शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

वाचनीय : दर पाच वर्षांनी ‘महादेवा जातो गा...’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2024 07:40 IST

लोकशाहीची महाशिवरात्री पाच वर्षांनी येते आणि मतदानाचे पवित्र कर्तव्य मतदारांना पार पाडता यावे म्हणून डोंगरदऱ्यांमध्ये पायपीट करणारे सरकारी कर्मचारी शिवभक्त बनतात.

श्रीमंत माने, संपादक, नागपूर महाशिवरात्रीला पर्वताच्या कड्याकपारी ओलांडत गुहेवजा मंदिरात टीपेच्या आवाजात ‘महादेवा जातो गा...’ गात शंभू महादेवाच्या दर्शनाला शिवभक्त जातात. लोकशाहीची महाशिवरात्री पाच वर्षांनी येते आणि मतदानाचे पवित्र कर्तव्य मतदारांना पार पाडता यावे म्हणून डोंगरदऱ्यांमध्ये पायपीट करणारे सरकारी कर्मचारी शिवभक्त बनतात. महाराष्ट्राच्या वायव्य टोकावरच्या मणिबेलीपासून ते आग्नेय टोकावरच्या पेंडीगुडम किंवा काटापल्लीपर्यंत अनेक गावे अशी आहेत, की स्वातंत्र्यानंतर पाऊणशे वर्षांत अगदी निवडणुकीत मतदान करून घेण्यासाठीही तिथे जायला रस्ता नाही. पिण्याचे पाणी, वीज, आरोग्य व शिक्षणाच्या सुविधांबद्दल तर विचारच न केलेला बरा.  गुजरातच्या गीर अभयारण्यात केवळ एका मतदारासाठी केंद्र उभारले जाते. हिमालयाच्या उत्तर टोकावर लेह-लडाखमध्ये अतिदुर्गम व अतिशीत वातावरणात मतदानाचे कर्मचारी पोहोचतात. महाराष्ट्रात दुर्गम वाड्यावस्त्यांकडे मैलोनमैल पायपीट करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक होते. पण, त्या फाटक्या माणसांची आठवण आपल्याला पाच वर्षांत एकदाच, मतदार म्हणून येते. जणू, असे लोकशाहीवरचे लटके प्रेम दाखविण्यासाठी, किती प्रचंड परिश्रम घेऊन लोकशाही, प्रजासत्ताक टिकवितो, हे दाखविण्यासाठी तर आपण या वाड्या-वस्त्या मुद्दाम मागास ठेवतो. 

महाराष्ट्रातील पहिला मतदार, पहिले मतदान केंद्र नंदुरबार जिल्ह्यात मणिबेली येथे आहे. नर्मदा नवनिर्माण अभियानाची नर्मदा जीवन शाळा हे ते मतदान केंद्र. मणिबेली, धनखेडी व जांगथी या तीन गावांच्या मिळून अडीच हजारांच्या लोकसंख्येची ही गटग्रामपंचायत. मुंगीबाई दिलवरसिंग वळवी तिथल्या सरपंच आहेत. आधी दिलवरसिंग सरपंच तर गणेश वसावे ग्रामसेवक होते. मणिबेली व धनखेडी पुनर्वसित गावठाणात आहेत. मूळ गावे सरदार सरोवर प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात होती. जांगथी मात्र मूळ जागीच आहे. गटग्रामपंचायतीची जवळपास निम्मी लोकसंख्या जांगथीत आहे. 

गडचिरोलीची कथा वेगळी नाही...जी कथा नंदुरबारची, तीच गडचिरोलीची. पूर्व टोकावरच्या या जिल्ह्यात डोंगरदऱ्या, जंगलप्रदेश या भाैगोलिक अडचणी आहेतच. त्याशिवाय माओवाद्यांच्या हिंसाचाराचाही अडथळा आहे. त्यामुळेच २०६ केंद्रांवर ईव्हीएम यंत्रणा व अधिकारी, कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करावा लागणार आहे. अतिदुर्गम भागातील मतदान केंद्रांची संख्या तब्बल २९२ इतकी आहे. अनेक केंद्रांपर्यंत रस्ता नसल्याने कर्मचाऱ्यांना पोलिस बंदोबस्तात १०-१५ किलोमीटर पायपीट करावी लागते. पोलिंग पार्टीवर सतत माओवादी हल्ल्याचे, भीतीचे सावट असते. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Votingमतदान