शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

जरा हटके! चला लावू या, गच्चीवर मातीविरहित बाग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 21:46 IST

गच्चीवरील मातीविरहित बाग हे शब्द ऐकले आणि उत्सुकता जागृत झाली. हे कसं शक्य आहे? मग झाडाची मुळं आधारासाठी काय पकडून ठेवतील आणि पाणी कुठे मुरत राहील? उत्तरांसाठी भेट घेतली उमेश चित्रिव यांची आणि उलगडत गेलं सृष्टीतून आलेलं सृष्टीलाच परत करण्याचं एक सृजनचक्र.

ठळक मुद्देघरातील कचऱ्याचा सुयोग्य विनियोगगणेशोत्सवातील निर्माल्यासाठी आवाहनवृक्ष देवाणघेवाणीची सोय

वर्षा बाशूलोकमत न्यूज नेटवर्क:नागपूर:

पुण्याच्या प्रमोद व अनिता तांबे या दांपत्याने या मातीविरहित बागेची सुरुवात एकदीड वर्षांपूर्वी पुण्यात केली. स्वयंपाकघरातील कचºयामधल्या विघटनशील पदार्थांपासून कंपोस्ट खत तयार करण्याचे तंत्र त्यांनी त्यासाठी वापरले. पाहता पाहता ती संकल्पना विस्तारत गेली. त्यांनी सुरु केलेल्या फेसबुक पेजचे आज लाखो फॉलोअर्स आहेत. या फेसबुकपेजवरील माहिती वाचून नागपुरात त्रिमूर्तीनगर भागात राहणाºया उमेश चित्रिव यांनी आपल्या घरी कंपोस्ट खताचा प्रयोग करून पाहिला आणि तो यशस्वी झाला.दरम्यान तांबे दांपत्याने सुरू केलेल्या वॉट््सअप ग्रूपचा विस्तारही महाराष्ट्रात काही हजारांच्या घरात गेला होता. त्याच्या मर्यादा लक्षात घेता उमेश चित्रिव यांनी नागपुरात १८ जानेवारी २०१८ पासून गच्चीवरील मातीविरहित बाग हा नवा ग्रूप सुरू करून कामाला सुरुवात केली. आजमितीस या ग्रूपमध्ये साडेतीनशेहून अधिक सदस्य आहेत आणि किमान १०० जणांच्या घरी फुललेली अशी मातीविरहित बाग गच्चीवर किंवा गॅलरीत आपल्याला पहावयास मिळू शकते.काय आहे मातीविरहित बागेची संकल्पना?आपण बाजारातून रोपटे आणून कुंडीत माती भरून लावतो. तसे न करता, आणलेल्या रोपट्याच्या मुळांना लपेटण्यासाठी जेवढी माती लावली असेल तेवढीच कायम ठेवून बाकी घरात तयार केलेल्या कंपोस्ट खताने कुंडी भरून काढायची. हे खत कालांतराने खाली बसत जाते. वर रिकामी झालेली जागा पुन्हा खत टाकूनच भरून काढायची. या रोपट्याला पाणी एरव्ही देतो तसेच द्यायचे. फक्त ते थोडेसेच न देता, कुंडीच्या खालून ते बाहेर निघत आहे याची खात्री होईपर्यंत द्यायचे. याचे कारण असे की, पाणी जर साचून राहिले तर मुळं सडून रोपटे नष्ट होईल.कंपोस्ट खत कसे तयार कराल?चिरलेल्या पालेभाज्यांचे देठ, भाज्यांची व फळांची साले, कागदाचे तुकडे, खोबरं काढून झाल्यानंतर उरलेल्या नारळाचे सर्व भाग असे सर्व प्रकारचे विघटनशील पदार्थ छिद्र केलेल्या माठात किंवा पिंपात टाकत रहायचे. त्यावर झाकण ठेवायचे. या माठाला खाली व बाजूला छिद्रे करावीत. त्यामुळे कचºयातील पाणी निघून जाईल व कचरा कोरडा राहील. त्याचे कंपोस्ट खत होण्यासाठी सुरुवातीला बायोकल्चरचा वापर करणे आवश्यक ठरते. बायोकल्चर म्हणजे एक प्रकारचे विरजण असते. त्यामुळे खत निर्मितीची प्रक्रिया वेगाने सुरू होते. एकदा खत तयार झाले की तेच बायोकल्चरचे काम करते. साधारण दर आठ दिवसांनी माठात ठेवलेला हा कचरा वर खाली करायचा. पूर्णपणे कंपोस्ट खत तयार व्हायला अडीच महिन्यांचा कालावधी लागतो. उन्हाळ््यात ही प्रक्रिया जरा लवकर होते तर हिवाळा-पावसाळ््यात थोडा अधिक अवधी लागतो.कचरा साठवायचा म्हटला की दुर्गंधी, डास, चिलटे, मुंग्या असे प्रश्न उभे होऊ शकतात. पण हा माठ घराच्या बाहेर गच्चीत वा गॅलरीत ठेवल्यास त्याचा त्रास होत नाही. मुख्य म्हणजे त्यातील पाण्याचा अंश निघून गेल्याने तो पूर्णपणे कोरडा होतो व त्याला अजिबात दुर्गंधी येत नाही. चहाच्या पावडरप्रमाणे हे कंपोस्ट खत दिसू लागते.उमेश चित्रिव यांना या उपक्रमात माधवी चौधरी, भाग्यश्री कापकर, विनय पटवर्धन, रितु जयस्वाल आदींचा मोठा सहभाग लाभतो आहे. गणेशोत्सव अगदी तोंडावर आहे. या ग्रूपने सर्व गणेश मंडळांना निर्माल्य फेकून न देता त्याचे कंपोस्ट खत बनवण्याचे वा या ग्रूपला देण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नenvironmentवातावरण