शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

कायदे करणाऱ्यांना चेतवा, पेटवा व कामाला लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 21:53 IST

देशातील एकूणच शेतकऱ्यांसाठीचे असलेले कायदे हे शेतकरी विरोधी आहेत. त्यामुळे त्याला समृद्धच होऊ दिले जात नाही. शेतकरी जगला पाहिजे. शेतकरी जगला तरच देश जगेल.परंतु सत्तेवर असलेली माणसं जेव्हा शेतकऱ्यांबाबत बेजबाबदार वक्तव्ये करतात तेव्हा त्यामुळे देशातील कायदे तयार करणाऱ्यांना चेतना, पेटवा आणि कामाला लावा, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर यांनी येथे केले.

ठळक मुद्देकिसानपुत्र आंदोलन : शरद निंबाळकर यांचे प्रतिपादन

आॅनलाईन लोकमतनागपूर : देशातील एकूणच शेतकऱ्यांसाठीचे असलेले कायदे हे शेतकरी विरोधी आहेत. त्यामुळे त्याला समृद्धच होऊ दिले जात नाही. शेतकरी जगला पाहिजे. शेतकरी जगला तरच देश जगेल.परंतु सत्तेवर असलेली माणसं जेव्हा शेतकऱ्यांबाबत बेजबाबदार वक्तव्ये करतात तेव्हा त्यामुळे देशातील कायदे तयार करणाऱ्यांना चेतना, पेटवा आणि कामाला लावा, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर यांनी येथे केले.जनमंचच्यावतीने किसानपुत्र आंदोलनाचे दुसरे राज्यस्तरीय शिबिर आमदार निवास येथे आयोजित करण्यात आले आहे. या दोन दिवसीय शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. शरद पाटील होते.डॉ. शरद निंबाळकर म्हणाले, शेतकऱ्यांची संपूर्ण संपत्ती म्हणजे त्याची शेती (७/१२) आहे. त्याला १ लाख रुपयाचे कर्ज हवे असेल तर त्याची संपूर्ण संपत्ती ही ७/१२ च्या नावावर गहाण ठेवली जाते. असा शेतकरी विरोधी कायदा संपूर्ण जगात कुठेही नाही. देशात आजही १८८४ व १८९४ चे कायदे सुरू आहेत. त्यामुळे अन्याय होत आहे. आपला देश हा कृषिप्रधान असेल तर कृषी हा राज्याचा विषय कसा काय होऊ शकतो. तो केंद्राचाच विषय व्हावा, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आयात-निर्यात धोरण बदलण्याचीही गरज आहे. या धोरणामुळे शेतकऱ्यांना समृद्धच होऊ दिले जात नाही. त्यांचे भाव पाडले जातात. लोकांना खाऊ घालणाऱ्यांना सवलत मिळालीच पाहिजे. ती मिळत नसेल तर तो देशद्रोह का ठरू नये, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.यावेळी ज्येष्ठ शेतकरी नेते अमर हबीब यांनी लिहिलेले शेतकरी विरोधी कायदे का रद्द करावेत? या पुस्तकाचे प्रकाशन प्रा. शरद पाटील यांच्या हस्ते सांगली येथील प्रदीप पाटील यांना पुस्तक भेट देऊन करण्यात आले. संचालन पुरुषोत्तम आवरे पाटील यांनी केले तर प्रल्हाद खरसने यांनी आभार मानले.शेतकऱ्यांची शेती बळकावण्याचे प्रकार- प्रा. शरद पाटीलशेतकऱ्यांना देशोधडीला लावून शेती बळकावण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत. जास्त पैसे देऊन शेती घेणे हे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचे षड्यंत्रच आहे, अशी टीका प्रा. शरद पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केली. कॉर्पोरेट शेती करायचीच आहे तर मग शेतकऱ्याला ती करू द्या. देशातील ६० टक्के शेतकरी लोकांना उद्ध्वस्त करून ४० टक्के लोकांच्या भरवशावर देश चालू शकत नाही. शेतकरी आता खचला आहे. तो उठू शकत नाही. तेव्हा त्याला बळ देशासाठी आता शेतकरीपुत्रालाच उठावे लागेल, असे आवाहनही त्यांनी केले.दलित पँथरच्या धर्तीवर किसान पँथरची गरज - अमर हबीबकाही वर्षांपूर्वी दलितांवर प्रचंड अत्याचार होत होते. तेव्हा नामदेव ढसाळसारख्या दलित तरुणांनी दलित पँथर ही संघटना स्थापन केली. या संघटनेचा तेव्हा मुंबईसह राज्यभरात प्रचंड दरारा होता. कुणीही दलितांकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करीत नव्हते. त्याच धर्तीवर किसान पँथर स्थापन होण्याची गरज आहे, असे ज्येष्ठ शेतकरी नेते अमर हबीब म्हणाले. किसानपुत्र आंदोलनामागची भूमिका विशद करताना ते बोलत होते.आज शेतकरी मरणाला टेकला आहे. तो रोज आत्महत्या करीत आहे. अशाप्रसंगी शासनाचे उत्सवी कार्यक्रम होऊ नयेत, अशी अपेक्षा आहे. शासन ही भूमिका घेत नसेल तर शेतकरीपुत्रांनी ते रोखावे, असे आवाहनसुद्धा त्यांनी यावेळी केले. किसानपुत्र आंदोलन हे विचारांची चळवळ असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कमाल जमीन धारणा कायद्याबाबत आपले विचार व्यक्त करताना अमर हबीब म्हणाले, या कायद्यामुळे जमीनदारी संपली नाहीच पण ८० टक्के शेतकरी हे अल्पभूधारक झाले. शेतकऱ्यांना आर्थिक बळ द्यायचे असेल तर शेतकऱ्यांची गट शेती करण्यात यावी. फार्मर्स प्रोड्युसर कंपन्या स्थापन व्हाव्या आणि सरकार, कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठाप्रमाणेच या शेतकरी उत्पादन कंपन्यांनाही कमाल जमीन धारणेपेक्षा जास्त जमीन ठेवण्याची सूट मिळावी, अशी मागणी त्यांनी केली.

टॅग्स :Farmerशेतकरीnagpurनागपूर