शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
5
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
6
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
7
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
8
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
9
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
10
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
11
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
12
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
13
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
14
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
15
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
16
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
17
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
18
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
19
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
20
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण

ओबीसींच्या जनगणनेबाबत मोदींना लिहिणार पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:59 IST

लोकमत न्ययूज नेटवर्क नागपूर : मागील काही महिन्यांपासून ओबीसीच्या मुद्द्यांवर राज्यातील राजकारण तापले असून, ओबीसींच्या जनगणनेसाठी राज्यात ठिकठिकाणी ...

लोकमत न्ययूज नेटवर्क

नागपूर : मागील काही महिन्यांपासून ओबीसीच्या मुद्द्यांवर राज्यातील राजकारण तापले असून, ओबीसींच्या जनगणनेसाठी राज्यात ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत. यातच आता भाजप नेते आ. गोपीचंद पडळकर यांनीही ओबीसी जनगणना व्हावी, असे स्पष्ट करीत त्यासाठी मी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार असल्याचे शनिवारी येथे पत्रपरिषदेत जाहीर केले.

ओबीसींची जनगणना न झाल्यामुळे त्यांना अल्प प्रमाणात शासकीय योजनांचा लाभ मिळतो. तर भटक्या जमातींची दयनीय परिस्थिती आहे. तत्कालिन भाजप सरकारने ओबीसीसाठी स्थापन केलेल्या महाज्योतीकडे सध्या दुर्लक्ष होत आहे. सारथीला एका दिवसांत निधी दिला जात असताना महाज्योतीबाबत आकस का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ओबीसीमध्ये ३४६ जाती असताना राज्य शासनाने केवळ ८० कोटींचा निधी दिला. यातून समाजाचे काय हित साधले जाणार? तत्कालिन सरकारने महाज्योतीची स्थापना केल्यानंतर ३८० कोटींचा निधी जाहीर केला होता; परंतु सत्ताबदल झाल्यानंतर तो निधीही खर्च केला नाही. केवळ कागदावरच संस्थेचे अस्तित्व दिसून येते. राज्य सरकारने सारथी, बार्टीच्या धरतीवर महाज्योतीची स्थापना केली; परंतु निधी वाटपात आखडता हात घेतला. अधिवेशनात महाज्योतीला १० हजार कोटींची मागणी केली होती; परंतु राज्य सरकारची देण्याची ऐपत नसल्याने ५०० कोटी रुपये द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. सत्तेत बसलेल्या ओबीसी नेत्यांना निधी खेचून आणता येत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा व नंतर रस्त्यावर उतरावे, असेही ते म्हणाले. मराठा आरक्षणावरून ओबीसी समाजात भीतीचे वातावरण आहे. ती भीती दूर करण्यात सरकार सपशेल अपयशी ठरल्याची भूमिका त्यांनी मांडली. धनगराच्या मुद्द्यावर त्यांनी न्यायालयीन लढा सुरू असल्याचे सांगितले.

------------