शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

आता परीक्षा केंद्रावर उशीर झाल्यास मिळणार नाही प्रवेश; राज्य शिक्षण मंडळाचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2022 13:19 IST

आतापर्यंत बोर्ड १० मिनिटे उशीर झाल्यास विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्यास परवानगी देत होती; परंतु सोमवारी राज्य शिक्षण मंडळाने पत्रक काढून उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला आहे.

नागपूर : बारावी आणि दहावीच्या बोर्डाच्या लेखी परीक्षेला सुरुवात झाली आहे. सकाळच्या वेळेतील पेपर १०.३० वाजता व दुपारच्या वेळेतील पेपर ३ वाजता सुरू होतात. आतापर्यंत बोर्ड १० मिनिटे उशीर झाल्यास विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्यास परवानगी देत होती; परंतु सोमवारी राज्य शिक्षण मंडळाने पत्रक काढून उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला आहे.

बोर्डाच्या निदर्शनास आले की १० मिनीट सवलतीचा लाभ घेऊन केंद्रावर उशिरा पोहोचलेल्या विद्यार्थ्यांच्या मोबाइलमध्ये प्रश्नपत्रिकेत आलेला काही आशय निदर्शनास आला. ही बाब मंडळाने गंभीरतेने घेऊन संबंधितांवर कारवाईदेखील केली; परंतु या गैरप्रकारावर प्रतिबंध घालण्यासाठी मंगळवारी बोर्डाने परिपत्रक काढले असून यापुढे परीक्षेला उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्याला पेपर सोडविता येणार नाही.

- परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत

१) विद्यार्थ्यांनी पेपर सुरू होण्यापूर्वी किमान १ तास अगोदर परीक्षा केंद्रावर हजर राहावे.

२) विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी १० मिनीट अगोदर परीक्षा कक्षात हजर राहावे.

३) परीक्षा सुरू झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश देऊ नये.

टॅग्स :Educationशिक्षणexamपरीक्षाStudentविद्यार्थी