शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

देवलापारचे ठाणेदार सक्तीच्या रजेवर

By admin | Updated: May 22, 2014 02:18 IST

वरघाट येथील वृद्धाच्या आत्महत्येस पोलिसांना दोषी धरत निलंबित

करवाही : वरघाट येथील वृद्धाच्या आत्महत्येस पोलिसांना दोषी धरत निलंबित करण्याच्या मागणीसाठी सोमवारी देवलापार पोलीस ठाण्याला घेराव व नागपूर-जबलपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. त्याची दखल घेत ठाणेदाराला सक्तीच्या रजेवर पाठविले तर अन्य दोघांची पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली.

रामलाल आत्राम (६३, रा. वरघाट, ता. रामटेक) असे मृत वृद्धाचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी सहायक पोलीस उपनिरीक्षक नारायण देवगडे, शिपाई राजेश पाली यांच्यासह अन्य पोलीस मोटरसायकलींवर वरघाट येथे आले होते. यातील एकाने रामलालला कट मारला. त्यामुळे रामलालने पोलिसांना शिवीगाळ केली. तो दारू पिऊन होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात आणून वैद्यकीय तपासणीसाठी नेले. मात्र रक्तदाब त्यातच अतिदारू पिला असल्याने रामलालची वैद्यकीय तपासणी न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. तेथून रामलालला पोलीस ठाण्यात आणून बसण्यास सांगितले. अटक केली नव्हती. रात्र झाल्याने पोलिसांनी दुसर्‍या दिवशी सकाळी गावाला जाण्यास सांगितले. परंतु, रात्री २ वाजताच्या सुमारास रामलाल हा पायी गावात गेला.

पोलीस ठाण्यातून रामलाल कुठे गेला, याचा शोध घेत पोलीस त्याच्या गावी गेले असता तो घरी दिसल्याने पोलिसांनी त्याला विचारणा केली. मात्र पोलिसांच्या वारंवार होणार्‍या अशा त्रासामुळे धास्तावलेल्या रामलालने आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येमुळे पोलिसांवर रोष निर्माण होऊन प्रकरण तापले.

आत्महत्येस पोलिसांना कारणीभूत धरत सोमवारी दुपारच्या सुमारास संतप्त ग्रामस्थांनी रामलालचा मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवला व रास्ता रोको आंदोलन करायला सुरुवात केली. रोडवर टायर जाळले. नारायण देवगडे, राजेश पाली यांच्यासह इतर सहभागी पोलिसांना निलंबित करण्याची मागणी ग्रामस्थांनी रेटून धरली होती. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दीपक साळुंके यांनी नागरिकांना दोषी असलेल्या पोलिसांची चौकशी करण्यात येईल.

त्यात ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल तसेच ठाणेदार हृदयनारायण यादव यांच्या बदलीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असे लेखी आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलक शांत झाले. यानुसार ठाणेदार यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे तर सहायक पोलीस उपनिरीक्षक नारायण देवगडे आणि शिपाई राजेश पाली यांची मुख्यालयात बदली केली. (वार्ताहर)