शहरं
Join us  
Trending Stories
1
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
2
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
3
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
4
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
5
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
6
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
7
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
8
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
9
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
12
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
13
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
14
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
16
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
17
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
18
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
19
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
20
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

नागपुरात विधिमंडळ सचिवालयाचे कामकाज सोमवारपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 10:07 PM

येत्या ४ जुलैपासून नागपुरात पावसाळी अधिवेशनला सुरुवात होत आहे. त्याची संपूर्ण तयारी सध्या जोमात सुरू आहे. विधिमंडळ सचिवालय येत्या सोमवारपासून सुरू होणार आहे.

ठळक मुद्देतयारी वेगात : संपूर्ण परिसर ‘रेनप्रुफ’ करण्यावर भर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : येत्या ४ जुलैपासून नागपुरात पावसाळी अधिवेशनला सुरुवात होत आहे. त्याची संपूर्ण तयारी सध्या जोमात सुरू आहे. विधिमंडळ सचिवालय येत्या सोमवारपासून सुरू होणार आहे.यंदाचे अधिवेशन हे पावसाळी असल्याने पावसापासून बचाव करण्याच्या दृष्टीनेच संपूर्ण तयारी सुरू आहे. विधिमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांनी गेल्याच आठवड्यात तयारी संबंधात आढावा घेतला होता. त्यानुसार विधानभवन परिसर हा संपूर्णपणे ‘रेनप्रुफ’ करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसारच तयारी सुरू आहे. यंदा रंगरंगोटीचे काम जास्त नाही. कारण हिवाळी अधिवेशनातच रंगरंगोटी झाली. देखभल दुरुस्ती व पावसापासून संरक्षण यावर सर्वाधिक भर दिला जात आहे. त्यासाठी विधानभवनाच्या मुख्य गेटपासून ते इमारतीपर्यंत शेड टाकण्यात येत आहे. मुख्यमंत्री ज्या गेटने आपल्या कक्षात प्रवेश करतात त्या बाजूनेही टिनाचे शेड उभारले जात आहे. याशिवाय विधानभवन परिसरातील विविध राजकीय पक्षांची कार्यालये सुद्धा रेनप्रूफ केली जात आहेत. विधिमंडळ सचिवालयातील काही कर्मचारी नागपुरात दाखल झाले आहेत. कार्यालयांमध्ये फाईल लावणे व कॉम्प्युटर लवण्यात आले आहे. इतर कार्यालयांमध्येही कामे सुरू आहेत.रविभवन, नागभवन आमदार निवास रेनप्रूफअधिवेशनसाठी येणारे कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, आमदार आणि अधिकारी वर्गाच्या निवासस्थानाच्या ठिकाणी सुद्धा पावसापासून सुरक्षेची संपूर्ण तयारी केली जात आहे. रविभवन, नागभवनातील कॉटेजसमोर शेड उभारले जात आहेत. यासोबतच आमदार निवास परिसरातही जोरात तयारी सुरू आहे. आमदार निवासाच्या दोन्ही इमारतीमध्ये कायमस्वरूपी लोखंडी शेड उभारले जात आहे.सर्पमित्र तैनातपावसाचे दिवस पाहता विधानभवन परिसर, रविभवन, नागभवन, आमदार निवासासह अधिकारी कर्मचाऱ्यांची निवासस्थाने असलेल्या ठिकाणी साप निघण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने सर्पमित्रांची मदत घेतली आहे. विधानभवन परिसरात तयारी करीत असताना साप निघण्याच्या घटना घडतही असतात. याही वेळी साप निघाला होता. त्यामुळे आवश्यक खबरदारी म्हणून सर्पमित्र तैनात करण्यात आल्याचे सांगितले जाते.‘देवगिरी’वर चंद्रकांत पाटलांचाच दावा?नागपुरात अधिवेशन असेल तेव्हा मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या रामगिरीनंतर सर्वाधिक आकर्षणाचा बंगला म्हणजे ‘देवगिरी’च असतो. आजवर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा मुक्काम देवगिरीवर राहिलेला आहे. देवगिरीवर मुक्काम म्हणजे मुख्यमंत्र्यांनंतरचे मंत्री अशी आजवरची ओळख राहिलेली आहे. त्यामुळे देवगिरीवर मुक्कामास राहणे हे एकप्रकारचे ‘स्टेटस’सुद्धा मानले जाते. महाराष्ट्रात सध्या उपमुख्यमंत्रिपद नाही. चंद्रकांतदादा पाटील हे दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री म्हणून ओळखले जातात. त्यामुळे देवगिरीवर त्यांचाच दावा केला जात आहे. सध्या मंत्र्यांना निवासस्थाने वितरित झालेली नाहीत. तरीही देवगिरी बंगल्यावर ज्या जोमाने तयारी सुरू आहे, त्यावरून हा बंगला कुणाला मिळतो, याची प्रतीक्षा आहे.    

 

टॅग्स :Vidhan Bhavanविधान भवनnagpurनागपूर