शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : "तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊनच दाखवा.."; राज ठाकरे यांचे आयोगाला 'ओपन चॅलेंज'
2
"गोंद्या आला रे...पुष्पा आला रे...", बोगस मतदान रोखण्यासाठी मनसेचा कोडवर्ड; अविनाश जाधव, राजू पाटलांनी सांगितला प्लान!
3
एका घोटाळ्यामुळे ११७ वर्षांचा इतिहास संपुष्टात! 'हा' शेअर बाजार कायमचा बंद होणार; सेबीची विक्रीला मंजुरी
4
Mitchell Starc Bowling Speed : स्टार्कनं खरंच रोहितला 'वर्ल्ड रेकॉर्ड' सेट करणारा वेगवान चेंडू टाकला?
5
Raj Thackeray: तो मतदार आला की पकडलाच म्हणून समजा...! मनसेने रचला सापळा; राज ठाकरेंचे घणाघाती भाषण...
6
Raj Thackeray: भाजपला मतदान करणाऱ्या मराठी लोकांनो...! तुम्हीही वरवंट्याखाली येणार; राज ठाकरेंनी दिला इशारा
7
VIDEO: तुफान राडा! निवडणुकीचं तिकीट नाकारलं म्हणून RJD नेत्याने कुर्ता फाडला, भरपूर रडला...
8
फक्त टार्गेट वाढतं, पगार नाही; कर्मचाऱ्याचा राजीनामा होतोय तुफान व्हायरल, कंपनी म्हणते...
9
"आम्ही ९ ते ५ जॉब करणाऱ्यांपेक्षा जास्त मेहनत करतो...", काजोल बरळली, म्हणाली- "आम्हाला १२-१४ तास..."
10
धनत्रयोदशीला एकट्या मारुतीने विकल्या ५०००० गाड्या, बुकिंगचा आकडा बघाल तर...; आजही मुहूर्त सुरूच...
11
IND W vs ENG W World Cup 2025 Match LIVE Streaming : सेमीचं परफेक्ट सेमीकरण सेट करण्याचं चॅलेंज
12
जैन समाजाने दाखवलं एकीचं बळ! एकाचवेळी खरेदी केल्या १८६ लक्झरी कार; प्रत्येक गाडीवर किती डिस्काउंट?
13
महिला क्रिकेटर लग्नबंधनात अडकणार; इंदूरची सून होणार, होणाऱ्या बॉलिवूडकर नवऱ्यानेच दिली खुशखबर...
14
अतूट प्रेम! लेकाच्या मृत्यूनंतर काही क्षणात आईनेही सोडला जीव; एकत्र काढली अंत्ययात्रा
15
पैसे तयार ठेवा! ऑनलाईन शॉपिंग कंपनी मीशो IPO आणण्यासाठी सज्ज! किती कोटींचा निधी उभारणार?
16
Smriti Mandhana Soon Marry : ठरलं! टीम इंडियाची 'क्वीन' लवकरच उरकणार लग्न; तिच्या 'राजकुमारानं'च दिली हिंट
17
सरकारी कोट्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये हडपले! IPS रश्मी करंदीकर यांच्या पतीला कोर्टाकडून दिलासा नाही
18
Video - कामाचा मोबदला! रशियन महिलेने मेडला दिला महिन्याला ४५ हजार पगार, चर्चेला उधाण
19
IND vs AUS 1st ODI : किंग कोहलीच्या पदरी 'भोपळा'; ऑस्ट्रेलियातील मैदानात पहिल्यांदाच आली अशी वेळ!
20
आपल्यापेक्षा ५० वर्ष लहान तरुणीशी लग्न अन् अफवांचा बाजार; १.६ कोटींचा हुंड्याचा चेक बनावट निघाला, फोटोग्राफरचे पैसे न देताच...

Maharashtra Assembly Election 2019 : देश विभाजनाने नव्हे,जोडण्याने चालतो : भूपेश बघेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 22:02 IST

देश विभाजनाने नव्हे तर जोडण्याने चालतो. म्हणूनच देशाला आज गांधीजींच्या राष्ट्रवादाची गरज असल्याचे प्रतिपादन छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सोमवारी केले.

ठळक मुद्देगांधीजींचा राष्ट्रवाद हवा की संघाचा?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी या देशाला सत्य, अहिंसा व सर्वधर्मसमभावाचा राष्ट्रवाद दिला. तर दुसरा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा देशाला तेडणारा राष्ट्रवाद आहे. देश विभाजनाने नव्हे तर जोडण्याने चालतो. म्हणूनच देशाला आज गांधीजींच्या राष्ट्रवादाची गरज असल्याचे प्रतिपादन छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सोमवारी केले.नागपूर उत्तर विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार डॉ. नितीन राऊ त यांच्या प्रचारार्थ गुलशननगर येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, अनिस अहमद, अतुल लोंढे, शब्बीर विद्रोही यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. भूपेश बघेल म्हणाले, गांधीजींनी देशातील सर्व जातीधर्माच्या लोकांना जोडण्याचे काम केले. त्यांच्याच राष्ट्रवादावर काँग्रेस पक्ष चालतो. दुसरीकडे संघाचा राष्ट्रवाद भारतात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशात दहशतीचे वातारण आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसला सवाल करताहेत की, तुम्ही कलम ३७० हटवाल की नाही. वास्तविक भाजपाच्या जाहीरनाम्यातच याचा समावेश होता. आम्ही छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी व धानाला प्रति क्विंटल २५०० रुपये भाव देण्याचे आश्वासन दिले होते. काँग्रेसची सत्ता येताच आम्ही ते पूर्ण केले.विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्रात आले. ते आपल्या भाषणातून कलम ३७० हटविल्याचे सांगत आहेत. परंतु शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, बंद पडणारे उद्योग यावर बोलायला तयार नाहीत. निवडणुका महाराष्ट्रातील असल्याने येथील प्रश्नावर बोलणे अपेक्षित आहे. भाजपाने लोकसभा निवडणुकीत दरवर्षी दोन कोटी रोजगार व प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आज ते यावर बोलायला तयार नसल्याचे बघेल म्हणाले.नोटाबंदी केली, पण किती पैसा जमा झाला, हे सांगायला मोदी तयार नाहीत. पुलवामाच्या नावाने मते मागतात, पण जवानांच्या मृत्यूला जबाबदार कोण? २५० किलोगॅ्रम आरडीएक्स कसे आले, याचे उत्तर का देत नाही, असा सवाल बघेल यांनी केला. नितीन राऊ त म्हणाले, उत्तर नागपूरच्या विकासाकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे परिवर्तनाशिवाय पर्याय नसल्याने मला सेवेची संधी द्या. दोनदा जनरेटर बंद पडल्याने काही वेळ सभास्थळी अंधार होता.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nitin Rautनितीन राऊतnagpur-north-acनागपूर उत्तर