शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

Maharashtra Assembly Election 2019 : आर्थिक मंदी भाजपाच्या चुकीच्या धोरणांमुळे : मनीष तिवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 23:53 IST

आज देशावर जे आर्थिक संकट कोसळले आहे त्याला भारतीय जनता पक्षाचे सरकार जबाबदार आहे, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. मनीष तिवारी यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आधुनिक भारत घडविण्यात व्यावसायिकांचा मोठा सहभाग आहे. व्यावसायिकांनी आपली ताकद ओळखावी. आज देशावर जे आर्थिक संकट कोसळले आहे त्याला भारतीय जनता पक्षाचे सरकार जबाबदार आहे, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. मनीष तिवारी यांनी केला.ऑल इंडिया प्रोफेशनल्स काँग्रेसच्या वतीने आयोजित ‘इंडियन इकॉनॉमी-करंट सिनॅरियो-मिथ्स अ‍ॅण्ड रिअ‍ॅलिटीज' या कार्यक्रमात ते बुधवारी नागपुरात बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख उपस्थित होते. तिवारी म्हणाले, ही परिस्थिती बदलणे आता तुमच्या हातात आहे. उद्योगांमध्ये गुंतवणूक नाही त्यामुळे रोजगार निर्मिती नाही. चुुकीच्या पद्धतीने जीएसटी लागू केला. आर्थिक मंदी हे याचेच कारण आहे. सरकार व्यापारीविरोधी आहे. नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेला गळती लागली. सरकारला आर्थिक दिवाळखोरीची कल्पना आल्याने त्यांनी रिझर्व्ह बँकेकडून पैसा घेतला. समाजात वैमनस्य निर्माण करण्याचे काम भाजपने केले. जनतेला उद्याची भीती आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने आपला आवाज बुलंद करणे आवश्यक आहे. सत्तेच्या विरोधात आमच्या आवाजात आवाज मिसळून सत्तापरिवर्तन करा. डॉ. आशिष देशमुख यांच्या रूपाने आपल्या क्षेत्राचा आर्थिक विकास करावा, असे आवाहन त्यांनी केले.डॉ. आशिष देशमुख म्हणाले, जनतेने संधी दिल्यास नागपूरचा आर्थिक विकास करू. या क्षेत्राचा कायापालट करू. भारतात आर्थिक मंदी आहे. मागील पाच वर्षात एकही उद्योग आणला नाही. आता पुन्हा एक कोटी रोजगाराचे गाजर जनतेला दाखविले जात आहे, त्यामुळे सावध राहा, असे आवाहन त्यांंनी केले. यावेळी काँग्रेसचे आशिष दुवा, विशाल मुत्तेमवार, ऑल इंडिया प्रोफेशनल्स काँग्रेसचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ashish Deshmukhआशीष देशमुखnagpur-south-west-acनागपूर दक्षिण पश्चिम