शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

ओबीसींच्या जनगणनेबाबत मोदींना लिहिणार पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:59 IST

लोकमत न्ययूज नेटवर्क नागपूर : मागील काही महिन्यांपासून ओबीसीच्या मुद्द्यांवर राज्यातील राजकारण तापले असून, ओबीसींच्या जनगणनेसाठी राज्यात ठिकठिकाणी ...

लोकमत न्ययूज नेटवर्क

नागपूर : मागील काही महिन्यांपासून ओबीसीच्या मुद्द्यांवर राज्यातील राजकारण तापले असून, ओबीसींच्या जनगणनेसाठी राज्यात ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत. यातच आता भाजप नेते आ. गोपीचंद पडळकर यांनीही ओबीसी जनगणना व्हावी, असे स्पष्ट करीत त्यासाठी मी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार असल्याचे शनिवारी येथे पत्रपरिषदेत जाहीर केले.

ओबीसींची जनगणना न झाल्यामुळे त्यांना अल्प प्रमाणात शासकीय योजनांचा लाभ मिळतो. तर भटक्या जमातींची दयनीय परिस्थिती आहे. तत्कालिन भाजप सरकारने ओबीसीसाठी स्थापन केलेल्या महाज्योतीकडे सध्या दुर्लक्ष होत आहे. सारथीला एका दिवसांत निधी दिला जात असताना महाज्योतीबाबत आकस का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ओबीसीमध्ये ३४६ जाती असताना राज्य शासनाने केवळ ८० कोटींचा निधी दिला. यातून समाजाचे काय हित साधले जाणार? तत्कालिन सरकारने महाज्योतीची स्थापना केल्यानंतर ३८० कोटींचा निधी जाहीर केला होता; परंतु सत्ताबदल झाल्यानंतर तो निधीही खर्च केला नाही. केवळ कागदावरच संस्थेचे अस्तित्व दिसून येते. राज्य सरकारने सारथी, बार्टीच्या धरतीवर महाज्योतीची स्थापना केली; परंतु निधी वाटपात आखडता हात घेतला. अधिवेशनात महाज्योतीला १० हजार कोटींची मागणी केली होती; परंतु राज्य सरकारची देण्याची ऐपत नसल्याने ५०० कोटी रुपये द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. सत्तेत बसलेल्या ओबीसी नेत्यांना निधी खेचून आणता येत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा व नंतर रस्त्यावर उतरावे, असेही ते म्हणाले. मराठा आरक्षणावरून ओबीसी समाजात भीतीचे वातावरण आहे. ती भीती दूर करण्यात सरकार सपशेल अपयशी ठरल्याची भूमिका त्यांनी मांडली. धनगराच्या मुद्द्यावर त्यांनी न्यायालयीन लढा सुरू असल्याचे सांगितले.

------------