शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

Maharashtra Assembly Election 2019 : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देशहिताशी तडजोड केली : योगी आदित्यनाथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 23:42 IST

आपल्या देशात विकासाची गंगा अगोदरच वाहिली असती. परंतु काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते बेईमानी व भ्रष्टाचाराच्या चौकटीतच अडकले होते. त्यांनी नेहमी देशहिताशी तडजोड केली, या शब्दात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर घणाघाती टीका केली.

ठळक मुद्देविरोधकांसाठी राजकारण हे स्वार्थाचे साधन

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : आपल्या देशात विकासाची गंगा अगोदरच वाहिली असती. परंतु काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते बेईमानी व भ्रष्टाचाराच्या चौकटीतच अडकले होते. त्यांनी नेहमी देशहिताशी तडजोड केली, या शब्दात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर घणाघाती टीका केली. दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मोहन मते यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचारसभेदरम्यान ते बोलत होते.

सक्करदरा तिरंगा चौकात आयोजित या सभेला भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण दटके, आ. अनिल सोले, आ. सुधाकर कोहळे, शिवसेना नेते शेखर सावरबांधे प्रामुख्याने उपस्थित होते. काँग्रेस व राष्ट्रवादी अनेक वर्षे सत्तेत होते. त्यांच्या मनात आले असते तर गरिबांसाठी कल्याणकारी योजना, पायाभूत सुविधांचा विकास, दहशतवादावर वचक इत्यादी बाबी ते करू शकले असते. मात्र त्यांच्याकडे ते ‘व्हिजन’च नव्हते. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष घराणेशाहीच्या जाळ्यात अडकले आहेत. काँग्रेसकडे तर नेता नाही व नीतीही नाही. त्यांचे धोरण देशाप्रती चांगले नाही. राजकारण हे परमार्थ व लोकांच्या मदतीसाठी झाले पाहिजे. परंतु ज्यांच्यासाठी राजकारण हे स्वार्थाचे साधन आहे, त्यांच्याकडून देशहिताची कल्पनाच करू शकत नाही, असे प्रतिपादन योगी आदित्यनाथ यांनी केले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार विकासासाठी कटिबद्ध आहे. अगोदरचे सरकार काही विशिष्ट लोकांसमोर गुडघे टेकायची. आता मात्र सरकार फतवे नाही तर संविधानावर चालताना दिसून येत आहे. या सरकारमध्ये समर्पणाचा भाव आहे, असेदेखील ते म्हणाले.मोदींनी बाबासाहेबांचे स्वप्न साकार केलेदेशात कलम ३७० लागू झाले तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याला विरोध केला होता. १९५२ मध्ये त्यांनी काश्मीर या कलमामुळे विकासापासून वंचित राहील व फुटीरवादी शक्ती वाढतील, असा इशारा दिला होता. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने एका झटक्यात हे कलम रद्द केले व बाबासाहेबांच्या स्वप्नाला प्रत्यक्षात आणले, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. नागपूर ही संघभूमी व दीक्षाभूमी आहे. सांस्कृतिक राष्ट्रवादाची ही भूमी असून आता विकासाच्या दिशेने शहराची वेगाने वाटचाल सुरू आहे, असेदेखील ते म्हणाले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019yogi adityanathयोगी आदित्यनाथnagpur-south-acनागपूर दक्षिण