शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
2
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
3
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
4
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
5
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
6
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
7
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
8
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
9
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
10
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
11
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
12
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
13
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
14
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
15
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
16
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
17
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
18
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
19
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
20
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात लॉकडाऊनमधील जप्त वाहनचालकांचे परवाने रद्द होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 23:35 IST

लॉकडाऊन आणि पोलिसांनी वारंवार सांगूनही विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या वाहनचालकांची आता खैर नाही. वाहतूक पोलीस वाहनचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करून आरटीओच्या माध्यमातून त्यांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे.

ठळक मुद्देपहिल्या दिवशी ७५ वाहनचालकांविरुद्ध गुन्हा दाखल : वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊन आणि पोलिसांनी वारंवार सांगूनही विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या वाहनचालकांची आता खैर नाही. वाहतूक पोलीस वाहनचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करून आरटीओच्या माध्यमातून त्यांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे. वाहतूक पोलिसांनी गुरुवारी पहिल्याच दिवशी ७५ वाहने जप्त करून या सर्वांविरुद्ध भादंवि कलम १८८ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.लॉकडाऊन असूनही लोक रस्त्यावर वाहनांसह फिरताना सर्रास दिसून येत आहेत. वाहतूक पोलिसांनी अशा विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या चालकांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. सुरुवातीला वाहनचालकांविरुद्ध चालानची कारवाई करण्यात आली. तरीही लोक ऐकायला तयार नाहीत. त्यामुळे आता वाहने जप्त करणे सुरू केले आहे. आतापर्यंत ५६९ वाहने जप्त करण्यात आली आहेत. वाहने जप्त केल्यानंतरही रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्या कमी होत नव्हती. त्यामुळे आता वाहतूक पोलिसांनी अशा चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचे वाहन चालविण्याचे परवाने रद्द करण्यास सुरुवात केली आहे.वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांच्या नेतृत्वात गुरुवारी ७५ वाहनचालकांविरुद्ध भादंवि कलम १८८ अंतर्गत लॉकडाऊनचे उल्लंघन करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपींची वाहने जप्त करण्यात आली आहेत. सर्वाधिक २९ वाहने कामठी चेंबरने जप्त केली आहेत. वाहतूक शाखा येणाºया दिवसात आरटीओकडून आरापींचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्याची शिफारस करणार आहे.वाहतूक शाखेचे उपायुक्त विक्रम साळी यांनी सांगितले की, उपद्रवी आणि गैरजबाबदार लोक लॉकडाऊनचे महत्त्व समजून घ्यायला तयार नाहीत. ते स्वत: आणि आपल्या कुटुंबासह सर्वसामान्य नागरिकांचे जीवन धोक्यात घालत आहेत. कोरोनाशी लढाई सोशल डिस्टन्स आणि घरी राहूनच लढली जाऊ शकते. यानंतरही लोक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. पोलिसांना चकमा देऊन पळून जात आहेत. असे लोक पोलिसांना चकमा तर देऊ शकतात परंतु स्वत:ला आणि आपल्या कुटुंबाला कोरोना विषाणूच्या संसर्गापासून वाचवू शकत नाहीत. त्यामुळेच वाहतूक शाखेने अशा लोकांविरुद्ध गुन्हे दाखल ककरून त्यांचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.पोलीस उपायुक्त साळी यांनी असेही सांगितले की, आरटीओला सांगण्यात येईल की, आरोपी वाहनचालक समाजाप्रति गैरजबाबदार आहेत. त्यांच्या कृत्यामुळे समाजाला धोका निर्माण होतो. त्यामुळे त्यांचा वाहन चालवण्याचा परवाना रद्द करून त्यांना यापासून वंचित ठेवण्यात यावे. याशिवाय दोषी वाहनचालकांविरुद्ध न्यायालयातसुद्धा आरोपपत्र दाखल करण्यात येईल. वाहतूक पोलिसांची ही मोहीम लॉकडाऊन असेपर्यंत सुरू राहील. तेव्हा नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही उपायुक्त साळी यांनी केले आहे.वाहन सोडविणे कठीण होईलवाहतूक पोलिसांनी लॉकडाऊनपासून आतापर्यंत ५६९ वाहने जप्त केली आहेत. ही वाहने लॉकडाऊननंतर दंडाची रक्कम भरून सोडवायची होती. गुरुवारी एफआयआर दाखल करणे सुरू झाले आहे. यामुळे वाहने सोडवणे आता कठीण होईल. वाहतूक शाखा आरोपी वाहनचालकांविरुद्ध न्यायालयातही आरोपपत्र दाखल करणार आहे. आरोपी चालकास वाहन सोडवण्यासाठी न्यायालयात अर्ज करावा लागेल. न्यायालयाच्या निर्देशानंतरच वाहतूक शाखा वाहन सोपवेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याtraffic policeवाहतूक पोलीस