शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात पहिल्या फेरीचा निकाल तासाभरात :  मतमोजणीची तयारी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 22:16 IST

२४ तारखेला मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज आहे. एकूण २०२ टेबलवर मतमोजणी होणार असून, एकूण २७४ फेऱ्या होतील. पहिल्या फेरीचा निकाल हा तासाभरात येईल. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी पत्रपरिषदेत सविस्तर माहिती दिली.

ठळक मुद्दे२०२ टेबल, प्रत्येक टेबलवर तीन कर्मचारी : एकूण २७४ फेऱ्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काही किरकोळ घटना वगळल्यास मतदान सुरळीत पार पडले. येत्या २४ तारखेला मतमोजणी होणार आहे. याची तयारी पूर्ण झाली असून, मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघाच्या मतमोजणीची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण २०२ टेबलवर मतमोजणी होणार असून, एकूण २७४ फेऱ्या होतील. पहिल्या फेरीचा निकाल हा तासाभरात येईल. 

जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत मतमोजणीबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शाह उपस्थित होते. जिल्हाधिकारी ठाकरे यांनी सांगितले की, मतमोजणीसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. प्रत्यक्ष मतमोजणीसाठी ज्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे विशेष प्रशिक्षण उद्या होणार आहे. विधानसभानिहाय होणाऱ्या मतमोजणीसाठी एकूण १४ ते २० टेबल लागणार आहेत. प्रत्येक टेबलवर तीन कर्मचारी राहतील. प्रत्येक विधानसभेत जवळपास १५० अधिकारी-कर्मचारी तैनात राहतील. १७ ते ३१ फेऱ्या होतील. पहिल्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाल्याशिवाय दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीला सुरुवात होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 
व्हीव्हीपॅटची मोजणी सर्वात शेवटीसंपूर्ण फेरीची मतमोजणी झाल्यानंतरच व्हीव्हीपॅटची मोजणी करण्यात येईल. प्रत्येक विधानसभा मतदार संघातून पाच मतदार संघातील व्हीव्हीपॅटची मोजणी केली जाईल. तत्पूर्वी मतदानासोबतच पोस्टल बॅलेटचीही मोजणी होईल.पोस्टल बॅलेट तातडीने पोहचविण्यासाठी वाहनांची सोयएकूण १६,५०० कर्मचाऱ्यांनी बॅलेट पेपरसाठी अर्ज केला होता. आतापर्यंत एकूण २३६७ पोस्टल बॅलेट भरून आले आहेत. जास्तीत जास्त पोस्टल बॅलेट तातडीने पोहचावे यासाठी पोस्ट विभागाशी समन्वय ठेवण्यात आला आहे. त्यांना जास्तीच्या वाहनांची आवश्यकता होती. ती वाहने त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेली असल्याचेही जिल्हाधिकारी ठाकरे यांनी सांगितले.

मोबाईलवर बंदीमतमोजणीच्या ठिकाणी मोबाईलला बंदी राहील. केवळ निवडणूक निर्णय अधिकारी सोडले तर कुणालाही मोबाईल आत नेता येणार नाही. प्रसिद्धी माध्यमांनासुद्धा मोबाईल केवळ प्रसिद्धीमाध्यम कक्षापर्यंतच वापरण्याची परवानगीही राहील, असेही जिल्हाधिकारी ठाकरे यांनी स्पष्ट केले.

ईव्हीएमला त्रिस्तरीय सुरक्षा :१२ ठिकाणी स्ट्राँग रुम : सीसीटीव्ही कॅमेरे 

 प्रत्येक मतदार संघातील ईव्हीएम संबंधित मतदार संघाच्या मतमोजणीस्थळी उभारण्यात आलेल्या स्ट्राँग रुममध्ये सुरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत. त्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून, प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत ही माहिती दिली. जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदार संघापैकी शहरात सहा आणि ग्रामीणमध्ये सहा मतदार संघ आहेत. प्रत्येक मतदार संघासाठी स्वतंत्र मतमोजणीची व्यवस्था आहे. तसेच मतमोजणीस्थळाजवळच स्वतंत्रपणे स्ट्राँग रुम तयार करण्यात आली आहे. मतदान झाल्यानंतर सर्व केंद्रावरील ईव्हीएम तेथे सील करून ठेवण्यात आल्या. यासाठी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून, तेथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. केंद्रीय सुरक्षा बल, राज्य राखील दल आणि स्थानिक पोलीस अशी ही त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था आहे. सर्वात बाहेर हे स्थानिक पोलीस आहेत, तर आतमध्ये राखीव दलाची सुरक्षा आहे. त्यांचा २४ तास खडा पहारा आहे. मतमोजणीनंतर शहरातील सर्व मतदार संघातील ईव्हीएम या कळमना येथे सुरक्षित ठेवल्या जातील, तर ग्रामीणमधील त्या त्या ठिकाणी राहील. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Votingमतदानnagpurनागपूरcollectorजिल्हाधिकारीMediaमाध्यमे