शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
2
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
3
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
4
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
5
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
6
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
7
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
8
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
9
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
10
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
11
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
12
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
13
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
14
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
15
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
16
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
17
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
18
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
19
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
20
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?

साहित्यिक आणि रसिकांनो, संमेलनात सहभागी व्हा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 01:16 IST

यवतमाळ नगरीत ज्येष्ठ मराठी साहित्यिक-विदुषी डॉ. अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारपासून ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला प्रारंभ होत आहे. संमेलनाच्या पार्श्वभूमीवर घडलेला घटनाक्रम दुर्दैवी आहे व आम्हीही त्याचा निषेध करतो. मात्र साहित्यिक व रसिकांनी संमेलनावर त्याचा राग काढू नये. मराठी भाषा आणि साहित्यावर निखळ प्रेम करणाऱ्या तमाम साहित्यिक व रसिकांनी त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन विदर्भातील साहित्यिकांनी केले आहे.

ठळक मुद्देवैदर्भीय साहित्यिकांचे आवाहन : अरुणा ढेरे यांचा सन्मान राखण्याची विनंती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यवतमाळ नगरीत ज्येष्ठ मराठी साहित्यिक-विदुषी डॉ. अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारपासून ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला प्रारंभ होत आहे. संमेलनाच्या पार्श्वभूमीवर घडलेला घटनाक्रम दुर्दैवी आहे व आम्हीही त्याचा निषेध करतो. मात्र साहित्यिक व रसिकांनी संमेलनावर त्याचा राग काढू नये. मराठी भाषा आणि साहित्यावर निखळ प्रेम करणाऱ्या तमाम साहित्यिक व रसिकांनी त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन विदर्भातील साहित्यिकांनी केले आहे.या निवेदनात नागपूरसह विदर्भातील ज्येष्ठ साहित्यिक, कलावंत व निवेदकांचाही समावेश आहे. तब्बल ४५ वर्षांनी यवतमाळात होत असलेल्या या संमेलनात निवडणुकीशिवाय महिलेला अध्यक्षपदाचा सन्मान लाभला आहे. १४१ वर्षांच्या इतिहासात महिला संमेलनाध्यक्ष होण्याची ही जेमतेम पाचवी वेळ आहे. कुठल्याही वादात न अडकणाऱ्या अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षपदाचे स्वागत व सन्मान व्हावा, अशी अपेक्षा निवेदनात करण्यात आली आहे.आपल्या मराठी भाषेला असलेली साहित्य संमेलनांची उज्ज्वलतम, महान आणि पृथगात्म अशी परंपरा सर्व भारतीय भाषाभगिनींमध्ये एकमेवाद्वितीय आहे. ती लक्षात घेता अवघ्या मराठी भाषकांच्या या साहित्य-संस्कृतीच्या वार्षिकोत्सवात सर्व रसिकांनी व साहित्यिकांनी सहभागी व्हावे, असे विनम्र आवाहन साहित्यिकांनी केले. यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक आशा बगे व माजी संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांच्यासह डॉ. वि.स जोग, विवेक घळसासी, डॉ. हरिश्चंद्र बोरकर, डॉ. मदन कुलकर्णी, डॉ. रवींद्र शोभणे, डॉ. कुमार शास्त्री, डॉ. मिर्झा रफी अहमद बेग, प्रकाश एदलाबादकर, डॉ. पराग घोंगे, शुभांगी भडभडे, ज्ञानेश्वर महाराज वाघ, लखनसिंग कटरे, सुप्रिया अय्यर, डॉ. राजन जयस्वाल, प्रा. सुरेश देशपांडे, आशुतोष अडोणी, डॉ. राजेंद्र नाईकवाडे, अनिल सांबरे, डॉ. सुमंत देशपांडे, डॉ. अरविंद देशमुख, डॉ. उत्तम रुद्रावार, विंग कमांडर अशोक मोटे, कर्नल अभय पटवर्धन, सतीश तराळ, वसंत वाहोकर, अनिल शेंडे, श्याम माधव धोंड, मोहिनी मोडक, स्वाती दामोदरे, रवींद्र देशपांडे, डॉ. स्वानंद पुंड, हेमंत खडके, विवेक कवठेकर, श्रीपाद कोठे, आशाताई पांडे, इसादास भडके, सदानंद बोरकर, प्रशांत आरवे, इरफान शेख, डॉ. सुभाष लोहे, डॉ. राम आर्वीकर, रेणुका देशकर, डॉ. मोना चिमोटे डॉ. राजा धर्माधिकारी, विष्णू सोळंके, श्रीपाद प्रभाकर जोशी, डॉ. अविनाश मोहरील, डॉ. संध्या अमृते, डॉ. रमा गोळवलकर,चंद्रकांत लाखे, सचिन उपाध्याय, मकरंद कुलकर्णी, मनीषा अतुल, डॉ. अमृता इंदूरकर, डॉ. कोमल ठाकरे, डॉ. संजय पोहरकर, बन्सी कोठेवार, मीनल येवले यांचा समावेश आहे.पत्रकारांचेही आवाहनसाहित्य संमेलनाबद्दल झालेला वाद दुर्दैवी असला तरी साहित्यिकांनी, वाचकांनी, रसिकांनी विचलित न होता या संमेलनात मोठ्या संख्येने भाग घेऊन मराठी भाषेचा हा उत्सव थाटात साजरा करावा, असे कळकळीचे आवाहन नागपुरातील ज्येष्ठ पत्रकारांनी केले आहे. महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र, नागपूरचे अध्यक्ष शिरीष बोरकर, सरचिटणीस ब्रह्माशंकर त्रिपाठी, मुंबई प्रेस क्लबचे सभापती धर्मेंद्र जोरे, ज्येष्ठ संपादक ल. त्र्यं. जोशी, विनोद देशमुख, अनंत कोळमकर, अविनाश पाठक आदींचा समावेश आहे. साहित्य संमेलन हा महाराष्ट्राचा सन्मान आहे आणि तो कोणत्याही परिस्थितीत कायम राखला जाणे आवश्यक आहे. नयनतारा सहगल यांच्यासारख्या ज्येष्ठ लेखिकेला आमंत्रण देऊन नंतर ते मागे घेण्याचा प्रकार संतापजनक आणि निषेधार्हच आहे. पाहुण्यांशी असे वागणे विदर्भाच्या आतिथ्यशील संस्कृतीला शोभणारे नक्कीच नाही. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि संमेलनाला गालबोट लावणाऱ्यांचा बुरखा फाडला गेला पाहिजे, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

 

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनYavatmalयवतमाळ