शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

लोकमत इम्पॅक्ट : आधार लिंक नसणाऱ्या कार्डधारकांनाही मिळणार दोन महिन्याचे धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 21:15 IST

लॉकडाऊनदरम्यान रेशन कार्ड नसलेल्या २,३४८ लोकांचे नवीन रेशन कार्ड बनवण्यात आले. परंतु ते रेशन कार्ड आधारशी लिंक नसल्यामुळे त्यांना रेशन धान्याचा लाभ मिळू शकत नव्हता. यासंदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. प्रशासनानेही याची दखल घेतली असून या कार्डधारकांना आता जुलै वऑगस्ट महिन्याचे धान्य वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देनागरिकांना दिलासा : लॉकडाऊनमध्ये बनलेले होते नवीन कार्ड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनदरम्यान रेशन कार्ड नसलेल्या २,३४८ लोकांचे नवीन रेशन कार्ड बनवण्यात आले. परंतु ते रेशन कार्ड आधारशी लिंक नसल्यामुळे त्यांना रेशन धान्याचा लाभ मिळू शकत नव्हता. यासंदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. प्रशासनानेही याची दखल घेतली असून या कार्डधारकांना आता जुलै वऑगस्ट महिन्याचे धान्य वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.लॉकडाऊनदरम्यान रेशन कार्ड नसलेल्या गरीब लोकांना धान्य मिळत नसल्याने मोठी अडचण झाली. त्यांनाही रेशनचे धान्य मिळावे म्हणून त्यांचे रेशन कार्ड काढण्याची मोहीम सुरू करण्यात आली. यादरम्यान २,३४८ लोकांचे नवीन कार्ड बनवण्यात आले. परंतु त्यांचे कार्ड आधार लिंक नसल्यामुळे त्यांना रेशन दुकानातून धान्य मिळू शकत नव्हते. कारण आता रेशन धान्य वितरण व्यवस्था ही ऑनलाईन झाली आहे. त्यामुळे हे कार्डधारक आधार लिंक करण्यासाठी कार्यालयाच्या चकरा मारत होते. आधार लिंकची प्रक्रिया पूर्ण होण्यास किमान दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे या गरिबांना रेशन कधी मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. तेव्हा लोकमतने याबाबत वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. येत्या आठ दिवसात या रेशन कार्डधारकांना रेशन दुकानातून धान्य वितरित होणार असल्याचे सांगितले जाते. दुकानदारांना तसे निर्देश देण्यात आलेले आहेत.अनेकांकडे अजूनही रेशन कार्ड नाहीरेशन कार्ड नसणाऱ्यांसाठी लॉकडाऊनदरम्यान मोहीम राबवण्यात आली. रेशन दुकानासमोर एक पेटी ठेवून त्यात संबंधितांनी आपले आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र जमा करावे, असे सांगण्यात आले. परंतु सर्वच रेशन दुकानांसमोर ही व्यवस्था नव्हती. त्यामुळे शहरात अजूनही अनेक लोकांचे रेशन कार्ड बनलेले नाही. त्या गरिबांनाही धान्याची गरज आहे, याकडेही प्रशासन व सामाजिक संस्थांनी लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड