शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

नागपूर-झारसुगुडा-बिलासपूर सेक्शनमध्ये मिळणार रेल्वेला 'कवच'

By नरेश डोंगरे | Updated: June 25, 2024 23:49 IST

lokmat Impact: दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून तयारी, दिल्ली रेल्वे बोर्डाकडे गेला प्रस्ताव

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : रेल्वे गाड्याच नव्हे तर प्रवाशांच्याही जिवाला धोका होणार नाही, रेल्वेचा अपघात होणार नाही, यासाठी स्वयंचलितपणे काम करणारे 'कवच' लवकरच दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या क्षेत्रात लावले जाणार आहे. तशा संबंधिची कागदोपत्री प्रक्रिया सुरू झाली आहे.

विशेष उल्लेखनीय म्हणजे, १७ जूनला पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग जिल्ह्यात रेल्वेचा भीषण अपघात झाला होता. १० जणांचा जागीच जीव गेला होता तर पन्नासावर प्रवाशांना गंभीर दुखापत झाली होती. १८ जूनला लोकमतने 'अपघात रोखणारी कवच सिस्टम थंडबस्त्यात' अशा आशयाचे वृत्त ठळकपणे प्रकाशित केले होते. त्याची नागपूर ते दिल्ली सर्वत्र जोरदार चर्चा झाली. रेल्वे प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेत नागपूरसह ठिकठिकाणच्या रेल्वे मार्गावर आणि गाड्यांमध्ये 'कवच सिस्टम' लावण्यासंबंधाने हालचाली सुरू केल्या. या पार्श्वभूमीवर, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील नागपूर-झारसुगुडा-बिलासपूर-रायपूर मार्गावर आणि रेल्वे गाड्यात तातडीने कवच सिस्टम लावण्यात यावी, असा प्रस्ताव दिल्लीला रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला. त्याला मंजूरी मिळताच कवच सिस्टम संबंधाने काम सुरू करण्यात येणार आहे.

असे आहे 'कवच'

दोन गाड्या एकाच ट्रॅकवर धावत असेल आणि लोको पायलटने वेळीच त्या सुरक्षित अंतरावर थांबवल्या नाही तर त्या एकमेकांना धडक देऊन मोठा अपघात घडतो. मात्र, तर 'कवच' सिस्टम कार्यान्वित केली असेल तर अतिउच्च रेडिओ फ्रिक्वेन्सीमुळे याच नव्हे तर ५ किलोमीटरच्या परिसरात वेगवेगळ्या रुटवर धावणाऱ्या गाड्यांचेही संरक्षण होते. चुकून कोणती ट्रेन रेड सिग्नल असतानाही धावत असेल तर त्या आणि त्या रुटवर धावणाऱ्या सर्व गाड्यांच्या लोको पायलटला, आजुबाजुच्या स्टेशन मास्टरला धोक्याची सूचना मिळते. एवढेच नव्हे तर पाच किलोमिटर परिसरातील सर्वच्या सर्व रेल्वेगाड्यांचे इंजिन काही वेळेसाठी आपोआप बंद पडते विशेष असे की, हे बहुगूणी 'कवच' पुर्णत: भारतीय बनावटीचे आहे.

 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे