शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

नागपुरात हजार कोटींच्या कुलर व्यवसायावर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 22:08 IST

Loss of cooler business राज्य शासनाच्या ३० एप्रिलपर्यंतच्या कडक निर्बंधांमुळे कुलर उत्पादक आणि विक्रेते संकटात आले आहेत. कुलरची विक्री मार्चच्या अखेरच्या आठवड्यापासून सुरू होऊन जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालते. पण आता दुकाने बंद असल्याने कुलरची विक्री कशी करायची, अशी चिंता उत्पादक आणि विक्रेत्यांना सतावत आहे.

ठळक मुद्दे कडक निर्बंधांचा परिणाम : कुलर विक्रीची दुकानदारांसमोर चिंता

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : राज्य शासनाच्या ३० एप्रिलपर्यंतच्या कडक निर्बंधांमुळे कुलर उत्पादक आणि विक्रेते संकटात आले आहेत. कुलरची विक्री मार्चच्या अखेरच्या आठवड्यापासून सुरू होऊन जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालते. पण आता दुकाने बंद असल्याने कुलरची विक्री कशी करायची, अशी चिंता उत्पादक आणि विक्रेत्यांना सतावत आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही एक हजार कोटींच्या व्यवसायावर पाणी सोडावे लागणार असल्याची भीती उत्पादक आणि विक्रेते व्यक्त करीत आहेत.

नागपूर कुलरसाठी देशातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. जवळपास ५०० पेक्षा जास्त उत्पादक आहेत. या व्यवसायाशी १० हजारांपेक्षा जास्त लोक जुळले आहेत. या व्यवसायात अप्रत्यक्षपणे इलेक्ट्रिशियन, वूडवूल विक्रेते, नवीन व जुने मोटर पंप विक्री करणारे, पाण्याची टाकी विक्रेते, देखभाल करणारे आदी जुळले आहेत. पण आता कुलर उत्पादक व विक्रीची दुकाने बंद असल्याने सध्या सर्वच बेरोजगार झाले आहेत.

नागपुरातून नागपूर जिल्हा, विदर्भ, मराठवाडा, मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, तेलंगाना या राज्यात कुलर विक्रीसाठी जातात. लॉकडाऊनमुळे मालाची जावक बंद झाली आहे. उत्पादकांकडे हजारो संख्येत कुलर पडून आहेत. त्यात गेल्यावर्षीच्या कुलरची भर पडली आहे.

राम कुलरचे संचालक राजेश अवचट म्हणाले, नागपूर कुलर निर्मिती आणि विक्रीसाठी देशातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. जवळपास ५०० उत्पादकांच्या माध्यमातून दरवर्षी उन्हाळ्यात ६ ते ८ लाख कुलरची विक्री होते. स्थानिकांसह ब्रॅण्डेड कंपन्यांच्या कुलरची विक्री होते. पण सध्या स्थानिक उत्पादकांनी ब्रॅण्डेड कंपन्यांवर मात केली आहे. सध्या उत्पादन आणि विक्री बंद झाली आहे. ऑनलाईन विक्री केवळ १० ते २० टक्केच आहे. अशीच स्थिती काही दिवस राहिल्यास निर्मितीची साखळी तुटून त्यांच्या आर्थिक संकट येणार आहे. कर्जाची परतफेड करण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य शासनाने लॉकडाऊन हटवावे, अशी मागणी उत्पादक व विक्रेत्यांची आहे.

- नागपूर जिल्हात जवळपास ५०० उत्पादक

- एक हजार कोटींपेक्षा जास्त उलाढाल

- ५ हजारांपेक्षा जास्त विक्रेते

- १० हजार लोकांना रोजगार

एसीची विक्री थांबली

श्रीकांत इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक श्रीकांत भांडारकर म्हणाले मार्चअखेरपासून मेच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सर्व कंपन्यांच्या एसीची ८० टक्के विक्री होते. हा व्यवसाय कोट्यवधींचा असतो. सध्या सर्व माल पडून आहे. कंपन्यांनी पैसे वसुलीचा तगादा लावला आहे. ते परत कसे करायचे, ही चिंता आहे. बँकेच्या कर्ज, व्याज, कर्मचाऱ्यांना पगार द्यावे लागेल. आता सर्वच विक्रेत्यांना ऑनलाईन विक्रीचा मार्ग पत्करावा लागणार आहे. सरकारने लॉकडाऊन हटवून इलेक्ट्रॉनिक्स विक्रेत्यांना दिलासा द्यावा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार