शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 22:02 IST

Mohan Bhagwat Latest Statement: सत्तेचे लाभ मिळावे अशी आशा असणाऱ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी कान टोचले.

नागपूर : 'इतके वर्ष कष्ट केले आता बरे दिवस आले आहेत. आता आम्हाला काही मिळू द्या, असे अनेकांना वाटते. मात्र सध्या श्रावणमास सुरू आहे व मला किंवा आम्हाला काही मिळावे हा शिवाचा स्वभाव नाही. शिववृत्तीचे आचरण करणाऱ्यांमध्ये त्यागाची भावना असायला हवी', असे प्रतिपादन करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी सत्ताकेंद्रित फायदा पाहणाऱ्यांचे कान टोचले आहे. नागपुरातील दिनदयाल नगरातील पांडुरंगेश्वर शिवमंदिरात श्रावणमासानिमित्त त्यांच्या हस्ते अभिषेक व पूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

'जगाच्या सगळ्या समस्यांमागे मनुष्याचा हावरटपणा व कट्टरता आहे. कट्टरतेतून राग-द्वेष निर्माण होतात व त्यातून युद्ध होतात. मलाच पाहिजे ही स्वार्थाची वृत्ती आणि भेदभाव या मनुष्याच्या प्रवृत्तीच्या काळी बाजू आहेत. ही प्रवृत्ती बदलली पाहिजे. हीच प्रवृत्ती बदलणे म्हणजे शिवाचे पूजन करणे होय', असे विधान त्यांनी केले. 

'परस्परविरोधी बाबींची सांगड घालून नवनीत कसे काढायचे हे परंपरेने आपल्याला ठावूक आहे. त्यामुळे ती परंपरा पुढे नेणाऱ्या पूजा, यात्रा यामागील भाव ओळखून कार्य करत संस्कार आपल्या अंगी बाळगला पाहिजे. जगाला दिलासा देण्याची ताकद आपल्यातच आहे', असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला.

यावेळी त्यांच्या हस्ते आरतीदेखील झाली. मंचावर महानगर संघचालक राजेशजी लोया, दिनदयाल नगर समुत्कर्ष संस्थेचे अध्यक्ष दिलीपजी कटारकर प्रामुख्याने उपस्थित होते.

कावडियांनी कृतीमागील भाव समजून घ्यावा

'शिवाची भक्ती सर्व पंथांचे लोक करतात. कावडीयांची मोठी परंपरा आपल्या देशात आहे. इकडचे पाणी दुसरीकडे नेतात. आपल्याला जे चांगले सापडले ते आपल्याकडे न ठेवता इतरांपर्यंत न्यायचे हा त्यामागचा विचार आहे. प्रत्येक कृतीच्या मागे एक भाव असतो व तो समजून काम केले तर ती संस्कृती होते व त्यातूनच संस्कार निर्माण होतात. त्यामुळे परंपरेच्या कृतीमागील भाव समजून घ्यावा', असे आवाहन सरसंघचालकांनी केले.

काळ ओळखून योग्य पावले टाका, अन्यथा विनाश

'जगात परिवर्तन येत आहे असे विचारवंत म्हणतात. या बदलत्या काळात माणसाने योग्य दिशा धरली नाही तर तो विनाशाचा काळ ठरू शकतो. मात्र काळ ओळखून नीट पावले योग्य दिशेने टाकली तर मनुष्याच्या जीवनाचे नवीन उन्नत स्वरुप उभे राहते. जगात असे स्वरुप भारतीयांच्या नेतृत्वाखालीच उभे राहू शकते', असे प्रतिपादन त्यांनी केले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकारPoliticsराजकारण