शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

काम करायचे नसेल तर पद सोडा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 23:52 IST

शहर काँग्रेसच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या परिसरातील, प्रभागातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी तत्पर असले पाहिजे. प्रसंगी नागरिकांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करायला हवे. ज्यांना पक्षात सक्रिय रहायचे असेल त्यांनीच पदावर रहावे. जे काम करण्यास इच्छुक नसतील त्यांनी तसे स्पष्टपणे सांगावे. त्यांच्याजागी दुसऱ्या इच्छुक व्यक्तीला संधी दिली जाईल, अशा शब्दात काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांचे कान टोचले.

ठळक मुद्देविकास ठाकरे यांनी टोचले पदाधिकाऱ्यांचे कान : शहर काँग्रेस कार्यकारिणी बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहर काँग्रेसच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या परिसरातील, प्रभागातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी तत्पर असले पाहिजे. प्रसंगी नागरिकांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करायला हवे. ज्यांना पक्षात सक्रिय रहायचे असेल त्यांनीच पदावर रहावे. जे काम करण्यास इच्छुक नसतील त्यांनी तसे स्पष्टपणे सांगावे. त्यांच्याजागी दुसऱ्या इच्छुक व्यक्तीला संधी दिली जाईल, अशा शब्दात काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांचे कान टोचले.शहर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक मंगळवारी देवडिया काँग्रेस भवनात पार पडली. कही पदाधिकारी शहर काँग्रेसच्या बैठकीकडे, पक्षाच्या आंदोलनांकडे सातत्याने पाठ फिरवतात. त्यांच्यावर ठाकरे यांचा रोख होता. ठाकरे म्हणाले, काही लोकांनी महापालिका निवडणुकीचे तिकीट मागण्यासाठी देवडियात रांगा लावल्या. आता ते आपल्या प्रभागात फिरतानाही दिसत नाहीत. त्यांच्या निष्क्रियतेमुळे पक्ष कमजोर होत आहे. ब्लॉक अध्यक्षांनी आपली जबाबदारी नीटपणे पार पाडावी. बुथ कमेटी,ब्लॉक कमेटीच्या प्रभागानुसार बैठका घ्याव्या व त्याचा अहवाल शहर काँग्रेस कमिटीकडे सादर करावा, असे निर्देशही त्यांनी दिले. महापालिकेच्या सभागृहात पाणी समस्येसह इतरही प्रश्न मांडले जातात. मात्र, प्रशासन आमच्या प्रश्नाकडे हेतुपूरस्सर दुर्लक्ष करते, असा आरोप बैठकीत उपस्थित नगरसेवकांनी केला. यावर विकास ठाकरे यांनी शहर काँग्रेस नगरसेवकांच्या पाठीशी राहील, असा विश्वास दिला.बैठकीत संजय महाकाळकर, उमाकांत अग्निहोत्री, संदीप सहारे, हरीश ग्वालबंसी, प्रा. दिनेश बानाबाकोडे, सरचिटणीस जयंत लुटे, प्रशांत धवड, रमेश पुणेकर, गजराज हटेवार, बंडोपंत टेंभुर्णे, अ‍ॅड. अक्षय समर्थ, संदेश सिंगलकर, अ‍ॅड. अशोक यावले, राजेश कुंभलकर, नलिनी करागळे, निर्मला बोरकर,पंकज निघोट, रेखा बारहाते,भारती कांबळे, अतिक मलीक, अशोक निखाडे, प्रवीण गवरे, महेश श्रीवास,युवराज लांडे, राजेश पौनीकर,आशुतोष कांबळे, शुभांगी चित्तलवार, प्रवीण आगरे,धरम पाटील,अण्णाजी राऊत, ईश्वर बरडे, हरी नायक, अरविंद वानखेडे,किरण गडकरी,निर्मला बोरकर,प्रकाश बांते, विलास वाघ, अनिल पोरटकर, रवी गाडगे, राकेश पन्नासे, सूरज आवळे, विजया चिटमिटवार, अनिल लारोकर, सुनिता ढोले, हरी यादव आदी उपस्थित होते.तीन बैठकींना अनुपस्थित राहिल्यास पदमुक्तशहर काँग्रेसच्या प्रत्येक बैठकीला उपस्थित राहणे ही पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. व्यक्तिगत अडचणीमुळे कुणाला बैठकीला येणे शक्य नसेल तर तसे कार्यालयाला कळवावे. मात्र, कुणी सलग तीन बैठकांना अकारण अनुपस्थित राहत असेल तर संबंधित व्यक्तीला पदमुक्त केले जाईल, असा इशाराही ठाकरे यांनी बैठकीत दिला.१७ मे रोजी आयुक्तांचा घेराव शहरातील जनतेला पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळेनासे झाले आहे. शहरात चार कंत्राटदारांमार्फत करण्यात आलेल्या सिमेंट रोडच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. पथदिव्यांच्या कामाचे टेंडर ७० टक्के जास्त दराने दिले गेले आहे. या सर्व प्रश्नांवर महापालिका आयुक्तांचा १७ मे रोजी काँग्रेसतर्फे घेराव केला जाईल, अशी घोषणा विकास ठाकरे यांनी बैठकीत केली.

टॅग्स :congressकाँग्रेसVikas Thackreyविकास ठाकरे