शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

Maharashtra Assembly Election 2019 : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देशहिताशी तडजोड केली : योगी आदित्यनाथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 23:42 IST

आपल्या देशात विकासाची गंगा अगोदरच वाहिली असती. परंतु काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते बेईमानी व भ्रष्टाचाराच्या चौकटीतच अडकले होते. त्यांनी नेहमी देशहिताशी तडजोड केली, या शब्दात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर घणाघाती टीका केली.

ठळक मुद्देविरोधकांसाठी राजकारण हे स्वार्थाचे साधन

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : आपल्या देशात विकासाची गंगा अगोदरच वाहिली असती. परंतु काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते बेईमानी व भ्रष्टाचाराच्या चौकटीतच अडकले होते. त्यांनी नेहमी देशहिताशी तडजोड केली, या शब्दात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर घणाघाती टीका केली. दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मोहन मते यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचारसभेदरम्यान ते बोलत होते.

सक्करदरा तिरंगा चौकात आयोजित या सभेला भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण दटके, आ. अनिल सोले, आ. सुधाकर कोहळे, शिवसेना नेते शेखर सावरबांधे प्रामुख्याने उपस्थित होते. काँग्रेस व राष्ट्रवादी अनेक वर्षे सत्तेत होते. त्यांच्या मनात आले असते तर गरिबांसाठी कल्याणकारी योजना, पायाभूत सुविधांचा विकास, दहशतवादावर वचक इत्यादी बाबी ते करू शकले असते. मात्र त्यांच्याकडे ते ‘व्हिजन’च नव्हते. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष घराणेशाहीच्या जाळ्यात अडकले आहेत. काँग्रेसकडे तर नेता नाही व नीतीही नाही. त्यांचे धोरण देशाप्रती चांगले नाही. राजकारण हे परमार्थ व लोकांच्या मदतीसाठी झाले पाहिजे. परंतु ज्यांच्यासाठी राजकारण हे स्वार्थाचे साधन आहे, त्यांच्याकडून देशहिताची कल्पनाच करू शकत नाही, असे प्रतिपादन योगी आदित्यनाथ यांनी केले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार विकासासाठी कटिबद्ध आहे. अगोदरचे सरकार काही विशिष्ट लोकांसमोर गुडघे टेकायची. आता मात्र सरकार फतवे नाही तर संविधानावर चालताना दिसून येत आहे. या सरकारमध्ये समर्पणाचा भाव आहे, असेदेखील ते म्हणाले.मोदींनी बाबासाहेबांचे स्वप्न साकार केलेदेशात कलम ३७० लागू झाले तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याला विरोध केला होता. १९५२ मध्ये त्यांनी काश्मीर या कलमामुळे विकासापासून वंचित राहील व फुटीरवादी शक्ती वाढतील, असा इशारा दिला होता. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने एका झटक्यात हे कलम रद्द केले व बाबासाहेबांच्या स्वप्नाला प्रत्यक्षात आणले, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. नागपूर ही संघभूमी व दीक्षाभूमी आहे. सांस्कृतिक राष्ट्रवादाची ही भूमी असून आता विकासाच्या दिशेने शहराची वेगाने वाटचाल सुरू आहे, असेदेखील ते म्हणाले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019yogi adityanathयोगी आदित्यनाथnagpur-south-acनागपूर दक्षिण