शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात निवडणूक यंत्रणा २४ तास राबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 01:10 IST

निवडणुका जाहीर झाल्यापासून तर निकाल जाहीर होईपर्यंतच्या कामातील महत्त्वाचा टप्पा असणारा मतदानाचा दिवस सोमवारी शांततेत पार पडला. मात्र या कामात सकाळी ५ वाजतापासून जुंपलेली यंत्रणा दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजेपर्यंत जागत होती.

ठळक मुद्देपहाटे ४ वाजेपर्यंत कर्मचारी जागले : आता तयारी मतमोजणीची

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणुका जाहीर झाल्यापासून तर निकाल जाहीर होईपर्यंतच्या कामातील महत्त्वाचा टप्पा असणारा मतदानाचा दिवस सोमवारी शांततेत पार पडला. मात्र या कामात सकाळी ५ वाजतापासून जुंपलेली यंत्रणा दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजेपर्यंत जागत होती. त्यानंतरही आज मंगळवारी सकाळी निवडणूक विभागातील काही अधिकारी व कर्मचारी कामावर हजर होते.निवडणुकीचे प्रत्येक काम युद्धपातळीवर केले जाते. त्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची व्यवस्था केली जाते. जिल्ह्यात १२ मतदार संघात एकूण ४,४१२ मतदान केंद्र होते. त्यावर २० हजारावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. निवडणूक शाखेत काम करणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांपासून तर प्रत्यक्ष मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मतदानाचा दिवस एक महत्त्वाचा टप्पा असतो. कर्मचाऱ्यांना एक दिवसाआधीच केंद्रावर जाऊन तेथे मुक्काम करावा लागतो. तेथील आवश्यक सोयीसुविधांची पाहणी करावी लागते. मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष मतदान जरी सकाळी ७ वाजतापसून सुरू होत असले तरी प्रत्यक्षात केंद्रावर तैनात असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे काम त्यापूर्वीच दोन तास आधीपासून सुरू होते. ईव्हीएम मशीनची चाचणी, केंद्रावरील विद्युत पुरवठा, आवश्यक सुविधा, सुरक्षा आणि मतदानाची नोंद यासह इतरही कामांचा त्यात समावेश असतो. संपूर्ण दिवसभर ही प्रक्रिया चलते. यादरम्यान कर्मचाऱ्यांना त्यांची जागा सोडता येत नाही. मग केंद्रावर मतदार असो किंवा नसो. मतदानाची वेळ संपल्यावरही जर केंद्रावर मतदार असेल तर जोपर्यंत त्यांचे मतदान होत नाही तोपर्यंत त्यांना थांबणे बंधनकारक असते. मतदानाची प्रक्रिया आटोपल्यानंतर एकूण मतदार, झालेले मतदान, त्याची आकडेवारी, टक्केवारी याचा संपूर्ण तपशील नोंद करून निवडणूक शाखेला पाठविणे, त्यानंतर ईव्हीएम सील करून स्ट्राँग रुमवर घेऊन जाण्याची जबाबदारी केंद्रप्रमुख आणि कर्मचाऱ्यांची असते. स्ट्राँग रुममध्ये एकाच वेळी मतदार संघातील विविध केंद्रांच्या ईव्हीएम जमा होत असल्याने तेथेही मोठी गर्दी उसळते. प्रत्येक केंद्राच्या ईव्हीएम जमा करण्यास बराच वेळ होतो. तोपर्यंत कर्मचाऱ्यांना तेथेच थांबावे लागते. ही संपूर्ण प्रक्रिया पहाटेपर्यंत चालते.सोमवारी मतदान आटोपल्यानंतर कर्मचारी पहाटे ४ वाजता घरी परतले. स्वत: जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र ठाकरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शाह, त्यांचा संपूर्ण स्टाफ, निवडणुकीची जबाबदरी सांभाळणारे सर्व उपजिल्हाधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार आणि कर्मचाऱ्यांनी सोमवारची रात्र जागून काढली. मतदानाच्या कामात सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्याच बाबतीत असे घडले असे नाही तर या यंत्रणेवर देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांनासुद्धा आयोगाकडे इत्थंभूत तपशील पाठविल्याशिवाय कार्यालय सोडता येत नाही. त्यामुळे सोमवारी रात्री उशिरापर्यंत अधिकारी शहरातील वेगवेगळ्या स्ट्राँगरुमच्या कामकाजावर लक्ष ठेवून होते. त्यानंतर आज सकाळी पुन्हा स्ट्राँग रुमच्या सुरक्षेचे नियोजन, सोमवारी झालेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी काढणे, विविध प्रकारचे अहवाल आयोगाकडे पाठविणे यात यंत्रणा व्यस्त होती. जिल्हा माहिती विभागही रात्री उशिरापर्यंत राबत होता.अनेक मतदारसंघाचे बूथनिहाय आकडे अद्याप जिल्हा शाखेला प्राप्त झाले नव्हते. ही सर्व प्रक्रिया करतानाच मतमोजणीच्या नियोजनाचेही काम सुरू झाले आहे. गुरुवारी मतमोजणी होणार आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी केले कौतुकदरम्यान, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी मतदान प्रक्रिया शांततेत पर पडली. या कामात तैनात सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले.

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Votingमतदानnagpurनागपूर