाटीत कमी मंत्रिपदे मिळणार आहेत. त्यामुळे मंत्रिपदासाठी पक्षांतर्गत रस्सीखेच होत असून यात कोण बाजी मारतो हे गुरुवारी शपथविधीनंतर स्पष्ट होईल.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारministerमंत्रीAnil Deshmukhअनिल देशमुखNitin Rautनितीन राऊतAshish Jaiswalआशीष जयस्वाल