शहीद जवानांना अखेरची सलामी
By Admin | Updated: May 13, 2014 00:25 IST2014-05-13T00:25:06+5:302014-05-13T00:25:06+5:30
रविवारी मुरमुरी ते जागना गावादरम्यान पोर नदीच्या पुलावर भूसुरूंग स्फोट घडवून पोलिसांचे वाहन नक्षलवाद्यांनी उडवून दिले. या घटनेत सात पोलीस जवान शहीद झाले.

शहीद जवानांना अखेरची सलामी
ंगडचिरोली : रविवारी मुरमुरी ते जागना गावादरम्यान पोर नदीच्या पुलावर भूसुरूंग स्फोट घडवून पोलिसांचे वाहन नक्षलवाद्यांनी उडवून दिले. या घटनेत सात पोलीस जवान शहीद झाले. सातही शहीद पोलीस जवानांना सोमवारी सकाळी ८.३0 वाजता येथील पोलीस कवायत मैदानावर भावपूर्ण वातावरणात अखेरची सलामी देण्यात आली. पोलीस प्रशासनाच्यावतीने २१ बंदुकींच्या तीनदा हवेत फैरी झाडून शहीद जवानांना मानवंदना देण्यात आली. शहीद जवानांच्या कुटुंबीयांचे पोलीस महासंचालक संजीव दयाल यांच्यासह पोलीस अधिकार्यांनी सांत्वन केले. यावेळी राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाल, सहाय्यक महासंचालक रश्मी शुक्ला, माजी आमदार अशोक नेते, नागपूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक अनुपकुमार सिंग, पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम, पोलीस अधीक्षक मो. सुवेझ हक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशिकुमार मिना, राजकुमार शिंदे यांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना भावपूर्ण o्रद्धांजली अर्पण केली. तसेच केंद्रीय राखीव पोलीस दलाचे कमांडंट एस. के. सिंग, मारूती जगताप, देसाईगंजचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन पांडकर, गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल खाडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय धिवरे, निवासी उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, उपविभागीय अधिकारी पी. शिवशंकर, देवेंद्रसिंग, नायब तहसीलदार सी. जी. पित्तुलवार यांनी सुद्धा शहीद जवानांना पुष्पचक्र अर्पण करून o्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी शहीदांचे कुटुंबीय व नातेवाईकांच्या आक्रोशाने उपस्थितांचे हृदय हेलावले. सार्यांचेच डोळे अo्रूने पाणावले होते. गडचिरोली शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. मानवंदनेनंतर पोलीस विभागाने शहिदांचे पार्थीव त्यांच्या कुटुंबीयांच्या सुपूर्द केले. वाहनाने शहिदांचे पार्थीव व त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या गावी पोहोचविण्यात आले. त्यानंतर त्यांच्या मुळगावी सर्व शहिदांवर हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.