शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

नागपूर-झारसुगुडा-बिलासपूर सेक्शनमध्ये मिळणार रेल्वेला 'कवच'

By नरेश डोंगरे | Updated: June 25, 2024 23:49 IST

lokmat Impact: दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून तयारी, दिल्ली रेल्वे बोर्डाकडे गेला प्रस्ताव

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : रेल्वे गाड्याच नव्हे तर प्रवाशांच्याही जिवाला धोका होणार नाही, रेल्वेचा अपघात होणार नाही, यासाठी स्वयंचलितपणे काम करणारे 'कवच' लवकरच दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या क्षेत्रात लावले जाणार आहे. तशा संबंधिची कागदोपत्री प्रक्रिया सुरू झाली आहे.

विशेष उल्लेखनीय म्हणजे, १७ जूनला पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग जिल्ह्यात रेल्वेचा भीषण अपघात झाला होता. १० जणांचा जागीच जीव गेला होता तर पन्नासावर प्रवाशांना गंभीर दुखापत झाली होती. १८ जूनला लोकमतने 'अपघात रोखणारी कवच सिस्टम थंडबस्त्यात' अशा आशयाचे वृत्त ठळकपणे प्रकाशित केले होते. त्याची नागपूर ते दिल्ली सर्वत्र जोरदार चर्चा झाली. रेल्वे प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेत नागपूरसह ठिकठिकाणच्या रेल्वे मार्गावर आणि गाड्यांमध्ये 'कवच सिस्टम' लावण्यासंबंधाने हालचाली सुरू केल्या. या पार्श्वभूमीवर, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील नागपूर-झारसुगुडा-बिलासपूर-रायपूर मार्गावर आणि रेल्वे गाड्यात तातडीने कवच सिस्टम लावण्यात यावी, असा प्रस्ताव दिल्लीला रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला. त्याला मंजूरी मिळताच कवच सिस्टम संबंधाने काम सुरू करण्यात येणार आहे.

असे आहे 'कवच'

दोन गाड्या एकाच ट्रॅकवर धावत असेल आणि लोको पायलटने वेळीच त्या सुरक्षित अंतरावर थांबवल्या नाही तर त्या एकमेकांना धडक देऊन मोठा अपघात घडतो. मात्र, तर 'कवच' सिस्टम कार्यान्वित केली असेल तर अतिउच्च रेडिओ फ्रिक्वेन्सीमुळे याच नव्हे तर ५ किलोमीटरच्या परिसरात वेगवेगळ्या रुटवर धावणाऱ्या गाड्यांचेही संरक्षण होते. चुकून कोणती ट्रेन रेड सिग्नल असतानाही धावत असेल तर त्या आणि त्या रुटवर धावणाऱ्या सर्व गाड्यांच्या लोको पायलटला, आजुबाजुच्या स्टेशन मास्टरला धोक्याची सूचना मिळते. एवढेच नव्हे तर पाच किलोमिटर परिसरातील सर्वच्या सर्व रेल्वेगाड्यांचे इंजिन काही वेळेसाठी आपोआप बंद पडते विशेष असे की, हे बहुगूणी 'कवच' पुर्णत: भारतीय बनावटीचे आहे.

 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे