शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

‘राईट टू गिव्ह अप ’पर्याय चुकीने निवडणाऱ्या शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना अंतिम संधी

By आनंद डेकाटे | Updated: June 20, 2024 19:41 IST

३० तारखेपर्यंत दुुरुस्ती करून पुन्हा सादर करता येणार अर्ज

नागपूर :  ‘राईट टू गिव्ह अप हा पर्याय निवडून ज्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज रद्दबातल झाले असतील केवळ अश्या विद्यार्थ्यांना राज्यशासनातर्फे आपले अर्ज दुरुस्त करून ते पुन्हा सादर करण्यासाठी ३० जूनपर्यंत अंतिम संधी देण्यात आली आहे. 

राज्य सरकारकडून विविध मॅट्रिकोत्तर भारत सरकार शिष्यवृत्तीची अर्ज प्रक्रिया महाडिबीटी पोर्टलवरून राबविण्यात आली आहे. यंदाच्या वर्षापासून महाडिबीटी पोर्टलवर राईट टू गिव्ह अप अर्थात शिष्यवृत्तीवर हक्क सोडण्याचा अधिकार हा नवीन पर्याय उपलब्ध करून देण्यात आला होता. हा नवीन पर्याय जरी ऐच्छिक होता तरी, अनेक विद्यार्थ्यांनी राईट टू गिव्ह अप या पर्याय चूकून निवडला आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीला मूकावे लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. “राईट टू गिव्ह अप” हा पर्याय चूकीने निवडणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही यासाठी राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर ज्या विद्यार्थ्यांनी अनावधानाने अथवा नजरचुकीने हा पर्याय निवडून त्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज रद्दबातल झाले असतील केवळ अश्या विद्यार्थ्यांना राज्यशासनातर्फे ३० जूनपर्यंत अंतिम संधी देण्यात आलेली आहे. अशा विद्यार्थ्यांनी तात्काळ https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर आपला अर्ज रिव्हर्ट बॅक करून ऑनलाईन सादर करावेत.

आपल्या प्राचार्यांशी साधा संपर्क

याबाबत विद्यार्थ्याने आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी संपर्क साधून महाविद्यालयांच्या प्राचार्य लॉगिन मधून आपला अर्ज रिव्हर्ट बॅक करून घेणे आवश्यक आहे. रिव्हर्ट बॅक (Revert Back) झालेला अर्ज विहित वेळेत विद्यार्थ्याच्या लॉगिन मधून ऑनलाईन फेर सादर करणे आवश्यक राहील. विहित वेळेत विद्यार्थ्याने अर्ज फेर सादर न केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थ्याची राहील तेव्हा लवकरात लवकर अर्ज सादर करावे, असे  समाज  कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी कळविले आहे.

टॅग्स :nagpurनागपूरSchoolशाळाScholarshipशिष्यवृत्ती