शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

लॉकडाऊनमुळे लाल मिरचीचे भाव चढेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 10:17 IST

यंदाच्या हंगामात लॉकडाऊनमध्ये मालवाहतूक बंद राहिल्याने कळमन्यात लाल मिरचीची आवक बंद होती. त्यामुळे गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा भाव वाढले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यंदाच्या हंगामात लॉकडाऊनमध्ये मालवाहतूक बंद राहिल्याने कळमन्यात लाल मिरचीची आवक बंद होती. त्यामुळे गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा भाव वाढले आहेत. प्रत्येक राज्यातून आवक आणि दर्जानुसार कळमन्यात भाव १२० ते १५५ तर किरकोळमध्ये १८० ते १९० रुपयांपर्यंत विकली जात आहे. लॉकडाऊनमुळे यंदा लाल मिरचीचे भाव चढेच आहेत.दैनंदिन आहारात तिखटाचे महत्त्व असून स्वयंपाकघरातील महत्त्वपूर्ण भाग आहे. जेवण झणझणीत आणि चविष्ट होण्यासाठी मसाल्यासह तिखटाची गरज असते. महाराष्ट्रात उन्हाळ्यात महिलातर्फे लाल मिरची खरेदी करून वर्षभराचे तिखट तयार करण्याची परंपरा आहे. पण यावर्षी अनेकांनी मिरची खरेदी केलीच नाही. लॉकडाऊनच्या काळात प्लास्टिकबंद तिखट खरेदी करून स्वयंपाकाची गरज भागविली. लॉकडाऊनमुळे सर्व राज्यांच्या सीमा बंद असल्याने प्रारंभीच्या काळात आवक झालीच नाही. लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यानंतर मालवाहतुकीची परवानगी घेऊन आवक सुरू झाली.कळमना बाजाराचे अडतिये आणि व्यापारी संजय वाधवानी म्हणाले, कळमना बाजार आठवड्यात केवळ सोमवारी एक दिवस भरतो. गेल्या सोमवारी बाजारात जवळपास १५ हजार पोत्यांची आवक झाली. प्रत्येक पोते हे ३० ते ४० किलोचे असते. सर्वाधिक आवक आंध्र प्रदेशातून असते. पण यंदा आवक कमीच आहे. येथील शेतकऱ्यांनी मिरची कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवली आहे. या राज्यात जवळपास ६० लाख पोती कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवली आहेत. लॉकडाऊन पूर्णपणे हटल्यानंतर आवक वाढेल, त्यानंतरच भाव कमी होतील. पुढील सोमवारी आवकीनंतरच भाव ठरेल.वाधवानी म्हणाले, कळमन्यात चांगल्या प्रतीच्या मिरचीचे भाव १४० ते १५५ रुपयांदरम्यान आहेत. गेल्यावर्षी भाव १२० ते १३५ रुपयांदरम्यान होते. मध्यंतरी गुंटूर मिरचीचे भाव १६० ते १६५ रुपयांवर पोहोचले होते. पण आता कमी झाले आहेत. महाराष्ट्रातील सिरोंचा मिरचीचे भाव १२० ते १३५, राजुरा मिरची १३० ते १५० रुपये भाव आहेत. किरकोळमध्ये जास्त भावात विक्री होत आहे. गेल्या काही वर्षांपासून कळमन्यात मिरचीची आवक कमी झाली आहे. ८ ते १० वर्षांपूर्वी आठवड्यात ७० ते ८० हजार पोत्यांची आवक व्हायची, पण आता १५ हजार पोत्यांपर्यंत कमी झाली आहे. व्यापाऱ्यांनी राज्याराज्यातून परस्पर खरेदी सुरू केल्याने कळमन्यातील व्यापार कमी झाला आहे. मिरचीची निर्यात मलेशिया, चीन, श्रीलंका, थायलँड, सौदी अरब आणि अन्य देशात होते.लाल मिरचीचे सर्वाधिक उत्पादन आंध्र प्रदेशात तर त्या खालोखाल मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात आणि महाराष्ट्रात घेतले जाते. आंध्र प्रदेशात मिरचीचे कोल्ड स्टोरेज सर्वात जास्त आहेत. प्रत्येक राज्यात उत्पादन होणाऱ्या लाल मिरचीची चव वेगवेगळी आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील मिरचीचा रंग लाल व चमकदार, मध्यम तिखट असते. याशिवाय खम्मम विभागात उत्पादित होणारी तेजा मिरची जगभर प्रसिद्ध आहे. ही मिरची जास्त तिखट असलेली ओळखली जाते. तिखट खाणाऱ्या लोकांची या मिरचीला मागणी असते. कर्नाटकातील बेडगी भागात उत्पादन होणारी मिरचीचा रंग भडक, सौम्य तिखट असते. त्यामुळे या मिरचीला तारांकित हॉटेलमध्ये चांगली मागणी असते.

 

टॅग्स :vegetableभाज्याbusinessव्यवसाय