शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

Maharashtra Assembly Election 2019 : देश विभाजनाने नव्हे,जोडण्याने चालतो : भूपेश बघेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 22:02 IST

देश विभाजनाने नव्हे तर जोडण्याने चालतो. म्हणूनच देशाला आज गांधीजींच्या राष्ट्रवादाची गरज असल्याचे प्रतिपादन छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सोमवारी केले.

ठळक मुद्देगांधीजींचा राष्ट्रवाद हवा की संघाचा?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी या देशाला सत्य, अहिंसा व सर्वधर्मसमभावाचा राष्ट्रवाद दिला. तर दुसरा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा देशाला तेडणारा राष्ट्रवाद आहे. देश विभाजनाने नव्हे तर जोडण्याने चालतो. म्हणूनच देशाला आज गांधीजींच्या राष्ट्रवादाची गरज असल्याचे प्रतिपादन छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सोमवारी केले.नागपूर उत्तर विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार डॉ. नितीन राऊ त यांच्या प्रचारार्थ गुलशननगर येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, अनिस अहमद, अतुल लोंढे, शब्बीर विद्रोही यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. भूपेश बघेल म्हणाले, गांधीजींनी देशातील सर्व जातीधर्माच्या लोकांना जोडण्याचे काम केले. त्यांच्याच राष्ट्रवादावर काँग्रेस पक्ष चालतो. दुसरीकडे संघाचा राष्ट्रवाद भारतात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशात दहशतीचे वातारण आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसला सवाल करताहेत की, तुम्ही कलम ३७० हटवाल की नाही. वास्तविक भाजपाच्या जाहीरनाम्यातच याचा समावेश होता. आम्ही छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी व धानाला प्रति क्विंटल २५०० रुपये भाव देण्याचे आश्वासन दिले होते. काँग्रेसची सत्ता येताच आम्ही ते पूर्ण केले.विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्रात आले. ते आपल्या भाषणातून कलम ३७० हटविल्याचे सांगत आहेत. परंतु शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, बंद पडणारे उद्योग यावर बोलायला तयार नाहीत. निवडणुका महाराष्ट्रातील असल्याने येथील प्रश्नावर बोलणे अपेक्षित आहे. भाजपाने लोकसभा निवडणुकीत दरवर्षी दोन कोटी रोजगार व प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आज ते यावर बोलायला तयार नसल्याचे बघेल म्हणाले.नोटाबंदी केली, पण किती पैसा जमा झाला, हे सांगायला मोदी तयार नाहीत. पुलवामाच्या नावाने मते मागतात, पण जवानांच्या मृत्यूला जबाबदार कोण? २५० किलोगॅ्रम आरडीएक्स कसे आले, याचे उत्तर का देत नाही, असा सवाल बघेल यांनी केला. नितीन राऊ त म्हणाले, उत्तर नागपूरच्या विकासाकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे परिवर्तनाशिवाय पर्याय नसल्याने मला सेवेची संधी द्या. दोनदा जनरेटर बंद पडल्याने काही वेळ सभास्थळी अंधार होता.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nitin Rautनितीन राऊतnagpur-north-acनागपूर उत्तर