शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मेट्रो बांधणार सर्वात मोठा बॅलेन्स कॅन्टीलेव्हर ब्रीज 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 23:01 IST

मेट्रो रेल्वे देशातील २३१ मीटर लांबीचा ब्रिज आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून आनंद टॉकीज, सीताबर्डी ते कॉटन मार्केटपर्यंत बांधणार आहे. अशा प्रकारचा ब्रिज देशात तिसऱ्या क्रमांकाचा राहणार आहे. पुलाचे प्रत्यक्ष बांधकाम नोव्हेंबरपासून सुरू होणार असून इंजिनिअरिंगचा एक नमुना आणि नागपूरसाठी एक लॅण्डमार्क ठरणार आहे.

ठळक मुद्दे ३ हजार टन वजनाचा २३१ मीटर लांब ब्रीज : भारतीय रेल्वे ट्रॅकवरून जाणार, आनंद टॉकीज ते कॉटन मार्केट

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मेट्रो रेल्वे देशातील २३१ मीटर लांबीचा ब्रिज आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून आनंद टॉकीज, सीताबर्डी ते कॉटन मार्केटपर्यंत बांधणार आहे. अशा प्रकारचा ब्रिज देशात तिसऱ्या क्रमांकाचा राहणार आहे. पुलाचे प्रत्यक्ष बांधकाम नोव्हेंबरपासून सुरू होणार असून इंजिनिअरिंगचा एक नमुना आणि नागपूरसाठी एक लॅण्डमार्क ठरणार आहे.पत्रपरिषदेत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित म्हणाले, पूर्वी स्टील गर्डरने पुलाचे बांधकाम करण्याचा विचार केला होता. पण भविष्यात पुलाची देखभाल आणि भारतीय रेल्वेच्या विस्तारीकरणाचा विचार करून वर्षभरात पुलाचे डिझाईन अनेकदा बदलविले आहे. अखेर आधुनिक आणि अनोख्या पद्धतीने पुलाची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला. २३१ मीटर लांबीच्या पुलाच्या भागात सिनेमाहॉल, हॉटेल्स, व्यावसायिक जागा, शाळा, निवासी कॉम्प्लेक्स आणि गर्दीने व्यापला आहे. त्यामुळे पुलाची निर्मिती करणे हे महामेट्रोपुढे एक आव्हानच आहे.पुलाचे बांधकाम भारतीय रेल्वेच्या ट्रॅकवरून करण्यात येणार असून १०० मीटरचा एकच स्पॅन (३ मीटरचा एक गर्डर) रेल्वे ट्रॅकवरून राहणार आहे. बांधकामादरम्यान रेल्वेची वाहतूक थांबणार नाही. पुलाच्या निर्मितीनंतर मेट्रो जमिनीपासून २५ मीटर अंतरावरून धावणार आहे. अशा पुलाची निर्मिती पूर्वी दिल्ली आणि कोची मेट्रोमध्ये करण्यात आल्याचे दीक्षित यांनी सांगितले.दीक्षित म्हणाले, बॅलेन्स कॅन्टीलेव्हर ब्रिज हे नाव बांधकामाच्या पद्धतीमुळे देण्यात आले आहे. १०० मीटरच्या स्पॅनमध्ये खालून कोणताही आधार देण्यात येणार नाही. अखंड स्पॅनच्या एका बाजूला ७० मीटर आणि दुसºया बाजूला ६० मीटरचा पूल बांधण्यात येणार असल्यामुळे २३१ मीटरचा पूल अखंड राहील. पिलरचे बांधकाम दोन्ही बाजूला सुरू झाले आहे. पायव्याच्या मजबुतीसाठी एका ठिकणी एकत्रित १८ पिल्लर टाकण्यात आले आहेत. रेल्वे ट्रॅक जमिनीपासून ६ मीटर, त्यावर एचओई ७ मीटर आणि त्यावरून ९ मीटरपासून पुलाचे बांधकाम सुरू होणार आहे. तीन मीटर लांबीचा १४० किलो वजनाचा गर्डर पुलाच्या निर्मितीदरम्यान टाकण्यात येणार आहे. यापूर्वी मेट्रोने तीन मीटर लांबीचा ४५ किलो वजनाचा गर्डर टाकला आहे. १०० मीटरच्या स्पॅनमध्ये रेल्वेच्या ट्रॅकदरम्यानचा भाग निमुळता असल्यामुळे पुढे पुढे गर्डरचे वजन कमी होत राहील. दीक्षित म्हणाले, चार मोठ्या पिल्लरवर बॅलेन्स कॅन्टीलेव्हर लावण्यात येईल. गर्डर टाकताना पिल्लरच्या दोन्ही बाजूला ते सरकत जाईल. एकाचवेळी चार पिल्लर टाकण्यासाठी १५ दिवसाचा कालावधी लागेल. बांधकामादरम्यान मेट्रोचा अधिकारी भारतीय रेल्वेच्या कंट्रोल रूममधून बसून चमूला निर्देश देईल. पिल्लरच्या उभारणीनंतर प्रत्यक्ष काम नोव्हेंबरमध्ये सुरू होऊन ११ महिन्यात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. अनोख्या पद्धतीचे पुलाचे बांधकाम पाहण्यासाठी सर्वच इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यावे, असे आवाहन दीक्षित यांनी केले. पत्रपरिषदेत महामेट्रोचे संचालक (प्रकल्प) महेश कुमार, महाव्यवस्थापक (प्रशासन) अनिल कोकाटे, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (रिच-४) राजदीप भट्टाचार्य आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर