शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत इम्पॅक्ट : नागपुरातील ‘ते’ खांब हटविण्यासाठी ४१ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 23:21 IST

शहरातील वाहतुकीसाठी अडथळा बनलेल्या धोकादायक खांबांना हटविण्याची प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. वीज वितरण कंपनी महावितरणने यांना हटविण्यासाठी सुमारे ४१ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. आता नागपूर महानगरपालिका या अंदाजपत्रकाच्या आधारावर निविदा जारी करुन खांब हटविणे सुरू करेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ‘लोकमत’ने २३ आॅक्टोबरच्या अंकात ‘जनतेपासून वसुली झाल्यानंतरदेखील रस्त्यांवर खांब उभे असल्याच्या बाबीवर प्रकाश टाकला होता व या माध्यमातून जनतेच्या पैशांची कशी लूट होत आहे, याचा खुलासा केला होता हे विशेष.

ठळक मुद्देशहरात हजारहून अधिक धोकादायक खांब : जनतेकडून घेण्यात आले पैसे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील वाहतुकीसाठी अडथळा बनलेल्या धोकादायक खांबांना हटविण्याची प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. वीज वितरण कंपनी महावितरणने यांना हटविण्यासाठी सुमारे ४१ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. आता नागपूर महानगरपालिका या अंदाजपत्रकाच्या आधारावर निविदा जारी करुन खांब हटविणे सुरू करेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ‘लोकमत’ने २३ आॅक्टोबरच्या अंकात ‘जनतेपासून वसुली झाल्यानंतरदेखील रस्त्यांवर खांब उभे असल्याच्या बाबीवर प्रकाश टाकला होता व या माध्यमातून जनतेच्या पैशांची कशी लूट होत आहे, याचा खुलासा केला होता हे विशेष.मनपाच्या खराब आर्थिक स्थितीमुळे २००१-०२ मध्ये शहरात ‘आयआरडीपी’अंतर्गत रस्ते रुंदीकरणादरम्यान रस्त्यांच्या मध्ये आलेले १ हजार ८७ खांब हटले नव्हते. महावितरण व मनपा यासाठी आवश्यक असलेल्या ९१ कोटी ५० लाख रुपयांचा खर्च अर्धाअर्धा उचलतील, असे २०११ मध्ये निश्चित झाले. महावितरणने वीज नियामक आयोगाकडून आपला हिस्सा देण्यासाठी तीन वर्षांपर्यंत वीज बिलांच्या माध्यमातून ९ पैसे प्रति युनिटप्रमाणे जनतेकडून वसुली केली. परंतु मनपा-महावितरणने केवळ प्रत्येकी २० कोटी ५० लाख रुपयेच खर्च केले. ४१ कोटींचे काम झाल्यावर खांब हटविणेच बंद करण्यात आले. ५० कोटींची कामे प्रशासकीय प्रक्रियेत अडकली आहेत. यादरम्यान नवीन सिमेंट मार्ग बनविल्यामुळे काही खांब हटले. ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर मनपाच्या पुढाकारातून महावितरणने खांब हटविण्यासाठी अंदाजपत्रक तयार केले आहे. कंपनीच्या चमूने रस्त्यांचे सर्वेक्षण करुन ५३ कोटी ३२ लाख रुपयांचे काम निश्चित केले. यातील काही जागांवर खांब हटविण्याची आवश्यकता नसल्याची बाबदेखील लक्षात आली. अखेर या कामासाठी ४१ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. या कामासाठी महावितरणने अगोदरच जनतेकडून वीजबिलांच्या माध्यमातून २० कोटी ५० लाख रुपये वसूल केले आहे. तर मनपाचा दावा आहे की त्यांना यासाठी राज्य शासनाकडून अनुदान व कर्ज प्राप्त झाले आहे.कुठले खांब हटणार ?या माध्यमातून शहरातील विविध भागांतील खांब हटविण्यात येतील. यात रिंग रोड ते रामेश्वरी, वर्धमान नगर चौक ते विकास चौक, बोरगांव ते अवस्थी नगर, क्रीड़ा चौक ते तुकड़ोजी पुतळा, १० नंबर पूल ते आंबेडकर चौक, आंबेडकर रोड ते मनपा तलाव, छिंदवाड़ा रोड ते काटोल मार्ग, रेल्वे फीडर ते शहीद चौक, इतवारी रोड ते कामठी रोड, कामठी रोड ते अशोक चौक, म्हाळगी नगर से नरेंद्र नगर, ग्रेट नाग रोड ते जगनाड़े चौक, गजानन विद्यालय ते हुड़केश्वर मार्ग, दोसर भवन ते कब्रस्तान आणि बड़कस चौक ते सक्करदरा यामधील खांबांचा समावेश असेल.

टॅग्स :electricityवीजnagpurनागपूर