शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लर्निंग डिसॅबिलिटी समुपदेशन केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 11:49 IST

अध्ययन अक्षमता (लर्निंग डिसॅबिलिटी) असलेल्या मुलांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळावी, यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल) मध्ये अध्ययन अक्षमता समुपदेशन केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देसंजय अवचट यांची माहितीराज्यात ४६ केंद्रांचाही समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अभिनेता आमिर खानच्या ‘तारे जमी पर’ चित्रपटातील ईशान या मुलाप्रमाणे अध्ययन अक्षमता (लर्निंग डिसॅबिलिटी) असलेल्या मुलांच्या पालकांसाठी एक आनंदाची बातमी राज्य शासनाकडून आली आहे. अशा मुलांच्या थांबलेल्या बुद्धिमत्तेला चालना मिळावी, यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल) मध्ये अध्ययन अक्षमता समुपदेशन केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे. याशिवाय राज्यातील वैद्यकीय विद्यापीठाचे १६ डीएमआरई आणि जिल्हा रुग्णालयांतर्गत ३० ठिकाणी असे केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत.सोशालिस्टिक आॅपरेशन फॉर अकॅडेमिकली हॅण्डीकॅप अ‍ॅण्ड मेन्टोरशीप (सोहम) संस्थेचे अध्यक्ष संजय अवचट यांनी बुधवारी ही माहिती दिली. दिव्यांगाच्या शैक्षणिक अध्ययन अक्षमतेबाबत उपचारासाठी राज्यात केवळ पुणे आणि मुंबई येथे केंद्र आहेत. विदर्भासह मराठवाडा, कोकण विभागात उपचार आणि प्रशिक्षणासाठी सुविधा नसल्याने अशा मुलांच्या पालकांना मोठी गैरसोय सहन करावी लागते. त्यासाठी सोहम या स्वयंसेवी संस्थेने मागील १२ वर्षांपासून लढा चालविला आहे. याबाबत संस्थेने जनहित याचिका दाखल केली होती. जून २०१६ मध्ये नागपूर खंडपीठानेही संस्थेच्या बाजूने निकाल दिला़ मात्र शासनाकडून कोणतीही पावले उचलली नाही. दरम्यान पावसाळी अधिवेशनात आमदार अनिल बोंडे यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे या विषयाकडे शासनाचे लक्ष वेधले़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत यासाठी प्रयत्न चालविले. यानंतर ३० जुलै रोजी सचिव स्तराची बैठक घेऊन असे केंद्र स्थापनेबाबत निर्णय घेण्यात आला. याअंतर्गत मुंबईचे डॉ. व्ही.एम. काळे व सोहमचे अध्यक्ष अनिल अवचट यांच्या नेतृत्वात सात सदस्यांची समिती गठित करून राज्यभरात सर्वेक्षण सोपविण्यात आले. नागपूरबाबत सात दिवसात अहवाल सादर करून हे केंद्र सुरू करू , असा विश्वास अवचट यांनी दिला.नागपुरात दरवर्षी दीड ते दोन हजार अध्ययन अक्षमता असलेल्या मुलांना शिक्षण सोडावे लागते. राज्यात हा आकडा ५० हजाराच्या जवळपास आहे. ही मुले सामान्य मुलांसारखीच असतात, मात्र त्यांच्यात लिहण्यावाचण्यात व गणित समजण्यात गतिमंदता असल्याने पालकांना मनस्ताप होतो व मुलांचे नुकसान होते. त्यांच्यासाठी समुपदेशन हाच एक उपाय आहे. योग्य समुपदेशन मिळाले तर काही दिवसात ही अक्षम मुले सामान्य मुलांपेक्षा अधिक बुद्धिमत्तेने काम करू शकतात, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. चंद्रकांत रागीट, मधुमिता क्षीरसागर, विजय खंते, प्रसन्न धनकर यांनीही माहिती दिली.

टॅग्स :Nagpur Government Medical College and Hospitalनागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय