शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
3
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
4
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
5
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
6
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
7
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
8
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
9
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
10
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
11
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
12
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
13
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
16
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
17
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
18
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
19
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

Maharashtra CM : तुम करो तो पुण्य...हम करे तो पाप : गिरीराज सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 22:36 IST

काँग्रेस-शिवसेनेकडून आता हे पापाचे सरकार असल्याची टीका होत आहे. मात्र तुम्ही कराल तर पुण्य व आम्ही केले तर पाप हा कुठला न्याय आहे, असा प्रश्न उपस्थित करीत सिंह यांनी चिमटा काढला.

ठळक मुद्देराज्याच्या विकासाला आणखी चालना मिळेल

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : महाराष्ट्रात सत्तास्थापनेसंदर्भात घडलेल्या नाट्यमय घडामोडींचे केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री गिरीराज सिंह यांनी स्वागत केले आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी उचललेले हे पाऊल आहे. यामुळे राज्याच्या विकासाला आणखी चालना मिळेल. हे स्वार्थाचे नव्हे तर जनतेच्या हिताचे राजकारण आहे. काँग्रेस-शिवसेनेकडून आता हे पापाचे सरकार असल्याची टीका होत आहे. मात्र तुम्ही कराल तर पुण्य व आम्ही केले तर पाप हा कुठला न्याय आहे, असा प्रश्न उपस्थित करीत सिंह यांनी चिमटा काढला.‘अ‍ॅग्रोव्हिजन’ राष्ट्रीय कृषी प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी गिरीराज सिंह नागपुरात आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. महाराष्ट्राच्या हितासाठी व अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी नि:स्वार्थीवृत्तीच्या स्थायी सरकारची आवश्यकता होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात हे सरकार राष्ट्रहितात काम करेल व राज्याच्या जनतेला याचा फायदा पोहोचेल. भाजपाकडे १०५ चे संख्याबळ आहे. लोकशाहीत ज्याची संख्या जास्त त्याचाच मुख्यमंत्री होईल, असे बाळासाहेब ठाकरेदेखील एकदा म्हणाले होते. बाळासाहेबांप्रति आम्हाला आदरच आहे. जे काही राजकारण मागील काही दिवसांत झाले ते देशाने पाहिले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना एकमेकांना पाण्यात पाहात होते, ते केवळ सत्तेचा अजेंडा घेऊन आता सोबत आले आहे. राज्याला अशा नव्हे तर विकासाचा अजेंडा असलेल्या सरकारची आवश्यकता आहे, असेदेखील सिंह म्हणाले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रChief Ministerमुख्यमंत्री