शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
4
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
5
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
7
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
8
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
9
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
10
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
11
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
12
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
13
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
14
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
15
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
16
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
17
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
18
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
19
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
20
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
Daily Top 2Weekly Top 5

मजूर नसल्याचा परिणाम होतोय नागपूर जिल्ह्यातील टंचाईच्या कामावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 20:57 IST

कोविड-१९ मुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. अख्खे उद्योग, व्यवसाय ठप्प पडले. त्यामुळे मजूर आपापल्या गावाकडे परतले. आज परिस्थिती अशी झाली की कामांसाठी मजूर मिळेनासे झाले आहेत. मजुरांचा फटका जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या कामाला बसला आहे.

ठळक मुद्दे६४४ पैकी ११७ बोअरचे झाले फ्लशिंग : मान्सूनच्या आगमनाने टंचाईची कामे प्रलंबित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड-१९ मुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. अख्खे उद्योग, व्यवसाय ठप्प पडले. त्यामुळे मजूर आपापल्या गावाकडे परतले. आज परिस्थिती अशी झाली की कामांसाठी मजूर मिळेनासे झाले आहेत. मजुरांचा फटका जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या कामाला बसला आहे. मजूर नसल्यामुळे कामाची गती फारच संथ आहे. त्यातच मान्सून दाखल झाल्याने टंचाईची कामे प्रलंबित राहणार आहेत.यावर्षी टंचाईच्या कामामध्ये नादुरुस्त बोअरवेलला फ्लशिंग करून बोअर रिचार्ज करण्यावर भर देण्यात आला. जवळपास ६४४ बोअरला फ्लशिंग करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे जुन्या बोअरवेल पुन्हा पुनरुज्जीवित होऊन, त्याचा ग्रामीण नागरिकांना फायदा होणार होता. परंतु यंदा देशात कोरोनाचे संकट उभे ठाकल्यामुळे सर्वच कामे रखडलीत. त्यामुळे टंचाई आराखड्यातील कामांनाही मंजुरी मिळण्यास विलंब झाला. साधारणत: ३० जूनपर्यंत टंचाईची कामे मार्गी लावावी लागतात. परंतु यंदा मंजुरी उशिरा प्राप्त झाल्याने कामांनाही उशिरा सुरुवात झाली. त्यातच मजूर नसल्यामुळेही कामे रखडलीत. जिल्ह्यात प्रथमच ५११ गावांमधील ६४४ बोअरवेलला फ्लशिंग करण्याचे नियोजित आहे. परंतु आतापर्यंत केवळ ७७ गावांमधील ११७ बोअरवेलच्या फ्लशिंगचे काम पूर्ण झाले आहे.यंदा टंचाई आराखड्यानुसार जिल्ह्यात ३७ कोटी ८० लक्ष रुपये प्रस्तावित होते. त्यामध्ये बोअरवेल फ्लशिंग, नवीन बोरअवेल, नळ योजना, विहिर खोलीकरण, विहिर अधिग्रहण आदी कामे करायची होती. त्यात १६० गावांमध्ये २३४ बोअरवेल करावयाच्या असून, आजवर त्यापैकी १७३ बोअरवेलचे काम पूर्ण झाले आहेत. तर ३१ गावांमधील बोअरवेलला भूवैज्ञानिक विभागाकडून रद्द करण्यात आल्या आहे. त्यामुळे आता केवळ ३० जूनपर्यंत ३० बोअरवेलचीच कामे मार्गी लावायची आहेत.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईLabourकामगारMigrationस्थलांतरण