शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

महाराष्ट्र छात्रसेना झाली नामशेष; अखेरचा समादेशकही झाला निवृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 12:07 PM

Nagpur News राष्ट्रीय छात्रसेनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र छात्रसेनेचे युनिट शाळाशाळांत सुरू केले होते. पण, महाराष्ट्र छात्रसेना अवघ्या काही वर्षांतच इतिहासजमा झाली.

ठळक मुद्देयोजनाही झाली इतिहासजमा१९९६ मध्ये प्रत्येक शाळेत राबविली जात होती योजना

लोकमत न्यूज नेटवर्क  

नागपूर : शालेय विद्यार्थ्यांमध्ये सेनादलाविषयी आवड निर्माण व्हावी, त्याच थाटाची शिस्त त्यांच्या अंगी बाणावी, या उद्देशाने राष्ट्रीय छात्रसेनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र छात्रसेनेचे युनिट शाळाशाळांत सुरू केले होते. पण, महाराष्ट्र छात्रसेना अवघ्या काही वर्षांतच इतिहासजमा झाली. या सेनेत नियुक्त केलेले राज्यातील अखेरचे समादेशक राजू हिरेखन हे शुक्रवारी सेवानिवृत्त झाले.

१९९६ मध्ये केंद्रीय छात्रसेनेच्या धर्तीवर प्रत्येक शाळेत एमसीसी युनिट सुरू करण्यात आले होते. ८ व ९ वर्गांच्या विद्यार्थी, विद्यार्थिनी यात सहभागी होत असत. या योजनेसाठी राज्यभरात जिल्हा समादेशक, तालुका समादेशकांची नियुक्ती केली होती. आर्मीच्या तीनही शाखांतून सेवानिवृत्त झालेल्या सैनिकांची त्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती. तीन हजार रुपये मानधनावर तालुका समादेशक नियुक्त केले होते. महाराष्ट्र छात्रसेनेच्या कॅडेट्सना खाकी पॅण्ट, शर्ट, लाल रंगाचे बूट व टोपी असा गणवेश दिला जात होता. परेडसाठी ८० रुपये भोजनभत्ता व १५ रुपये धुलाईभत्ता दिला जायचा. प्रत्येक रविवारी या युनिटच्या कॅडेट्सची परेड व्हायची. तालुकास्तरावर नियुक्त केलेले समादेशक हे शाळेच्या शिक्षकांना सैनिकी शिक्षण देऊन त्यांना प्रशिक्षित करायचे. १९९९ नंतर एमसीसीमधील सहभाग हा ऐच्छिक करण्यात आला. कॅडेट्सना मिळणारे भत्ते बंद केले. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग एमसीसीकडे कमी होत गेला. विद्यार्थीसंख्या घटू लागली. हळूहळू शाळेतील युनिट बंद होत गेले. आजघडीला महाराष्ट्रात महाराष्ट्र छात्रसेनेचे एकही युनिट नाही. १९९६ मध्ये सेवानिवृत्त सैनिकांना समादेशक म्हणून नियुक्त केले होते. त्यांना शिक्षण विभागाने याच योजनेत कायम केले. पुढे योजना इतिहासजमा झाल्याने या समादेशकांना शिक्षण विभागाच्या नियमित कामात गुंतविण्यात आले. या योजनेसाठी समादेशक म्हणून घेतलेले एकेक समादेशक निवृत्त होत गेले. या योजनांचे अखेरचे समादेशक राजू हिरेखन हे नागपूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात कार्यरत होते. तेही सोमवारी सेवानिवृत्त झाले. सरकारने महाराष्ट्र छात्रसेना बंद करण्यासंदर्भात कुठलेही शासकीय दस्तावेज काढले नाही. पण, महाराष्ट्रातील अखेरच्या समादेशकाच्या सेवानिवृत्तीमुळे एकप्रकारे महाराष्ट्र छात्रसेनाच आता नामशेष झाली आहे.

- सरकारला खर्च पेलवेना

सरकारने एमसीसीतील सहभाग ऐच्छिक केल्यानंतर त्यासाठी मिळणारे अनुदान बंद करण्यात आले. कॅडेट्सना जिल्हा समादेशकांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र मिळायचे. ते देखील बंद करण्यात आले. प्रत्येक शाळेत ही योजना होती. भत्ते, गणवेश, प्रमाणपत्र यांचा खर्च सरकारला पेलवत नसल्याने योजनेतील राज्यभरातील प्रत्येक शाळेचे युनिट बंद पडले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र