शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत इम्पॅक्ट : नागपुरातील ‘ते’ खांब हटविण्यासाठी ४१ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 23:21 IST

शहरातील वाहतुकीसाठी अडथळा बनलेल्या धोकादायक खांबांना हटविण्याची प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. वीज वितरण कंपनी महावितरणने यांना हटविण्यासाठी सुमारे ४१ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. आता नागपूर महानगरपालिका या अंदाजपत्रकाच्या आधारावर निविदा जारी करुन खांब हटविणे सुरू करेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ‘लोकमत’ने २३ आॅक्टोबरच्या अंकात ‘जनतेपासून वसुली झाल्यानंतरदेखील रस्त्यांवर खांब उभे असल्याच्या बाबीवर प्रकाश टाकला होता व या माध्यमातून जनतेच्या पैशांची कशी लूट होत आहे, याचा खुलासा केला होता हे विशेष.

ठळक मुद्देशहरात हजारहून अधिक धोकादायक खांब : जनतेकडून घेण्यात आले पैसे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील वाहतुकीसाठी अडथळा बनलेल्या धोकादायक खांबांना हटविण्याची प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. वीज वितरण कंपनी महावितरणने यांना हटविण्यासाठी सुमारे ४१ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. आता नागपूर महानगरपालिका या अंदाजपत्रकाच्या आधारावर निविदा जारी करुन खांब हटविणे सुरू करेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ‘लोकमत’ने २३ आॅक्टोबरच्या अंकात ‘जनतेपासून वसुली झाल्यानंतरदेखील रस्त्यांवर खांब उभे असल्याच्या बाबीवर प्रकाश टाकला होता व या माध्यमातून जनतेच्या पैशांची कशी लूट होत आहे, याचा खुलासा केला होता हे विशेष.मनपाच्या खराब आर्थिक स्थितीमुळे २००१-०२ मध्ये शहरात ‘आयआरडीपी’अंतर्गत रस्ते रुंदीकरणादरम्यान रस्त्यांच्या मध्ये आलेले १ हजार ८७ खांब हटले नव्हते. महावितरण व मनपा यासाठी आवश्यक असलेल्या ९१ कोटी ५० लाख रुपयांचा खर्च अर्धाअर्धा उचलतील, असे २०११ मध्ये निश्चित झाले. महावितरणने वीज नियामक आयोगाकडून आपला हिस्सा देण्यासाठी तीन वर्षांपर्यंत वीज बिलांच्या माध्यमातून ९ पैसे प्रति युनिटप्रमाणे जनतेकडून वसुली केली. परंतु मनपा-महावितरणने केवळ प्रत्येकी २० कोटी ५० लाख रुपयेच खर्च केले. ४१ कोटींचे काम झाल्यावर खांब हटविणेच बंद करण्यात आले. ५० कोटींची कामे प्रशासकीय प्रक्रियेत अडकली आहेत. यादरम्यान नवीन सिमेंट मार्ग बनविल्यामुळे काही खांब हटले. ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर मनपाच्या पुढाकारातून महावितरणने खांब हटविण्यासाठी अंदाजपत्रक तयार केले आहे. कंपनीच्या चमूने रस्त्यांचे सर्वेक्षण करुन ५३ कोटी ३२ लाख रुपयांचे काम निश्चित केले. यातील काही जागांवर खांब हटविण्याची आवश्यकता नसल्याची बाबदेखील लक्षात आली. अखेर या कामासाठी ४१ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. या कामासाठी महावितरणने अगोदरच जनतेकडून वीजबिलांच्या माध्यमातून २० कोटी ५० लाख रुपये वसूल केले आहे. तर मनपाचा दावा आहे की त्यांना यासाठी राज्य शासनाकडून अनुदान व कर्ज प्राप्त झाले आहे.कुठले खांब हटणार ?या माध्यमातून शहरातील विविध भागांतील खांब हटविण्यात येतील. यात रिंग रोड ते रामेश्वरी, वर्धमान नगर चौक ते विकास चौक, बोरगांव ते अवस्थी नगर, क्रीड़ा चौक ते तुकड़ोजी पुतळा, १० नंबर पूल ते आंबेडकर चौक, आंबेडकर रोड ते मनपा तलाव, छिंदवाड़ा रोड ते काटोल मार्ग, रेल्वे फीडर ते शहीद चौक, इतवारी रोड ते कामठी रोड, कामठी रोड ते अशोक चौक, म्हाळगी नगर से नरेंद्र नगर, ग्रेट नाग रोड ते जगनाड़े चौक, गजानन विद्यालय ते हुड़केश्वर मार्ग, दोसर भवन ते कब्रस्तान आणि बड़कस चौक ते सक्करदरा यामधील खांबांचा समावेश असेल.

टॅग्स :electricityवीजnagpurनागपूर