शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

"तुमानेंचे तिकीट कटले, आता ४० गद्दारांनी पुढचा विचार करावा", आदित्य ठाकरेंची टीका 

By कमलेश वानखेडे | Updated: April 2, 2024 13:17 IST

Lok Sabha Elections 2024: आदित्य ठाकरे हे यवतमाळचे उमेदवार संजय देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नागपुरात आले असता पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. 

नागपूर: बंडखोरी  आणि गद्दारी मध्ये फरक असतो. शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांना तिकीट नाकारल्यानंतर ४० गद्दारांनी सुद्धा पुढचा विचार केला पाहिजे, जिथे जिथे गद्दारांना तिकीट मिळाली आहे, त्यांनाही असाच धडा बसणार आहे, अशी टीका शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी नागपुरात केली.

आदित्य ठाकरे हे यवतमाळचे उमेदवार संजय देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नागपुरात आले असता पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, यवतमाळ मध्ये महायुतीकडून अजून उमेदवार दिला नाही. भ्रष्ट उमेदवार देणार आहे, की नवीन चेहरा येणार आहे हा प्रश्न आहे. मागील दहा वर्षात काय कामे झाले सर्वांना माहित आहे. जगात एप्रिल फुल हा दिवस साजरा होत असताना आपल्याकडे अच्छे दिन म्हणून तो दिवस साजरा होतो, आता चिमटा त्यांनी घेतला.

देशभरात परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले आहेत. दिल्ली, बिहार, महाराष्ट्र, बंगाल अशी इंडिया आघाडीची बांधणी मजबूत असल्याचे दिसून येत आहे. आम्ही थेट जनतेच्या संपर्कात असून जनता आमच्या पाठीशी उभी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशात लोकशाही संपत चाललेली आहे. संविधानाला मोठा धोका आहे. अशा काळात आम्ही सगळे एकत्र येऊन लोकशाही वाचण्यासाठी लढत आहोत, यात प्रकाश आंबेडकर यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४