शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

Lok Sabha Election 2019; नागपुरात बॅनर, फ्लेक्सच्या २६ तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 11:00 AM

निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहिता आणि खर्चाच्या उल्लंघनाची तक्रार करणाऱ्या नागरिकांसाठी निवडणूक आयोगाने ‘सी-व्हिजिल अ‍ॅप’च्या माध्यमातून प्रथमच सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

ठळक मुद्देसी-व्हिजिल अ‍ॅप’ नागरिकांसाठी ठरतेय प्रभावी अस्त्रअर्ध्या तासात कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहिता आणि खर्चाच्या उल्लंघनाची तक्रार करणाऱ्या नागरिकांसाठी निवडणूक आयोगाने ‘सी-व्हिजिल अ‍ॅप’च्या माध्यमातून प्रथमच सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या माध्यमातून नागरिकही स्वतंत्र व नि:पक्षपाती निवडणुकांच्या संचलनासाठी सक्रियपणे जबाबदार भूमिका बजावू शकतात. नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघातील २६ नागरिकांना ‘सी-व्हिजिल अ‍ॅप’चा वापर करून आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबतच्या तक्रारी प्रथमच दाखल केल्या आहेत.भारत निवडणूक आयोगाने नागरिकांसाठी ‘सी-व्हिजिल अ‍ॅप’ जनतेसाठी उपलब्ध करून दिले असून, नागपूर जिल्ह्यातील नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी असलेले बॅनर व फ्लेक्स असल्याबाबत सी-व्हिजिल अ‍ॅपवरून तक्रारी केल्या आहेत. यापैकी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सादर झालेल्या सर्व तक्रारींची तात्काळ दखल घेतली. यापैकी १३ ठिकाणी असलेले बॅनर तात्काळ हटविले आहे. तसेच १० तक्रारींची प्रत्यक्ष पडताळणी केली असता त्या जागेवर आचारसंहितेचा भंग होत नसल्याचे आढळून आले. दोन तक्रारी चौकशीस्तरावर आहेत. तर एक तक्रार निर्णय प्रक्रियेत असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.रामटेक लोकसभा मतदार संघात सी-व्हिजिल अ‍ॅप या मोबाईलच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या तक्रारीवरून कामठी व रामटेक येथील पाच तक्रारींचा समावेश आहे. नागपूर मतदार संघातील नागपूर-दक्षिणमध्ये दोन, नागपूर दक्षिण-पश्चिममधील ११, नागपूर-पूर्वमधील तीन तर नागपूर उत्तरमधील एका तक्रारीचा समावेश आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर या तक्रारीसंदर्भात सरासरी २ ते २९ मिनिटांच्या आत दखल घेऊन कारवाई करण्यात आली आहे.‘सी-व्हिजिल या अ‍ॅप’मार्फत नागरिकांना आदर्श आचारसंहिता भंग होत आहे असे वाटत असल्यास नागरिकांनी त्या घटनेचे एक छायाचित्र अथवा २ ते ३ मिनिटांचा व्हिडिओ रेकॉर्ड करावा आणि भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे स्वयंचलित स्थान मॅपिंगसह अ‍ॅपवर फोटो अथवा व्हिडिओ अपलोड करावा. त्यानंतर तक्रार करणाऱ्या नागरिकांच्या मोबाईलवर एक युनिक आयडी प्राप्त होतो. नागरिक अशाप्रकारे आचारसंहितेसंदर्भातील घटना नोंदवू शकतात.नागरिकांनी तक्रार नोंदविल्यानंतर ती अवघ्या पाच मिनिटातच जिल्हा नियंत्रण कक्षाकडे प्राप्त होते. त्या माहितीच्या आधारे तक्रारीचा आढावा घेण्यासाठी नियुक्त केलेल्या एसएसटी, व्हीएसटी आणि भरारी पथकाकडे ही तक्रार पाठविण्यात येते. त्यानंतर जीव्हीआयजी, आयएल अन्वेषक या जीआयएसआधारित मोबाईल अ‍ॅप्लिकेशनच्या सहाय्याने संबंधित पथक घटनास्थळावर अवघ्या १५ मिनिटांच्याआत पोहचणे अपेक्षित आहे.संबंधित तक्रारीबाबत प्राथमिक तपास व तक्रारींच्या तथ्यांची तपासणी करून यासंबंधीचा अहवाल या अ‍ॅपद्वारे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे पाठविल्या जातो. हा अहवाल ३० मिनिटांपेक्षा कमी कालावधीत पोहचणे आवश्यक आहे. या तक्रारींमध्ये तथ्य आढळून आल्यास भारत निवडणूक आयोगाच्या राष्ट्रीय तक्रार पोर्टलवर माहिती पाठविण्यात येते आणि तक्रार अपलोड केल्यापासून अवघ्या १०० मिनिटांच्या आत तक्रारींची स्थिती तक्रारदार नागरिकांना पाठविण्यात येईल. तक्रार करणाऱ्या नागरिकांना मोबाईलवरसुद्धा संदेशाद्वारे कळविण्यात येईल.

कुणी आमिष दाखवत असेल तरी तक्रार करानागरिकांनी आचारसंहिता भंग होत असलेल्या तक्रारीसंदर्भात ‘सी-व्हिजिल अ‍ॅप’चा वापर करावा तसेच तक्रार नोंदवायची असल्यास राज्य संपर्क क्रमांक १९५० यावरसुद्धा कॉल करता येईल. ‘सी-व्हिजिल मार्फत मतदारांना पैसा, मद्य आणि अमली पदार्थांचे वाटप मतदारांना मारहाण अथवा दमबाजीचा प्रकार, जमावाला चिथावणीखोर भाषण तसेच मतदारांना आमिष आदीबाबत तक्रार करता येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी आवाहन केले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक