शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
2
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
3
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
4
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
5
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
6
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
7
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
8
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
9
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
10
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
11
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
12
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
13
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
14
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
15
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
16
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
17
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
18
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
19
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
20
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जळाल्याच्या वेदनांसह लांबचा 'प्रवास' अखेरचाच; पूर्व विदर्भातील जिल्हा रुग्णालयांना असुविधांचा दाह सोसवेना

By सुमेध वाघमार | Updated: November 16, 2022 11:12 IST

पूर्व विदर्भात जिल्हास्तरावर विशेष सोयच नाही; ५० ते १०० किमी अंतर कापून आलेल्या २१८ रुग्णांचा मृत्यू

नागपूर : जळालेल्या रुग्णांवर तातडीने विशेष उपचार मिळाल्यास वाचण्याची शक्यता कित्येक पटीने वाढते. परंतु पूर्व विदर्भातील पाचही जिल्ह्यांत जळीत रुग्णांसाठी विशेष सोय नाही. रुग्णांना लांब अंतर कापून मेडिकलमध्ये उपचारासाठी यावे लागते. हे अंतरच या रुग्णांसाठी मृत्यूचे कारण ठरत आहे. नागपूर मेडिकल प्लास्टिक सर्जरी विभागाने केलेल्या अभ्यासात मेडिकलमध्ये ५० ते १०० पेक्षा जास्त किलोमीटर अंतर कापून आलेल्या २१८ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे पुढे आले.

वाढते शहर व औद्योगिकीकरणामुळे आगीच्या घटना वाढल्या आहेत. जखमी रुग्णांना विशेष उपचाराची व देखभालीची गरज असते. परंतु नागपूर सोडल्यास पूर्व विदर्भातील भंडारा, वर्धा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये आवश्यक सोयी नाहीत. अनेक रुग्णांना ५० व त्यापेक्षा जास्त किलोमीटर अंतर कापून उपचारासाठी नागपूरचे मेडिकल गाठावे लागते. हे अंतरच रुग्णांसाठी घातक ठरत आहे.

-३० ते ६० वयोगटात सर्वाधिक मृत्यू

अभ्यासात असेही दिसून आले की, जळालेले ६ ते १२ वर्षे वयोगटातील १५३ रुग्ण बरे झाले व ३१ रुग्णांचा मृत्यू झाला. १२ ते ३० वयोगटातील १९९ रुग्ण बरे झाले व १०३ रुग्णांचा मृत्यू झाला. ३० ते ६० वयोगटातील २०५ रुग्ण बरे झाले व ११९ रुग्णांचा मृत्यू झाला तर, ६० वयोगटावरील ४४ रुग्ण बरे होऊन ६९ रुग्णांचा मृत्यू झाला.

-मृत्यूमध्ये महिलांचे प्रमाण सर्वाधिक

डॉ. पाटील म्हणाले, अभ्यासात जळितांमध्ये बालके व पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे आढळून आले. शिवाय मृत्यूमध्येही महिलांचे प्रमाण मोठे होते. मेडिकलमध्ये २०१६ ते २०१९ या वर्षांत १२ वर्षाखालील २२१ बालके आली, यातील ३१ बालके दगावली. याच वर्षांत ३०४ पुरुष उपचारासाठी आले असताना ७६ मृत्यू, तर ३९८ महिला उपचारासाठी आले असताना यातील १९५ महिलांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

- अभ्यासातील धक्कादायक वास्तव

मेडिकलच्या प्लास्टिक सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. सुरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात २०१६ ते २०१९ या वर्षात विविध जिल्ह्यातून मेडिकलमध्ये उपचारासाठी आलेल्या जळीत रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. यात १०० पेक्षा जास्त किलोमीटर अंतर कापून मेडिकलमध्ये आलेल्या १७० रुग्णांचा, ५० ते १०० किलोमीटर अंतरावरून आलेल्या ४८ रुग्णांचा तर १० ते ५० किलोमीटर अंतरावरून आलेल्या ३९ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.

-किलोमीटर व मृत्यू

*अंतर : भरती रुग्ण : मृत्यू*

  • १० किमी. : २६३ : ६५
  • १० ते ५० किमी : १४३ : ३९
  • ५० ते १०० किमी : १४५ : ४८
  • १०० किमी व वरील : ३५४ : १७०

- वयोगटानुसार मृत्यूची संख्या

*वयोगट : बरे झालेले रुग्ण : मृत्यू*

  • १२ वर्षांपर्यंत : १५३ : ३१
  • १२ ते ३० वर्षे : १९९ :१०३
  • ३० ते ६० वर्षे : २०५ : ११९
  • ६० व त्यावरील : ४४ : ६९

-उपचारात उशीर, मृत्यूचे मुख्य कारण

जळाल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. अशा रुग्णांवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली मोठ्या प्रमाणात सलाइन द्यावे लागतात. लांब अंतरावरून मेडिकलमध्ये आलेल्या रुग्णांचा अभ्यास केला असता, बहुसंख्य रुग्णांच्या शरीरातील पाण्याची पातळी खूपच कमी झाल्याचे दिसून आले. दुसरे म्हणजे, प्रवासामुळे उपचारात होत असलेला उशीर, हे दोन्ही कारण मृत्यूला कारणीभूत ठरल्याचे आढळून आले.

-डॉ. सुरेंद्र पाटील, विभागप्रमुख, प्लास्टिक सर्जरी विभाग

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटलVidarbhaविदर्भ