शहरं
Join us  
Trending Stories
1
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
2
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
3
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
4
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
5
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
6
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
7
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
8
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
9
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
10
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
11
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
12
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
13
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
14
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
15
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
16
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
17
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
18
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
19
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
20
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री

चला दोस्ती निभवूया, एकेक मित्र वाचवूया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2020 8:14 PM

भेटा, नको भेटा. काही फरक पडत नाही. भेट झाली तर एकमेकांवर तुटून पडायचे अन् नाही झाली तर रुसून बसायचे. दिल, दोस्ती, दुनियादारी मैत्रीची बातच न्यारी... सर्वात पवित्र प्रेम माय-लेक/लेकीचे असते, सर्वात मोठे कर्तव्य पिता-पुत्रात असते अन् ज्ञानार्जनातील सर्वात मोठे रहस्य गुरु-शिष्यात असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जिथे काहीच नसते तिथे मैत्री असते... तर चला दोस्ती निभवूया अन् आपल्या मित्रांना संसर्गापासून वाचवूया.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भेटा, नको भेटा. काही फरक पडत नाही. भेट झाली तर एकमेकांवर तुटून पडायचे अन् नाही झाली तर रुसून बसायचे. दिल, दोस्ती, दुनियादारी मैत्रीची बातच न्यारी... सर्वात पवित्र प्रेम माय-लेक/लेकीचे असते, सर्वात मोठे कर्तव्य पिता-पुत्रात असते अन् ज्ञानार्जनातील सर्वात मोठे रहस्य गुरु-शिष्यात असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जिथे काहीच नसते तिथे मैत्री असते... तर चला दोस्ती निभवूया अन् आपल्या मित्रांना संसर्गापासून वाचवूया.ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी मैत्री दिन पाळला जातो. तसे बघितल्यास मैत्रीसाठी एका दिवसाचे विशेष असे काही नाही, केवळ औपचारिकता तेवढी. तर मैत्री दिनाचे पर्व २ ऑगस्ट रोजी येतेय. अर्थातच सगळ्या मित्रांनी काही विशेष असे प्रयोजन केलेच असेल. सेलिब्रेशन हा मित्रांमधील सर्वात मोठा संसर्ग आहे आणि या संसर्गाने साऱ्या जगाला प्राचीन काळापासूनच ग्रासले आणि चैतन्य, आनंद, निरागसतेचे वारे वाहायला लागले. सध्या मात्र अवघे जग कोरोना नावाच्या सूक्ष्म दैत्याच्या चक्रात अडकले आहे. याचा संसर्ग जीव घेणारा आहे. आधीच म्हटल्याप्रमाणे जिथे काहीच नसते तिथे मैत्री असते आणि जिथे मैत्री असते तिथे नि:स्वार्थता असते. म्हणूनच तर आनंदात एकवेळ सहभागी होणार नाही. मात्र, संकट कोसळले की सर्वात आधी हजर असतात ते मित्र. या संकटाच्या काळातही मैत्री सर्वश्रेष्ठ ठरते आहे आणि तेच कर्तव्य यंदा जपायचे आहे. प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देणे, हाताला मैत्रीबंध बांधणे, भेटवस्तू देणे किंवा धम्माल करणे... हे यंदा टाळूयात. कारण, हे केल्याने संसर्गाचा धोका वाढणार आहे आणि कोणतेच मित्र-मैत्रीण आपल्या मित्रांना धोक्यात घालू इच्छिणार नाही. आज प्रत्येकाजवळ एक नव्हे दोन-तीन मोबाईल फोन्स आहेत. प्रत्येकच मोबाईलमध्ये इंटरनेट आहे आणि व्हिडिओ कॉलिंग किंवा वेगवेगळ्या मिटिंग अ‍ॅप्सची सुविधाही आहे. या माध्यमांचा वापर करून एकमेकांना बंध पाठवणे, गप्पा मारणे आणि घरूनच ऑनलाईन सेलिब्रेशन करणे शक्य आहे. ‘थेंबे थेंबे तळे साचे’ याचप्रमाणे एकेका मित्र/मैत्रिणींनी समाज, राष्ट्राचा ढाचा तयार होतो. ज्याप्रमाणे पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्याचे कार्य करावे लागत आहे, त्याचप्रमाणे राष्ट्राला कोरोनामुक्त करण्यासाठी प्रत्येक मित्र/मैत्रीण सुदृढ असणे गरजेचे आहे. म्हणून, मैत्री दिनाला गोंधळ, गोंगाट अन् गर्दी टाळूया व देशाला वाचवूया. शेवटी देशासोबतही आपले असेच एक नि:स्वार्थ असे मैत्रीचे नाते आहेच की.

टॅग्स :Friendship Dayफ्रेंडशिप डेnagpurनागपूर