शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
4
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
5
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
6
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
7
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
8
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
9
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
10
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
11
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
12
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
13
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
14
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
15
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
16
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
17
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
18
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
19
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
20
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!

लॉकडाऊनमुळे लाल मिरचीचे भाव चढेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 10:17 IST

यंदाच्या हंगामात लॉकडाऊनमध्ये मालवाहतूक बंद राहिल्याने कळमन्यात लाल मिरचीची आवक बंद होती. त्यामुळे गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा भाव वाढले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यंदाच्या हंगामात लॉकडाऊनमध्ये मालवाहतूक बंद राहिल्याने कळमन्यात लाल मिरचीची आवक बंद होती. त्यामुळे गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा भाव वाढले आहेत. प्रत्येक राज्यातून आवक आणि दर्जानुसार कळमन्यात भाव १२० ते १५५ तर किरकोळमध्ये १८० ते १९० रुपयांपर्यंत विकली जात आहे. लॉकडाऊनमुळे यंदा लाल मिरचीचे भाव चढेच आहेत.दैनंदिन आहारात तिखटाचे महत्त्व असून स्वयंपाकघरातील महत्त्वपूर्ण भाग आहे. जेवण झणझणीत आणि चविष्ट होण्यासाठी मसाल्यासह तिखटाची गरज असते. महाराष्ट्रात उन्हाळ्यात महिलातर्फे लाल मिरची खरेदी करून वर्षभराचे तिखट तयार करण्याची परंपरा आहे. पण यावर्षी अनेकांनी मिरची खरेदी केलीच नाही. लॉकडाऊनच्या काळात प्लास्टिकबंद तिखट खरेदी करून स्वयंपाकाची गरज भागविली. लॉकडाऊनमुळे सर्व राज्यांच्या सीमा बंद असल्याने प्रारंभीच्या काळात आवक झालीच नाही. लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यानंतर मालवाहतुकीची परवानगी घेऊन आवक सुरू झाली.कळमना बाजाराचे अडतिये आणि व्यापारी संजय वाधवानी म्हणाले, कळमना बाजार आठवड्यात केवळ सोमवारी एक दिवस भरतो. गेल्या सोमवारी बाजारात जवळपास १५ हजार पोत्यांची आवक झाली. प्रत्येक पोते हे ३० ते ४० किलोचे असते. सर्वाधिक आवक आंध्र प्रदेशातून असते. पण यंदा आवक कमीच आहे. येथील शेतकऱ्यांनी मिरची कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवली आहे. या राज्यात जवळपास ६० लाख पोती कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवली आहेत. लॉकडाऊन पूर्णपणे हटल्यानंतर आवक वाढेल, त्यानंतरच भाव कमी होतील. पुढील सोमवारी आवकीनंतरच भाव ठरेल.वाधवानी म्हणाले, कळमन्यात चांगल्या प्रतीच्या मिरचीचे भाव १४० ते १५५ रुपयांदरम्यान आहेत. गेल्यावर्षी भाव १२० ते १३५ रुपयांदरम्यान होते. मध्यंतरी गुंटूर मिरचीचे भाव १६० ते १६५ रुपयांवर पोहोचले होते. पण आता कमी झाले आहेत. महाराष्ट्रातील सिरोंचा मिरचीचे भाव १२० ते १३५, राजुरा मिरची १३० ते १५० रुपये भाव आहेत. किरकोळमध्ये जास्त भावात विक्री होत आहे. गेल्या काही वर्षांपासून कळमन्यात मिरचीची आवक कमी झाली आहे. ८ ते १० वर्षांपूर्वी आठवड्यात ७० ते ८० हजार पोत्यांची आवक व्हायची, पण आता १५ हजार पोत्यांपर्यंत कमी झाली आहे. व्यापाऱ्यांनी राज्याराज्यातून परस्पर खरेदी सुरू केल्याने कळमन्यातील व्यापार कमी झाला आहे. मिरचीची निर्यात मलेशिया, चीन, श्रीलंका, थायलँड, सौदी अरब आणि अन्य देशात होते.लाल मिरचीचे सर्वाधिक उत्पादन आंध्र प्रदेशात तर त्या खालोखाल मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात आणि महाराष्ट्रात घेतले जाते. आंध्र प्रदेशात मिरचीचे कोल्ड स्टोरेज सर्वात जास्त आहेत. प्रत्येक राज्यात उत्पादन होणाऱ्या लाल मिरचीची चव वेगवेगळी आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील मिरचीचा रंग लाल व चमकदार, मध्यम तिखट असते. याशिवाय खम्मम विभागात उत्पादित होणारी तेजा मिरची जगभर प्रसिद्ध आहे. ही मिरची जास्त तिखट असलेली ओळखली जाते. तिखट खाणाऱ्या लोकांची या मिरचीला मागणी असते. कर्नाटकातील बेडगी भागात उत्पादन होणारी मिरचीचा रंग भडक, सौम्य तिखट असते. त्यामुळे या मिरचीला तारांकित हॉटेलमध्ये चांगली मागणी असते.

 

टॅग्स :vegetableभाज्याbusinessव्यवसाय