शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

लाखोंची विकासकामे मात्र स्वच्छतेकडे कानाडोळा; नागपूर स्थानकावर रेल्वे प्रशासनाची उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 11:14 AM

मागील सहा महिन्यात नागपूर रेल्वेस्थानकावर लाखो रुपये खर्चून विकासकामांचा सपाटा लावण्यात आला. परंतु सौंदर्यीकरणावर लाखो रुपये उधळणाऱ्या प्रशासनाने वारंवार मागणी होऊनही पश्चिमेकडील भागात साधे प्रसाधनगृह उपलब्ध करून दिले नाही.

ठळक मुद्देकेवळ महाव्यवस्थापकांच्या दौऱ्यासाठी झाला परिसर स्वच्छ

दयानंद पाईकराव।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील सहा महिन्यात नागपूर रेल्वेस्थानकावर लाखो रुपये खर्चून विकासकामांचा सपाटा लावण्यात आला. रेल्वेस्थानकाच्या आत आणि बाहेर उद्यान तयार करण्यात आले. आठ दिवसांपूर्वी महाव्यवस्थापकांच्या दौऱ्यानिमित्त रेल्वेस्थानक चकाचक करण्यात आले. बाहेरुन शोभेची झाडे, कुंड्या आणण्यात आल्या. परंतु सौंदर्यीकरणावर लाखो रुपये उधळणाऱ्या प्रशासनाने वारंवार मागणी होऊनही पश्चिमेकडील भागात साधे प्रसाधनगृह उपलब्ध करून दिले नाही.यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यांना उघड्यावर लघुशंकेला जावे लागत असून रेल्वे प्रशासनाने अस्वच्छतेचे अभियान सुरु केले की काय, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.नागपूर रेल्वेस्थानकावर पश्चिमेकडील भागात एक आरक्षित तिकिटांचे तर दोन अनारक्षित तिकिटांचे कार्यालय आहे. येथे तिकीट काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना मूलभूत सोईसुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. आरक्षण कार्यालयात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्रशासनाने केलेली नाही. पिण्याचे पाणी तर सोडा परंतु साध्या प्रसाधनगृहाची व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांची पंचाईत होत आहे. व्यवस्थाच नसल्यामुळे रेल्वेस्थानकावर येणारे नागरिक लघुशंकेसाठी रेल्वेस्थानक परिसरात पार्किंग, नव्याने तयार करण्यात आलेले गार्डन, आरपीएफ शेजारील अपंगांचे पार्किंग याचा वापर करताना दिसतात.यामुळे परिसरात दुर्गंधी पसरणे सुरू झाले आहे. रेल्वे प्रशासनाने पश्चिमेकडील भागात लाखो रुपये खर्चून विकासकामे केली. परंतु प्रवाशांना साध्या पिण्याचे पाणी आणि प्रसाधनगृह उपलब्ध करून दिले नसल्यामुळे नागरिक प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त करीत आहेत.

विनाकारण होते दंडात्मक कारवाईनागपूर शहरात सार्वजनिक प्रसाधनगृहात लघुशंकेसाठी जाणाऱ्या नागरिकांना कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही. मात्र, रेल्वेस्थानकात व्यवस्थाच नसल्यामुळे नागरिक रेल्वेस्थानकात प्रवेश करून प्लॅटफार्मवरील प्रसाधनगृहात लघुशंकेसाठी जातात. बाहेर पडताना टीसीची नजर संबंधित नागरिकावर गेल्यास ते त्याला पकडतात. विनातिकीट समजून रेल्वेस्थानकात प्रवेश केल्याबद्दल २५० रुपये दंड ठोठावतात. यामुळे नागरिकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागत आहे.

स्वच्छता अभियानाची ऐशीतैशीरेल्वे मंत्रालयाने अधिकाऱ्यांना रेल्वेस्थानक, परिसर, रेल्वेगाड्यात स्वच्छता राखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे आदेश दिलेले आहेत. वेळोवेळी रेल्वे प्रशासन पथनाट्य, बॅनर, पोस्टरच्या माध्यमातून जनजागृती करते. परंतु नागपूर रेल्वेस्थानकावर मात्र साधे प्रसाधनगृह उपलब्ध करून न दिल्यामुळे स्वच्छता अभियानाला रेल्वे प्रशासनाने तिलांजली दिल्याचा भास होत आहे. येथे स्वच्छतेबाबत कोणतीच खबरदारी प्रशासन घेताना दिसत नसल्यामुळे स्वच्छता अभियानाची ऐशीतैशी होत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर