शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

नागपूर-झारसुगुडा-बिलासपूर सेक्शनमध्ये मिळणार रेल्वेला 'कवच'

By नरेश डोंगरे | Updated: June 25, 2024 23:49 IST

lokmat Impact: दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून तयारी, दिल्ली रेल्वे बोर्डाकडे गेला प्रस्ताव

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : रेल्वे गाड्याच नव्हे तर प्रवाशांच्याही जिवाला धोका होणार नाही, रेल्वेचा अपघात होणार नाही, यासाठी स्वयंचलितपणे काम करणारे 'कवच' लवकरच दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या क्षेत्रात लावले जाणार आहे. तशा संबंधिची कागदोपत्री प्रक्रिया सुरू झाली आहे.

विशेष उल्लेखनीय म्हणजे, १७ जूनला पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग जिल्ह्यात रेल्वेचा भीषण अपघात झाला होता. १० जणांचा जागीच जीव गेला होता तर पन्नासावर प्रवाशांना गंभीर दुखापत झाली होती. १८ जूनला लोकमतने 'अपघात रोखणारी कवच सिस्टम थंडबस्त्यात' अशा आशयाचे वृत्त ठळकपणे प्रकाशित केले होते. त्याची नागपूर ते दिल्ली सर्वत्र जोरदार चर्चा झाली. रेल्वे प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेत नागपूरसह ठिकठिकाणच्या रेल्वे मार्गावर आणि गाड्यांमध्ये 'कवच सिस्टम' लावण्यासंबंधाने हालचाली सुरू केल्या. या पार्श्वभूमीवर, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील नागपूर-झारसुगुडा-बिलासपूर-रायपूर मार्गावर आणि रेल्वे गाड्यात तातडीने कवच सिस्टम लावण्यात यावी, असा प्रस्ताव दिल्लीला रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला. त्याला मंजूरी मिळताच कवच सिस्टम संबंधाने काम सुरू करण्यात येणार आहे.

असे आहे 'कवच'

दोन गाड्या एकाच ट्रॅकवर धावत असेल आणि लोको पायलटने वेळीच त्या सुरक्षित अंतरावर थांबवल्या नाही तर त्या एकमेकांना धडक देऊन मोठा अपघात घडतो. मात्र, तर 'कवच' सिस्टम कार्यान्वित केली असेल तर अतिउच्च रेडिओ फ्रिक्वेन्सीमुळे याच नव्हे तर ५ किलोमीटरच्या परिसरात वेगवेगळ्या रुटवर धावणाऱ्या गाड्यांचेही संरक्षण होते. चुकून कोणती ट्रेन रेड सिग्नल असतानाही धावत असेल तर त्या आणि त्या रुटवर धावणाऱ्या सर्व गाड्यांच्या लोको पायलटला, आजुबाजुच्या स्टेशन मास्टरला धोक्याची सूचना मिळते. एवढेच नव्हे तर पाच किलोमिटर परिसरातील सर्वच्या सर्व रेल्वेगाड्यांचे इंजिन काही वेळेसाठी आपोआप बंद पडते विशेष असे की, हे बहुगूणी 'कवच' पुर्णत: भारतीय बनावटीचे आहे.

 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे