शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

महाराष्ट्र भारनियमन मुक्त : विश्वास पाठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 22:31 IST

महाराष्ट्र २५ हजार मेगावॅटपर्यंत विजेची पूर्ती करण्यास सक्षम झाला असून महाराष्ट्र भारनियमनमुक्त झाल्याचा दावा, महाराष्ट्र राज्य वीज मंडळ सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी केला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र २५ हजार मेगावॅटपर्यंत विजेची पूर्ती करण्यास सक्षम झाला असून महाराष्ट्र भारनियमनमुक्त झाल्याचा दावा, महाराष्ट्र राज्य वीज मंडळ सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी केला.पाठक यांनी मागील चार वर्षातील उपलब्धीबाबत माहिती दिली. त्यांनी आॅक्टोबर महिन्यात १८ हजार मेगावॅटवरुन विजेची मागणी २४९०० मेगावॅट झाल्याचे मान्य करून ५०० मेगावॅटचे लोडशेडिंग करण्यात आल्याचे सांगितले. परंतु याचा प्रभाव वीज वितरणाची हानी अधिक आहे तेथे पडला. तेम्हणाले, मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेनुसार शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा प्रयत्न होत आहे. राळेगाव सिद्धी, यवतमाळच्या कोळंबी आणि नागपूरच्या खापात योजना सुरु झाली आहे. राज्याच्या ४५ लाख शेतकऱ्यांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज देण्याचा प्रयत्न आहे.नव्या तंत्रज्ञानाचा उपयोगपाठक यांनी सांगितले की, खर्च वाचविण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग होत आहे. सेंट्रलाईज्ड बिलींग सिस्टीममुळे बिलातील त्रुटी दूर होत आहेत. अ‍ॅपच्या साहाय्याने ग्राहक मीटरवर लक्ष ठेवू शकतात. भाजपाने वीज वितरण फ्रेन्चाईसीला कायम ठेवल्याबद्दल ते म्हणाले, नागपुरात फ्रेन्चाईसीमुळे विजेची हानी ३२ टक्क्यांवरून १३.६ टक्के झाली. ग्राहकांना लाभ देण्यासाठी फ्रेन्चाईसी सुरु आहे.विदर्भात स्वस्त वीज अशक्यपाठक यांनी विदर्भात स्वस्त वीज देण्याच्या मागणीबाबत सांगितले की, कुणाला स्वस्त वीज देणे शक्य नाही. राज्य सरकारने विदर्भ आणि मराठवाडात उद्योगांचे पलायन रोखण्यासाठी उद्योगांना एक हजार कोटीची सबसिडी दिली आहे.शासनाचा भाग असलेल्या कार्यकर्त्यांवर टीकाभाजपा सरकारने सामाजिक कार्यकर्ते श्रमिक नेता प्रताप होगाडे आणि आशिष चंदराना यांना कृषी खर्चाच्या तपासासाठी गठित समितीत सामील केले. समितीचे अध्यक्ष विश्वास पाठक होते. कमिटीचा अहवाल आतापर्यंत आला नाही. याबाबत पाठक यांनी दोघांवर टीका करून कमिटीत सामील होऊनही त्यांनी विरोध कायम ठेवल्याने आयआयटीकडून अहवाल तयार करुन महावितरणला सोपविल्याचे सांगितले.कोळसा संकटाचा सामना करण्याची तयारीपावसाळ्यात कोळशाच्या खाणीत पाणी भरल्यामुळे उत्पादनावर परिणाम झाल्याचे पाठक यांनी सांगितले. पुढील वर्षी ही समस्या येणार नसून,महाजनकोशिवाय इतर स्रोतांपासून वीज उपलब्ध होत असल्याचे सांगितले. देशाची चिंता करणे महावितरणची जबाबदारी नसल्याचे सांगून पाठक फसले. त्यांना कृषी जोडणीचा उपयोग इतर कारणांसाठी होत असल्याबाबत प्रश्न विचारला होता. ते म्हणाले, कंपनी चोरीच्या विरुद्ध जागरुक आहे. कठोर कारवाई करण्यात येते.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणMaharashtraमहाराष्ट्र