शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

...तर गैरआदिवासीला विकलेली जमीन आदिवासीला परत दिली जाऊ शकत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 11:14 IST

अनुसूचित जमातीचा दर्जा मिळण्यापूर्वीच्या व्यवहारांना कायदा अलागू

नागपूर : जमीन मालकाने त्याला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळण्यापूर्वी गैरआदिवासीला जमीन विकली असेल तर या व्यवहाराला अनुसूचित जमातींना जमिनी प्रत्यार्पित करण्याचा कायदा लागू होत नाही. करिता, संबंधित आदिवासी जमीन मालकाला त्याने विकलेली जमीन परत दिली जाऊ शकत नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठातील पूर्ण न्यायपीठाने शुक्रवारी दिला. या न्यायपीठात न्या. सुनील शुक्रे, न्या. अतुल चांदूरकर व न्या. अनिल पानसरे यांचा समावेश होता.

यवतमाळ जिल्ह्यातील शेकराव वंजारेने १९६८मध्ये धनसिंग राठोडला जमीन विकली होती. त्यानंतर धनसिंगने जमिनीचे तुकडे केले व वादग्रस्त जमीन रवीचंद राठोडला विकली. ती जमीन रवीचंदने आशा राठोडला तर आशाने बळीराम चव्हाणला विकली. बळीराम तेव्हापासून ती जमीन कसत आहेत. दरम्यान, १९७४ मध्ये वंजारेच्या अंध जातीचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात आला, तर १ नोव्हेंबर १९७५ रोजी राज्यात महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमिनी प्रत्यार्पित करण्याचा कायदा लागू झाला.

आदिवासीने गैरआदिवासीला जमीन विकली असेल तर संबंधित आदिवासी या कायद्यातील कलम ३ नुसार ती जमीन परत मागू शकतो. परिणामी, वंजारेचा मुलगा गजाननने बळीरामच्या ताब्यातील वादग्रस्त जमीन परत मिळविण्यासाठी पुसद तहसीलदारांना अर्ज सादर केला होता. तो अर्ज मंजूर झाला हाेता व महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणनेही तो आदेश कायम ठेवला होता. त्याविरूद्ध बळीरामने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यासोबत समान मुद्द्यावरील इतरही याचिका जोडण्यात आल्या होत्या. दरम्यान, या मुद्यासंदर्भात उच्च न्यायालयाचे दोन परस्परभिन्न निर्णय पुढे आल्यामुळे योग्य निवाड्याकरिता पूर्ण पीठाची स्थापना करण्यात आली होती. पूर्ण पीठाने विविध बाबी लक्षात घेता हा निर्णय दिला. याचिकाकर्त्यातर्फे वरिष्ठ ॲड. सुबोध धर्माधिकारी, ॲड. मोहित खजांची, ॲड. अक्षय सुदामे आदींनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर