शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

"तुमानेंचे तिकीट कटले, आता ४० गद्दारांनी पुढचा विचार करावा", आदित्य ठाकरेंची टीका 

By कमलेश वानखेडे | Updated: April 2, 2024 13:17 IST

Lok Sabha Elections 2024: आदित्य ठाकरे हे यवतमाळचे उमेदवार संजय देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नागपुरात आले असता पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. 

नागपूर: बंडखोरी  आणि गद्दारी मध्ये फरक असतो. शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांना तिकीट नाकारल्यानंतर ४० गद्दारांनी सुद्धा पुढचा विचार केला पाहिजे, जिथे जिथे गद्दारांना तिकीट मिळाली आहे, त्यांनाही असाच धडा बसणार आहे, अशी टीका शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी नागपुरात केली.

आदित्य ठाकरे हे यवतमाळचे उमेदवार संजय देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नागपुरात आले असता पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, यवतमाळ मध्ये महायुतीकडून अजून उमेदवार दिला नाही. भ्रष्ट उमेदवार देणार आहे, की नवीन चेहरा येणार आहे हा प्रश्न आहे. मागील दहा वर्षात काय कामे झाले सर्वांना माहित आहे. जगात एप्रिल फुल हा दिवस साजरा होत असताना आपल्याकडे अच्छे दिन म्हणून तो दिवस साजरा होतो, आता चिमटा त्यांनी घेतला.

देशभरात परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले आहेत. दिल्ली, बिहार, महाराष्ट्र, बंगाल अशी इंडिया आघाडीची बांधणी मजबूत असल्याचे दिसून येत आहे. आम्ही थेट जनतेच्या संपर्कात असून जनता आमच्या पाठीशी उभी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशात लोकशाही संपत चाललेली आहे. संविधानाला मोठा धोका आहे. अशा काळात आम्ही सगळे एकत्र येऊन लोकशाही वाचण्यासाठी लढत आहोत, यात प्रकाश आंबेडकर यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४