शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

...तर गैरआदिवासीला विकलेली जमीन आदिवासीला परत दिली जाऊ शकत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 11:14 IST

अनुसूचित जमातीचा दर्जा मिळण्यापूर्वीच्या व्यवहारांना कायदा अलागू

नागपूर : जमीन मालकाने त्याला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळण्यापूर्वी गैरआदिवासीला जमीन विकली असेल तर या व्यवहाराला अनुसूचित जमातींना जमिनी प्रत्यार्पित करण्याचा कायदा लागू होत नाही. करिता, संबंधित आदिवासी जमीन मालकाला त्याने विकलेली जमीन परत दिली जाऊ शकत नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठातील पूर्ण न्यायपीठाने शुक्रवारी दिला. या न्यायपीठात न्या. सुनील शुक्रे, न्या. अतुल चांदूरकर व न्या. अनिल पानसरे यांचा समावेश होता.

यवतमाळ जिल्ह्यातील शेकराव वंजारेने १९६८मध्ये धनसिंग राठोडला जमीन विकली होती. त्यानंतर धनसिंगने जमिनीचे तुकडे केले व वादग्रस्त जमीन रवीचंद राठोडला विकली. ती जमीन रवीचंदने आशा राठोडला तर आशाने बळीराम चव्हाणला विकली. बळीराम तेव्हापासून ती जमीन कसत आहेत. दरम्यान, १९७४ मध्ये वंजारेच्या अंध जातीचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात आला, तर १ नोव्हेंबर १९७५ रोजी राज्यात महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमिनी प्रत्यार्पित करण्याचा कायदा लागू झाला.

आदिवासीने गैरआदिवासीला जमीन विकली असेल तर संबंधित आदिवासी या कायद्यातील कलम ३ नुसार ती जमीन परत मागू शकतो. परिणामी, वंजारेचा मुलगा गजाननने बळीरामच्या ताब्यातील वादग्रस्त जमीन परत मिळविण्यासाठी पुसद तहसीलदारांना अर्ज सादर केला होता. तो अर्ज मंजूर झाला हाेता व महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणनेही तो आदेश कायम ठेवला होता. त्याविरूद्ध बळीरामने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यासोबत समान मुद्द्यावरील इतरही याचिका जोडण्यात आल्या होत्या. दरम्यान, या मुद्यासंदर्भात उच्च न्यायालयाचे दोन परस्परभिन्न निर्णय पुढे आल्यामुळे योग्य निवाड्याकरिता पूर्ण पीठाची स्थापना करण्यात आली होती. पूर्ण पीठाने विविध बाबी लक्षात घेता हा निर्णय दिला. याचिकाकर्त्यातर्फे वरिष्ठ ॲड. सुबोध धर्माधिकारी, ॲड. मोहित खजांची, ॲड. अक्षय सुदामे आदींनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर