शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

लॉकडाऊन बर्थडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 09:12 IST

वाढदिवस म्हणजे नेमके काय? वाढदिवस साजरा करणे म्हणजे पुढच्या वर्षात पदार्पण करताना मागच्या एक वर्षाच्या काळात ईश्वराने दिलेल्या साधनेच्या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त करून पुढे अशीच कृपादृष्टी ठेवण्याबद्दल ईश्वराचे आभार मानणे.

डॉ. शीतल जोशीलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: लॉकडाऊन सुरु असल्याने यावर्षी बहुतेक सर्वांचेच वाढदिवस, अ‍ॅनिवर्सरीज हे घरीच साजरे झालेत. त्यामुळे कोणताही बडेजाव न करता साधेपणाने घरातल्या घरातच ते साजरे करावे लागले. एकीकडे घरात राहून कंटाळलेले आपण बाहेर जाण्याच्या या संधीला पण मुकलो. पण खरंच या गोष्टीकडे आपण सकारात्मकतेने पाहिले तर! कारण आजकाल आपण कोणताही प्रसंग असो तो वाढदिवस असो की अ‍ॅनिवर्सरी आॅफीसमध्ये मिळणारं प्रमोशन असो की आजकाल आपण साजरे करणारे अनेक डेज. कुठलंही सेलिब्रेशन म्हटलं की आपण वाट धरतो ती हॉटेल्सची. हल्लीच्या पिढीला तर घरात कोणत्या गोष्टीचं सेलिब्रेशन करणं म्हणजे न पटणारं आहे. त्यातल्या त्यात बरेचजण नोकरी करणारे असल्यामुळे घरी काही करत बसायला कोणाजवळ वेळ नाही. पण यंदा कोरोनाने सर्वांना वेळच वेळ दिला आहे. त्यामुळे या लॉकडाऊनमध्ये आलेले सर्वांचे वाढदिवस खास ठरले आहेत. त्यातली मीही एक आहे. वाढदिवस म्हणजे नेमके काय? वाढदिवस साजरा करणे म्हणजे पुढच्या वर्षात पदार्पण करताना मागच्या एक वर्षाच्या काळात ईश्वराने दिलेल्या साधनेच्या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त करून पुढे अशीच कृपादृष्टी ठेवण्याबद्दल ईश्वराचे आभार मानणे. वाढ आणि दिवस म्हणजे आपल्या आयुष्यात झालेली आणखी एक वर्षाची वाढ. खरं म्हणजे आपल्या आयुष्यातले एक वर्ष कमी होते. पण यावेळेस मात्र ही नकारात्मकता आपण येऊ देत नाही. आपल्याला या दिवशी भरभरून शुभेच्छा मिळाव्यात, आशीर्वाद मिळावे, आपलं कौतुक व्हावं ही आपली अपेक्षा असते आणि हे साहजिक आहे. आता तर सोशल मिडीयामुळे दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव चालू असतो. दिवसभर आपण स्पेशल असल्याची जाणीवही होत राहते. आपण हा आनंद अनुभवत राहतो, त्यामुळे त्याचे आभारच मानायला हवेत! नाही का! आनंद कोणाला नको असतो. प्रत्येक जण तो मिळवण्यासाठी धडपडत असतो. भलेही तो मिळवण्याचा प्रकार प्रत्येकाचा वेगळा असू शकतो. आपल्या वाढदिवशी आपल्या घरची माणसं आपल्यासाठी काही खास करतात. आपली मुलं किचनमध्ये धडपडतात. नवरा काही खास करून खाऊ घालतो. भेटीगाठी होऊ शकत नसल्यामुळे आप्तेष्टांसाठी विविध व्हिडीओज बनवून, कविता लिहून आपले प्रेम व्यक्त करत आहेत. हा अनुभव किती आनंददायी आणि अवर्णनीय आहे. पैसे खर्च करून हा आपण मिळवू शकत नाही. त्या व्यक्तीबद्दल असणारे प्रेम, आपुलकी, जिव्हाळा असणे हे यामागचे कारण असते. मागील काही वर्षात काही अंशी या आनंदाला आपण सर्वच मुकलो होतो. याचे कारण म्हणजे काही खास असलं की आपण ते साजरा करायला बाहेर काढता पाय घ्यायचो. पण पैशाने भावना विकत घेता येत नाही ना ! कोरोना आला आणि बरंच काही शिकवून गेला. आपण घरात बंदिस्त झालो. सुरुवातीला फार अवघडले गेलो. घरात सर्वांनी इतका वेळ एकत्र राहायची आपल्याला सवयच नाही. लॉकडाऊन वाढत गेला आणि आलेल्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला आपण हळूहळू शिकलो. या कालावधीत बरेच जण पॅनिक झाले, अस्वस्थ झाले. पण जमेची बाजूही की घरात इतके दिवस एकत्र राहून आपण एकमेकांशी जुळवून घ्यायला शिकलो. अवाढव्य खर्च न करताही आपण महिना काढू शकतो हेही शिकलो. कोरोना संकटाने शिकवलेली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दया, करुणा बाळगा व इतरांविषयी आदर ठेवा. प्रत्येकाला सम्मानाने वागवा. तो आपल्यापेक्षा वयाने लहान असो की मोठा वा गरीब असो की श्रीमंत. या गोष्टी मला शिकवण्याची काहीच गरज नाही. आपण सर्व सुज्ञ आहात. पण जीवनाच्या शर्यतीत आपण ज्या वेगाने पळत सुटलो होतो त्यात याचे विस्मरण झाले होते हे नक्की ! या सर्व गोष्टींची आठवण कोरोनाने आपल्याला पुन्हा एकदा करून दिली आहे. जीवन आणि पैसा यातला फरक सर्वांना कळला. पैसे कमावण्याच्या शर्यतीत आपण असे पळत सुटलो आहोत की पैशाशिवाय आनंदच नाही. मुळी ही आपली धारणा होऊन बसली आहे. त्यामुळे झालं काय तर जवळ असलेल्या आनंदाला मुकतो आहोत आणि दिवस काय आलेत. जीवनाची शाश्वतीच उरली नाही. सारं आयुष्य पैशासाठी खर्ची घातलं. आता तो खर्च करायला बाहेर पडू शकत नाही. कोरोनाने साऱ्या जगाला हतबल करून सोडलं आहे. तंत्रज्ञान विकास, सर्वशक्तीमान बनण्याच्या हव्यासात हे विषाणूंचं देणं आपल्या पदरी पडलं आहे. पुन्हा कोणता विषाणू दाराशी येऊन उभा राहील हे सांगता येत नाही आणि जर या संकटात आपली प्रिय व्यक्ती सापडली तर तिचे अंत्यदर्शनही दुर्लभ होऊन बसतं. म्हणून आपल्या आप्तस्वकीयांसोबत वेळ घालवा, त्यांना समजून घ्या, येणारा प्रत्येक क्षण आनंदाने जगा, निसर्गावर भरभरून प्रेम करा, जीवनाचा आनंद लुटा, तो शोधा म्हणजे सापडेलच!

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस