शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

महाराष्ट्र भारनियमन मुक्त : विश्वास पाठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 22:31 IST

महाराष्ट्र २५ हजार मेगावॅटपर्यंत विजेची पूर्ती करण्यास सक्षम झाला असून महाराष्ट्र भारनियमनमुक्त झाल्याचा दावा, महाराष्ट्र राज्य वीज मंडळ सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी केला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र २५ हजार मेगावॅटपर्यंत विजेची पूर्ती करण्यास सक्षम झाला असून महाराष्ट्र भारनियमनमुक्त झाल्याचा दावा, महाराष्ट्र राज्य वीज मंडळ सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी केला.पाठक यांनी मागील चार वर्षातील उपलब्धीबाबत माहिती दिली. त्यांनी आॅक्टोबर महिन्यात १८ हजार मेगावॅटवरुन विजेची मागणी २४९०० मेगावॅट झाल्याचे मान्य करून ५०० मेगावॅटचे लोडशेडिंग करण्यात आल्याचे सांगितले. परंतु याचा प्रभाव वीज वितरणाची हानी अधिक आहे तेथे पडला. तेम्हणाले, मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेनुसार शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा प्रयत्न होत आहे. राळेगाव सिद्धी, यवतमाळच्या कोळंबी आणि नागपूरच्या खापात योजना सुरु झाली आहे. राज्याच्या ४५ लाख शेतकऱ्यांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज देण्याचा प्रयत्न आहे.नव्या तंत्रज्ञानाचा उपयोगपाठक यांनी सांगितले की, खर्च वाचविण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग होत आहे. सेंट्रलाईज्ड बिलींग सिस्टीममुळे बिलातील त्रुटी दूर होत आहेत. अ‍ॅपच्या साहाय्याने ग्राहक मीटरवर लक्ष ठेवू शकतात. भाजपाने वीज वितरण फ्रेन्चाईसीला कायम ठेवल्याबद्दल ते म्हणाले, नागपुरात फ्रेन्चाईसीमुळे विजेची हानी ३२ टक्क्यांवरून १३.६ टक्के झाली. ग्राहकांना लाभ देण्यासाठी फ्रेन्चाईसी सुरु आहे.विदर्भात स्वस्त वीज अशक्यपाठक यांनी विदर्भात स्वस्त वीज देण्याच्या मागणीबाबत सांगितले की, कुणाला स्वस्त वीज देणे शक्य नाही. राज्य सरकारने विदर्भ आणि मराठवाडात उद्योगांचे पलायन रोखण्यासाठी उद्योगांना एक हजार कोटीची सबसिडी दिली आहे.शासनाचा भाग असलेल्या कार्यकर्त्यांवर टीकाभाजपा सरकारने सामाजिक कार्यकर्ते श्रमिक नेता प्रताप होगाडे आणि आशिष चंदराना यांना कृषी खर्चाच्या तपासासाठी गठित समितीत सामील केले. समितीचे अध्यक्ष विश्वास पाठक होते. कमिटीचा अहवाल आतापर्यंत आला नाही. याबाबत पाठक यांनी दोघांवर टीका करून कमिटीत सामील होऊनही त्यांनी विरोध कायम ठेवल्याने आयआयटीकडून अहवाल तयार करुन महावितरणला सोपविल्याचे सांगितले.कोळसा संकटाचा सामना करण्याची तयारीपावसाळ्यात कोळशाच्या खाणीत पाणी भरल्यामुळे उत्पादनावर परिणाम झाल्याचे पाठक यांनी सांगितले. पुढील वर्षी ही समस्या येणार नसून,महाजनकोशिवाय इतर स्रोतांपासून वीज उपलब्ध होत असल्याचे सांगितले. देशाची चिंता करणे महावितरणची जबाबदारी नसल्याचे सांगून पाठक फसले. त्यांना कृषी जोडणीचा उपयोग इतर कारणांसाठी होत असल्याबाबत प्रश्न विचारला होता. ते म्हणाले, कंपनी चोरीच्या विरुद्ध जागरुक आहे. कठोर कारवाई करण्यात येते.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणMaharashtraमहाराष्ट्र