शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
3
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
4
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
5
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
6
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
7
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
8
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
11
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
12
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
13
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
14
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
15
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
16
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
17
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
18
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
19
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
20
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी

जळाल्याच्या वेदनांसह लांबचा 'प्रवास' अखेरचाच; पूर्व विदर्भातील जिल्हा रुग्णालयांना असुविधांचा दाह सोसवेना

By सुमेध वाघमार | Updated: November 16, 2022 11:12 IST

पूर्व विदर्भात जिल्हास्तरावर विशेष सोयच नाही; ५० ते १०० किमी अंतर कापून आलेल्या २१८ रुग्णांचा मृत्यू

नागपूर : जळालेल्या रुग्णांवर तातडीने विशेष उपचार मिळाल्यास वाचण्याची शक्यता कित्येक पटीने वाढते. परंतु पूर्व विदर्भातील पाचही जिल्ह्यांत जळीत रुग्णांसाठी विशेष सोय नाही. रुग्णांना लांब अंतर कापून मेडिकलमध्ये उपचारासाठी यावे लागते. हे अंतरच या रुग्णांसाठी मृत्यूचे कारण ठरत आहे. नागपूर मेडिकल प्लास्टिक सर्जरी विभागाने केलेल्या अभ्यासात मेडिकलमध्ये ५० ते १०० पेक्षा जास्त किलोमीटर अंतर कापून आलेल्या २१८ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे पुढे आले.

वाढते शहर व औद्योगिकीकरणामुळे आगीच्या घटना वाढल्या आहेत. जखमी रुग्णांना विशेष उपचाराची व देखभालीची गरज असते. परंतु नागपूर सोडल्यास पूर्व विदर्भातील भंडारा, वर्धा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये आवश्यक सोयी नाहीत. अनेक रुग्णांना ५० व त्यापेक्षा जास्त किलोमीटर अंतर कापून उपचारासाठी नागपूरचे मेडिकल गाठावे लागते. हे अंतरच रुग्णांसाठी घातक ठरत आहे.

-३० ते ६० वयोगटात सर्वाधिक मृत्यू

अभ्यासात असेही दिसून आले की, जळालेले ६ ते १२ वर्षे वयोगटातील १५३ रुग्ण बरे झाले व ३१ रुग्णांचा मृत्यू झाला. १२ ते ३० वयोगटातील १९९ रुग्ण बरे झाले व १०३ रुग्णांचा मृत्यू झाला. ३० ते ६० वयोगटातील २०५ रुग्ण बरे झाले व ११९ रुग्णांचा मृत्यू झाला तर, ६० वयोगटावरील ४४ रुग्ण बरे होऊन ६९ रुग्णांचा मृत्यू झाला.

-मृत्यूमध्ये महिलांचे प्रमाण सर्वाधिक

डॉ. पाटील म्हणाले, अभ्यासात जळितांमध्ये बालके व पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे आढळून आले. शिवाय मृत्यूमध्येही महिलांचे प्रमाण मोठे होते. मेडिकलमध्ये २०१६ ते २०१९ या वर्षांत १२ वर्षाखालील २२१ बालके आली, यातील ३१ बालके दगावली. याच वर्षांत ३०४ पुरुष उपचारासाठी आले असताना ७६ मृत्यू, तर ३९८ महिला उपचारासाठी आले असताना यातील १९५ महिलांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

- अभ्यासातील धक्कादायक वास्तव

मेडिकलच्या प्लास्टिक सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. सुरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात २०१६ ते २०१९ या वर्षात विविध जिल्ह्यातून मेडिकलमध्ये उपचारासाठी आलेल्या जळीत रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. यात १०० पेक्षा जास्त किलोमीटर अंतर कापून मेडिकलमध्ये आलेल्या १७० रुग्णांचा, ५० ते १०० किलोमीटर अंतरावरून आलेल्या ४८ रुग्णांचा तर १० ते ५० किलोमीटर अंतरावरून आलेल्या ३९ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.

-किलोमीटर व मृत्यू

*अंतर : भरती रुग्ण : मृत्यू*

  • १० किमी. : २६३ : ६५
  • १० ते ५० किमी : १४३ : ३९
  • ५० ते १०० किमी : १४५ : ४८
  • १०० किमी व वरील : ३५४ : १७०

- वयोगटानुसार मृत्यूची संख्या

*वयोगट : बरे झालेले रुग्ण : मृत्यू*

  • १२ वर्षांपर्यंत : १५३ : ३१
  • १२ ते ३० वर्षे : १९९ :१०३
  • ३० ते ६० वर्षे : २०५ : ११९
  • ६० व त्यावरील : ४४ : ६९

-उपचारात उशीर, मृत्यूचे मुख्य कारण

जळाल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. अशा रुग्णांवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली मोठ्या प्रमाणात सलाइन द्यावे लागतात. लांब अंतरावरून मेडिकलमध्ये आलेल्या रुग्णांचा अभ्यास केला असता, बहुसंख्य रुग्णांच्या शरीरातील पाण्याची पातळी खूपच कमी झाल्याचे दिसून आले. दुसरे म्हणजे, प्रवासामुळे उपचारात होत असलेला उशीर, हे दोन्ही कारण मृत्यूला कारणीभूत ठरल्याचे आढळून आले.

-डॉ. सुरेंद्र पाटील, विभागप्रमुख, प्लास्टिक सर्जरी विभाग

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटलVidarbhaविदर्भ