शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

Maharashtra Assembly Election 2019 : देश विभाजनाने नव्हे,जोडण्याने चालतो : भूपेश बघेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 22:02 IST

देश विभाजनाने नव्हे तर जोडण्याने चालतो. म्हणूनच देशाला आज गांधीजींच्या राष्ट्रवादाची गरज असल्याचे प्रतिपादन छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सोमवारी केले.

ठळक मुद्देगांधीजींचा राष्ट्रवाद हवा की संघाचा?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी या देशाला सत्य, अहिंसा व सर्वधर्मसमभावाचा राष्ट्रवाद दिला. तर दुसरा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा देशाला तेडणारा राष्ट्रवाद आहे. देश विभाजनाने नव्हे तर जोडण्याने चालतो. म्हणूनच देशाला आज गांधीजींच्या राष्ट्रवादाची गरज असल्याचे प्रतिपादन छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सोमवारी केले.नागपूर उत्तर विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार डॉ. नितीन राऊ त यांच्या प्रचारार्थ गुलशननगर येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, अनिस अहमद, अतुल लोंढे, शब्बीर विद्रोही यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. भूपेश बघेल म्हणाले, गांधीजींनी देशातील सर्व जातीधर्माच्या लोकांना जोडण्याचे काम केले. त्यांच्याच राष्ट्रवादावर काँग्रेस पक्ष चालतो. दुसरीकडे संघाचा राष्ट्रवाद भारतात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशात दहशतीचे वातारण आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसला सवाल करताहेत की, तुम्ही कलम ३७० हटवाल की नाही. वास्तविक भाजपाच्या जाहीरनाम्यातच याचा समावेश होता. आम्ही छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी व धानाला प्रति क्विंटल २५०० रुपये भाव देण्याचे आश्वासन दिले होते. काँग्रेसची सत्ता येताच आम्ही ते पूर्ण केले.विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्रात आले. ते आपल्या भाषणातून कलम ३७० हटविल्याचे सांगत आहेत. परंतु शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, बंद पडणारे उद्योग यावर बोलायला तयार नाहीत. निवडणुका महाराष्ट्रातील असल्याने येथील प्रश्नावर बोलणे अपेक्षित आहे. भाजपाने लोकसभा निवडणुकीत दरवर्षी दोन कोटी रोजगार व प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आज ते यावर बोलायला तयार नसल्याचे बघेल म्हणाले.नोटाबंदी केली, पण किती पैसा जमा झाला, हे सांगायला मोदी तयार नाहीत. पुलवामाच्या नावाने मते मागतात, पण जवानांच्या मृत्यूला जबाबदार कोण? २५० किलोगॅ्रम आरडीएक्स कसे आले, याचे उत्तर का देत नाही, असा सवाल बघेल यांनी केला. नितीन राऊ त म्हणाले, उत्तर नागपूरच्या विकासाकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे परिवर्तनाशिवाय पर्याय नसल्याने मला सेवेची संधी द्या. दोनदा जनरेटर बंद पडल्याने काही वेळ सभास्थळी अंधार होता.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nitin Rautनितीन राऊतnagpur-north-acनागपूर उत्तर