शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

...तर गैरआदिवासीला विकलेली जमीन आदिवासीला परत दिली जाऊ शकत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 11:14 IST

अनुसूचित जमातीचा दर्जा मिळण्यापूर्वीच्या व्यवहारांना कायदा अलागू

नागपूर : जमीन मालकाने त्याला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळण्यापूर्वी गैरआदिवासीला जमीन विकली असेल तर या व्यवहाराला अनुसूचित जमातींना जमिनी प्रत्यार्पित करण्याचा कायदा लागू होत नाही. करिता, संबंधित आदिवासी जमीन मालकाला त्याने विकलेली जमीन परत दिली जाऊ शकत नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठातील पूर्ण न्यायपीठाने शुक्रवारी दिला. या न्यायपीठात न्या. सुनील शुक्रे, न्या. अतुल चांदूरकर व न्या. अनिल पानसरे यांचा समावेश होता.

यवतमाळ जिल्ह्यातील शेकराव वंजारेने १९६८मध्ये धनसिंग राठोडला जमीन विकली होती. त्यानंतर धनसिंगने जमिनीचे तुकडे केले व वादग्रस्त जमीन रवीचंद राठोडला विकली. ती जमीन रवीचंदने आशा राठोडला तर आशाने बळीराम चव्हाणला विकली. बळीराम तेव्हापासून ती जमीन कसत आहेत. दरम्यान, १९७४ मध्ये वंजारेच्या अंध जातीचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात आला, तर १ नोव्हेंबर १९७५ रोजी राज्यात महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमिनी प्रत्यार्पित करण्याचा कायदा लागू झाला.

आदिवासीने गैरआदिवासीला जमीन विकली असेल तर संबंधित आदिवासी या कायद्यातील कलम ३ नुसार ती जमीन परत मागू शकतो. परिणामी, वंजारेचा मुलगा गजाननने बळीरामच्या ताब्यातील वादग्रस्त जमीन परत मिळविण्यासाठी पुसद तहसीलदारांना अर्ज सादर केला होता. तो अर्ज मंजूर झाला हाेता व महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणनेही तो आदेश कायम ठेवला होता. त्याविरूद्ध बळीरामने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यासोबत समान मुद्द्यावरील इतरही याचिका जोडण्यात आल्या होत्या. दरम्यान, या मुद्यासंदर्भात उच्च न्यायालयाचे दोन परस्परभिन्न निर्णय पुढे आल्यामुळे योग्य निवाड्याकरिता पूर्ण पीठाची स्थापना करण्यात आली होती. पूर्ण पीठाने विविध बाबी लक्षात घेता हा निर्णय दिला. याचिकाकर्त्यातर्फे वरिष्ठ ॲड. सुबोध धर्माधिकारी, ॲड. मोहित खजांची, ॲड. अक्षय सुदामे आदींनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर